शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

चांदाेली डाव्या कालव्याचे पाणी आरळ्याच्या बसस्थानकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST

वारणावती : चांदोली धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. कालव्यांच्या गळतीमुळे आरळा स्टँड परिसरात ...

वारणावती : चांदोली धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. कालव्यांच्या गळतीमुळे आरळा स्टँड परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. पाणीच पाणी सगळीकडे, गेला कालवा कुणीकडे? अशी स्थिती पाहावयास मिळत आहे.

शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या शेतीसाठी धरणाच्या कालव्यातून तीनशे क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडले जात आहे. पण कालव्यातून झिरपणारे पाणी कालव्याखालील शिवारात साठून शेती नापिक होत आहे. शेतकऱ्यांना पिकांची मशागत करता येत नाही. काही ठिकाणी शिवार पिकाविना पडून आहे. असे चित्र असतानाच, आता कालव्यातून झिरपणारे पाणी आरळा येथील गटारीतून चक्क आरळा स्टँड परिसरात रस्त्यावर येत आहे. पावसाळ्यात पाहायला मिळाले नाही इतके पाणी रस्त्यावर आहे. वाहनांमुळे रस्त्याकडेने पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडत आहे; तर रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे परिसरातील लोकांचे, व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याकडे धरणाच्या कालवा विभागाच्या प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कालव्यातून झिरपणारे पाणी रस्त्यावर येते. त्याचा बंदोबस्त करण्याची लोकांची मागणी आहे.

फोटो :

ओळ : चांदोली धरणाच्या कालव्याचे पाणी आरळा स्टँड परिसरातील रस्त्यावर असे वाहत आहे.