शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

कृष्णा नदीत पाणी, सांगलीकरांची आठवड्याची चिंता मिटली

By शीतल पाटील | Updated: June 18, 2023 19:30 IST

पाणीटंचाईचे सावटात दिलासा, महापालिकेकडून एकाच पाणीपुरवठा

सांगली : कोयना धरणातून सोडलेले पाणी अखेर रविवारी सांगलीत पोहोचले. त्यामुळे सांगली, कुपवाडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. किमान आठवडाभर पुरेल इतका पाणीसाठी नदीपात्रात असल्याने पिण्याची पाण्याची चिंता मिटली. तरीही महापालिकेने पाणी कपातीचे धोरण कायम ठेवले आहे.गेल्या आठ दिवसांपासून कृष्णा नदीतील पाणीसाठा कमी झाला होता. पावसाने ओढ दिल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले नव्हते. जलसंपदा विभागाने शेती व औद्योगिक वसाहतींना पाणी उपसा बंदी लागू केली.

कोयना धरणातून १०५० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. पण हे पाणी सांगलीपर्यंत न पोहोचल्याने चिंता वाढली होती. महापालिकेने पाणी कपातीला सुरूवात केली होती. दोनदा पाणी देणाऱ्या भागात सध्या दिवसातून एकाच पाणी दिले जात आहे. कुपवाड औद्योगिक महामंडळाला पाणी उपसा लागू केल्याने वारणाली, विजयनगर परिसरातील अनेक गल्ल्यामध्ये पाणी टंचाई जाणवत होती. त्यासाठी महापालिकेने टँकर सुरू केले होते.

कोयनेतून सोडलेले पाणी रविवारी सांगलीत पोहोचले. सध्या नदीपात्रात दोन ते तीन फुट पाण्याचा साठा आहे. हा साठा किमान आठवडाभर पुरेल इतका आहे. त्यामुळे सध्या तरी सांगली, कुपवाडकरांची चिंता मिटली आहे. पावसाने आणखी ओढ दिली तर मात्र पाणी टंचाईचे सावट कायम राहणार आहे.हरिपूर ते म्हैसाळ उपसा बंदी उठविली

हरिपूर ते म्हैसाळ बंधारा हद्दीपर्यंत सुरु असणारी उपसा बंदी उठविण्यात आली असून या योजनांचा विद्युत प्रवाह पूर्ववत करण्याच्या सुचना संबधित यंत्रणेला देण्यात आली असल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली. सांगली ते टेंभूपर्यंतची कृष्णा नदी काठावरील उपसाबंदी मात्र कायम आहे.