शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
4
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
5
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
6
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
7
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
10
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
11
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
12
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
13
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
14
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
15
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
16
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
17
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
18
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
19
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
20
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला

आबांच्या सैन्याकडून काका गटाला धोबीपछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 00:08 IST

बाजार समिती निवडणूक : नाराजांच्या खांद्यावरून साधलेला भाजपचा निशाणा चुकला; काँग्रेसही चितपट

दत्ता पाटील- तासगाव --आर. आर. आबांच्या अनुपस्थितीत तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात बाहुबल अजमावताना राष्ट्रवादीने भाजपच्याविरोधात आपली ताकद पणाला लावली होती. नाराजांच्या खांद्यावरून खासदार संजय पाटील यांच्या गटाने धरलेला निशाणा चुकला आणि आबांच्या सैन्याने काका गटाला धोबीपछाड देत बघता-बघता मैदान मारले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चमत्कार घडविणाऱ्या काँग्रेसलाही त्यांनी चितपट केल्याने आबांच्या गटाने तालुक्यातील आपल्या ताकदीची प्रचिती या निवडणुकीतून दिली. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चोवीस वर्षांपासून बिनविरोधचा पायंडा होता. बाजार समितीसाठी मतदान असते, ही बाबच मतदार असणाऱ्या सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींना माहीत नव्हती. या निवडणुकीने मात्र मतदारांना हक्क बजावण्याची संधी मिळाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आघाडीचा फॉर्म्युला राबविण्यात आला. तेव्हापासूनच भाजप आणि राष्ट्रवादीच्या तासगाव बाजार समितीच्या आघाडीबाबत चर्चा सुरू झाली होती. दोन्ही पक्षांत याबाबत मतभिन्नता होतीच. किंंबहुना तालुक्याचे महत्त्वाचे सत्ताकेंद्र असल्यामुळे वर्चस्वासाठी जागावाटपात ओढाताणही सुरू होती. अगदी अखेरच्याक्षणी दोन्ही पक्षांकडून स्वबळ अजमावण्याचा निर्णय झाला.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तासगाव तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक वेगळाच फॉर्म्युला राबवला. राष्ट्रवादीच्या नाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सोसायटी गटात राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का दिला. तालुक्यात सोसायट्या आणि ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. मात्र राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदीचा फायदा घेऊन सत्तेत येण्याचा आत्मविश्वास भाजपच्या नेत्यांना होता. या जोरावरच भाजपने स्वबळ अजमावले. मात्र भाजपची व्यूहरचना फोल ठरली. तालुक्यात खासदार गट पूर्वीसारखाच अभेद्य आहे. मात्र राज्यात, केंद्रात सत्तेत असूनदेखील खासदार पाटील यांना राष्ट्रवादीतील नाराज मतदारांना भाजपकडे खेचून घेण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे. या विजयाने पक्षातील कार्यकर्त्यांत आलेली मरगळ जाऊन आत्मविश्वास दुणावला असल्याचे दिसून येत आहे. तसेच तिसरे स्वतंत्र पॅनेल उभे करून पक्षाची ताकद अजमावणाऱ्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनाही साफ अपयश आल्याचे दिसून आले. त्यांच्या पदरी एकही जागा आली नसल्याने त्यांना सर्वात मोठा हादरा बसला आहे. जिल्हा बँकेच्या फॉर्म्युल्याने कार्यकर्त्यांची एकजूट जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गाफील राहिल्यामुळेच राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला होता. यापेक्षा भाजपच्या खेळीचे शल्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बोचत होते. दोन्ही पक्षांची आघाडी असताना भाजपकडून राष्ट्रवादीतील नाराजांना हाताशी धरून कुरघोडीचे राजकारण झाले होते. या फॉर्म्युल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहाणपण घेतले. कार्यकर्त्यांनीच निवडणुकीची जबाबदारी अंगावर घेतल्यामुळे गटबाजीला थारा मिळाला नाही. ही खेळी भाजपच्या अंगलट आली.अविनाश पाटील यांची निर्णायक भूमिका या निवडणुकीत दिनकरआबा घराण्यातीलच भाजपचे नेते खासदार संजय पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अविनाश पाटील आमने-सामने आले होते. भाजपशी आघाडी करण्यासाठी प्रामुख्याने अविनाश पाटील यांचाच ठाम विरोध होता. खासदार पाटील यांनी राष्ट्रवादीवर केलेले शाब्दीक हल्ले अविनाश पाटील यांनीच परतवून लावले होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत आलेले सूतगिरणीचे संचालक युवराज पाटील आणि उमेदवार विठ्ठल काशीद यांचाही फायदा राष्ट्रवादीला झाला.स्वाभिमान डिवचल्याने अस्तित्वाची लढाई...बाजार समितीच्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत गटबाजी मोठ्या प्रमाणात होती. आर. आर. पाटील यांच्या पश्चात राष्ट्रवादीचे भवितव्य काय? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत होता. कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचलेले होते. अशा परिस्थितीत पक्षाची कोंडी झाली होती. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान डिवचला गेला. त्यामुळे अस्तित्वाची लढाई समजून कार्यकर्त्यांनीच व्यूहरचना करून बाजी मारली. बिनविरोध संचालकांच्यागैरहजेरीची चर्चा प्रक्रिया गटात राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्यामुळे खासदार संजयकाका पाटील यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पितांबर पाटील बिनविरोध निवडून आले. त्यांच्या उमेदवारीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शंकर पाटील यांनी जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर सर्व विजयी उमेदवार उपस्थित असताना, पितांबर पाटील यांची गैरहजेरी मात्र प्रकर्षाने जाणवत होती. त्यांच्यासोबतच माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील आणि सूतगिरणीचे माजी संचालक दिलीपराव पवार हेही उपस्थित नव्हते. याबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा सुरू होती.