शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीच्या शुक ओढ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:14 IST

आटपाडी : ऐन उन्हाळ्यात प्रथमच आटपाडीचा शुक ओढा यंदा पाण्याने झुळूझुळू वाहू लागला आहे. यंदा वर्षभर आटपाडीकडे पर्जन्यराजाने पाठ ...

आटपाडी : ऐन उन्हाळ्यात प्रथमच आटपाडीचा शुक ओढा यंदा पाण्याने झुळूझुळू वाहू लागला आहे. यंदा वर्षभर आटपाडीकडे पर्जन्यराजाने पाठ फिरविली, मात्र टेंभू योजनेच्या कृपेने दुष्काळी आटपाडीत कृष्णामाई वाहू लागली आहे.आटपाडी परिसरात रब्बी हंगामासाठी ओढ्याने याआधी टेंभूचे पाणी सोडण्यात आले होते; पण यंदा प्रथमच उन्हाळ्यात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांसह आटपाडीकरांमध्ये उन्हाळ्यात वाहणारा ओढा पाहून समाधान व्यक्त केले जात आहे. आटपाडी तलावातून पाणीमळा बंधाऱ्याने देशमुखवाडी बंधाºयापर्यंत पाणी ओढ्याने सोडले आहे. पावसाअभावी आटपाडी तालावातील पाण्याने तळ गाठला होता. दि. १५ मार्च रोजी टेंभूचे पाणी तलावात आले. दि. २७ मार्चपर्यंत ३०९ दलघफू क्षमतेचा तलाव पूर्णपणे भरला. त्यानंतर हाके मळा बंधारा भरण्यात आला.आटपाडी तलावातून सुमारे १० कि. मी. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी थेट पाईपलाईन टाकून शेतीसाठी पाणी नेले आहे. या शेतकºयांनी १२ लाख रुपये पाणीपट्टी भरली आहे. खांजोडवाडीपर्यंतच्या ओढ्याकडेच्या शेतकºयांनी ९ लाख रुपये पाणीपट्टीसाठी पैसे गोळा केले आहेत. या पाण्यामुळे डाळिंबासह या शेतकºयांची पिके आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटणार आहे.आटपाडी तलावावर आटपाडीच्या सुमारे ३५ हजार लोकसंख्येसह माडगुळे ७ गावांची प्रादेशिक योजना आणि मापटेमळा गावची पाणी पुरवठा योजना आहे. आता आटपाडी तलाव भरल्याने या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यापुरता तरी मिटला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.पूर्ण क्षमतेने पाणी?आटपाडी तालुक्यातील शेतकºयांना पाण्याची किंमत वेगळी सांगण्याची गरज नाही. त्यात शासनानेही ८१ टक्के वीज बिल भरण्याचा निर्णय झाला. त्यामुळे शेतकºयांना १७४५१ रुपये दलघफू दराने पाणी मिळत आहे. पाण्याचे पैसे शेतकरी आधी भरत आहेत. पण विजेअभावी टेंभू येथील ९ पैकी कधी ३, तर कधी ५ मोटारी चालू केल्या जातात. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी येत नाही.हे व्हायला हवेसध्या आटपाडीचा ओढा वाहत असताना ७ कि.मी. अंतरावरील विठलापूरचा ओढा कोरडा ठणठणीत आहे. या ओढ्याने कौठुळी-बोंबेवाडीपर्यंत माणगंगा नदीने टेंभूचे पाणी सोडता येते. पण अजून बिंबवडे तलावातच पाणी आलेले नाही. या परिसरातील सर्व गावे पाण्याची वाट पहात आहेत.