शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

आटपाडीच्या शुक ओढ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:14 IST

आटपाडी : ऐन उन्हाळ्यात प्रथमच आटपाडीचा शुक ओढा यंदा पाण्याने झुळूझुळू वाहू लागला आहे. यंदा वर्षभर आटपाडीकडे पर्जन्यराजाने पाठ ...

आटपाडी : ऐन उन्हाळ्यात प्रथमच आटपाडीचा शुक ओढा यंदा पाण्याने झुळूझुळू वाहू लागला आहे. यंदा वर्षभर आटपाडीकडे पर्जन्यराजाने पाठ फिरविली, मात्र टेंभू योजनेच्या कृपेने दुष्काळी आटपाडीत कृष्णामाई वाहू लागली आहे.आटपाडी परिसरात रब्बी हंगामासाठी ओढ्याने याआधी टेंभूचे पाणी सोडण्यात आले होते; पण यंदा प्रथमच उन्हाळ्यात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांसह आटपाडीकरांमध्ये उन्हाळ्यात वाहणारा ओढा पाहून समाधान व्यक्त केले जात आहे. आटपाडी तलावातून पाणीमळा बंधाऱ्याने देशमुखवाडी बंधाºयापर्यंत पाणी ओढ्याने सोडले आहे. पावसाअभावी आटपाडी तालावातील पाण्याने तळ गाठला होता. दि. १५ मार्च रोजी टेंभूचे पाणी तलावात आले. दि. २७ मार्चपर्यंत ३०९ दलघफू क्षमतेचा तलाव पूर्णपणे भरला. त्यानंतर हाके मळा बंधारा भरण्यात आला.आटपाडी तलावातून सुमारे १० कि. मी. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी थेट पाईपलाईन टाकून शेतीसाठी पाणी नेले आहे. या शेतकºयांनी १२ लाख रुपये पाणीपट्टी भरली आहे. खांजोडवाडीपर्यंतच्या ओढ्याकडेच्या शेतकºयांनी ९ लाख रुपये पाणीपट्टीसाठी पैसे गोळा केले आहेत. या पाण्यामुळे डाळिंबासह या शेतकºयांची पिके आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटणार आहे.आटपाडी तलावावर आटपाडीच्या सुमारे ३५ हजार लोकसंख्येसह माडगुळे ७ गावांची प्रादेशिक योजना आणि मापटेमळा गावची पाणी पुरवठा योजना आहे. आता आटपाडी तलाव भरल्याने या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यापुरता तरी मिटला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.पूर्ण क्षमतेने पाणी?आटपाडी तालुक्यातील शेतकºयांना पाण्याची किंमत वेगळी सांगण्याची गरज नाही. त्यात शासनानेही ८१ टक्के वीज बिल भरण्याचा निर्णय झाला. त्यामुळे शेतकºयांना १७४५१ रुपये दलघफू दराने पाणी मिळत आहे. पाण्याचे पैसे शेतकरी आधी भरत आहेत. पण विजेअभावी टेंभू येथील ९ पैकी कधी ३, तर कधी ५ मोटारी चालू केल्या जातात. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी येत नाही.हे व्हायला हवेसध्या आटपाडीचा ओढा वाहत असताना ७ कि.मी. अंतरावरील विठलापूरचा ओढा कोरडा ठणठणीत आहे. या ओढ्याने कौठुळी-बोंबेवाडीपर्यंत माणगंगा नदीने टेंभूचे पाणी सोडता येते. पण अजून बिंबवडे तलावातच पाणी आलेले नाही. या परिसरातील सर्व गावे पाण्याची वाट पहात आहेत.