शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

माधवनगरमधील पाणीप्रश्नावर आंदोलन

By admin | Updated: April 6, 2016 00:06 IST

सुधार समिती आक्रमक : ग्रामपंचायतीवर फौजदारी करणार; निवेदन कार्यालयावर चिकटवले

माधवनगर : गावाला गेल्या ३४ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ आज सकाळी सांगली जिल्हा सुधार समितीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी माधवनगर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी आठ दिवसात ग्रामपंचायतीवर फौजदारी दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याबाबतचे निवेदनही कार्यालयावर चिकटवले. गेल्या काही महिन्यांपासून माधवनगर गावाला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. ग्रामस्थ ग्रामपंचायतीचा कर भरत असूनही नागरी सुविधा व पाणी पुरवठा होत नसल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हा सुधार समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड अमित शिंदे, रवींद्र चव्हाण, अंकुश केरीपाळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. गांधी चौकातून मोर्चास सुरुवात झाली. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा आल्यावर मुख्य गेटजवळ तो अडवण्यात आला. याठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची भाषणे झाली. यावेळी अ‍ॅड़ अमित शिंदे म्हणाले की, गावाला नागरी सुविधा देण्यात व आपले कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याबद्दल ग्रामविकास अधिकाऱ्यांवर समितीच्यावतीने फौजदारी दाखल करणार आहे. रवींद्र चव्हाण, अंकुश केरीपाळे, राजाराम यमगर यांचीही भाषणे झाली. आंदोलनकर्त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन घ्यावे, अशी मागणी केली, पण ग्रामविकास अधिकारी उपस्थित नसल्याने सरपंच नंदाताई कदम यांनी मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शविली. पण अ‍ॅड़ शिंदे यांनी त्यास नकार दिला. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर लवकर कारवाई होणार असल्याने कोणत्याही लोकप्रतिनिधीला निवेदन देणार नसल्याचे सांगत, ग्रामविकास अधिकारी न आल्यास ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाजावर निवेदन चिकटवणार असल्याचे सांगितले. ग्रामविकास अधिकारी आंदोलनाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर निवेदन चिकटवले. यावेळी दत्ता पाटील, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, आनंद शिंदे, यशवंत हिरकुडे, प्रवीण शिंदे, बाळासाहेब काळे, रघुनाथ पाटील, युवराज पवार, किरण पवार, विजय सोडगे, सुनीता धायगुडे, सुरेखा तिमगोळ, शालन कदम, यशवंत हिरकुडे, संजय पाटील, सुदेश जमदाडे उपस्थित होते. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चानंतर आंदोलकांनी जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांची भेट घेतली. यावेळी गटविकास अधिकारी, मिरज यांना माधवनगरमधील पाणीप्रश्न दोन दिवसात सोडवण्याचे आदेश देत ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. (वार्ताहर)मोठा बंदोबस्त : आंदोलनाची चर्चागांधी चौकात मोर्चा सुरू झाल्यावर ग्रामस्थांची उपस्थिती अल्प होती. पण ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा आल्यावर विविध पक्षाचे कार्यकर्तेही त्यामध्ये सहभागी झाले होते. पाणी प्रश्नावर ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याची काहींनी तयारी सुरू केली होती. पण सुधार समितीचे अ‍ॅड़ अमित शिंदे यानी हा इशारा मोर्चा असून, यापुढेही मोठे आंदोलन होणार असल्याचे सांगितल्याने हा प्रयत्न बारगळला. बऱ्याच दिवसांनी मोठ्या पोलिस बंदोबस्तात मोर्चा निघाल्याने व कायदेशीर तरतुदींचा वापर करत भाषणे झाल्याने आंदोलनाची गावात जोरदार चर्चा होती.ग्रामपंचायतीविरोधात जोरदार घोषणाबाजीमोर्चात आलेल्या आंदोलकांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात होत्या. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने व पदाधिकारी उध्दट उत्तरे देत असल्याने आक्रमक महिलांनी सरपंच व ग्रामसदस्यांसमोर तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी ग्रामपंचायतीविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी मोजके ग्रामपंचायत सदस्य सरपंचांसमवेत कार्यालयात उपस्थित होते.