शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मिरजेत पाणी पातळी ६२ फुटावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

मिरज : मिरजेत पुराचे पाणी ६२ फुटांपर्यंत पोहोचल्याने कृष्णा घाट व परिसरातील बाराशे कुटुंबातील साडेचार हजार जणांना स्थलांतरित करण्यात ...

मिरज : मिरजेत पुराचे पाणी ६२ फुटांपर्यंत पोहोचल्याने कृष्णा घाट व परिसरातील बाराशे कुटुंबातील साडेचार हजार जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. मिरज-शिरोळ रस्ता बंद झाला असून मिरजेतील कृष्णा नदी पुलावरून पाणी वाहत आहे. मिरजेत कृष्णा घाटावर पाणी पातळी ६२ फुटावर पोहोचल्याने परिसरातील शेतात पाणी पसरले आहे.

कृष्णा घाट रस्त्यावर ६ फुटापर्यंत पाणी आहे. कृष्णा घाटावर महापालिकेतर्फे नागरिकांना निवारा केंद्रात हलविण्यात येत आहे. कृष्णाघाट व या रस्त्यावरील सुमारे साडेचार हजार जणांचे स्थलांतर करण्यात आल्याचे महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले. कृष्णा घाटावरील ४०० कुटुंबातील १,७०० जणांना, कृष्णाघाट रस्त्यावरील ६०० कुटुंबातील २,२०० जणांना, राजीव गांधीनगर येथील १२० कुटुंबातील ६०० जणांना बेथेस्दा शाळा व मिरज हायस्कूल निवारा केंद्रात आश्रय देण्यात आला आहे.

कृष्णाघाटावरील २३० जनावरांना मिरज मार्केट यार्डात नेऊन त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था केली आहे. मिरज शहरात चांद कॉलनीपर्यंत पाणी आले आहे. मिरज शहरात प्रभाग सातमध्ये प्रताप कॉलनी परिसरात पुन्हा नागरिकांच्या घरात ड्रेनेजचे पाणी शिरले. गेल्या अनेक वर्षे या परिसरात पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. जोरदार पावसामुळे ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरांत शिरल्याने प्रापंचिक साहित्यांचे नुकसान झाले. नादुरुस्त ड्रेनेज यंत्रणेमुळे नागरिक महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.