शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आटपाडीच्या शुक ओढ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:14 IST

आटपाडी : ऐन उन्हाळ्यात प्रथमच आटपाडीचा शुक ओढा यंदा पाण्याने झुळूझुळू वाहू लागला आहे. यंदा वर्षभर आटपाडीकडे पर्जन्यराजाने पाठ ...

आटपाडी : ऐन उन्हाळ्यात प्रथमच आटपाडीचा शुक ओढा यंदा पाण्याने झुळूझुळू वाहू लागला आहे. यंदा वर्षभर आटपाडीकडे पर्जन्यराजाने पाठ फिरविली, मात्र टेंभू योजनेच्या कृपेने दुष्काळी आटपाडीत कृष्णामाई वाहू लागली आहे.आटपाडी परिसरात रब्बी हंगामासाठी ओढ्याने याआधी टेंभूचे पाणी सोडण्यात आले होते; पण यंदा प्रथमच उन्हाळ्यात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांसह आटपाडीकरांमध्ये उन्हाळ्यात वाहणारा ओढा पाहून समाधान व्यक्त केले जात आहे. आटपाडी तलावातून पाणीमळा बंधाऱ्याने देशमुखवाडी बंधाºयापर्यंत पाणी ओढ्याने सोडले आहे. पावसाअभावी आटपाडी तालावातील पाण्याने तळ गाठला होता. दि. १५ मार्च रोजी टेंभूचे पाणी तलावात आले. दि. २७ मार्चपर्यंत ३०९ दलघफू क्षमतेचा तलाव पूर्णपणे भरला. त्यानंतर हाके मळा बंधारा भरण्यात आला.आटपाडी तलावातून सुमारे १० कि. मी. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी थेट पाईपलाईन टाकून शेतीसाठी पाणी नेले आहे. या शेतकºयांनी १२ लाख रुपये पाणीपट्टी भरली आहे. खांजोडवाडीपर्यंतच्या ओढ्याकडेच्या शेतकºयांनी ९ लाख रुपये पाणीपट्टीसाठी पैसे गोळा केले आहेत. या पाण्यामुळे डाळिंबासह या शेतकºयांची पिके आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटणार आहे.आटपाडी तलावावर आटपाडीच्या सुमारे ३५ हजार लोकसंख्येसह माडगुळे ७ गावांची प्रादेशिक योजना आणि मापटेमळा गावची पाणी पुरवठा योजना आहे. आता आटपाडी तलाव भरल्याने या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यापुरता तरी मिटला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.पूर्ण क्षमतेने पाणी?आटपाडी तालुक्यातील शेतकºयांना पाण्याची किंमत वेगळी सांगण्याची गरज नाही. त्यात शासनानेही ८१ टक्के वीज बिल भरण्याचा निर्णय झाला. त्यामुळे शेतकºयांना १७४५१ रुपये दलघफू दराने पाणी मिळत आहे. पाण्याचे पैसे शेतकरी आधी भरत आहेत. पण विजेअभावी टेंभू येथील ९ पैकी कधी ३, तर कधी ५ मोटारी चालू केल्या जातात. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी येत नाही.हे व्हायला हवेसध्या आटपाडीचा ओढा वाहत असताना ७ कि.मी. अंतरावरील विठलापूरचा ओढा कोरडा ठणठणीत आहे. या ओढ्याने कौठुळी-बोंबेवाडीपर्यंत माणगंगा नदीने टेंभूचे पाणी सोडता येते. पण अजून बिंबवडे तलावातच पाणी आलेले नाही. या परिसरातील सर्व गावे पाण्याची वाट पहात आहेत.