शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

आबांच्या सैन्याकडून काका गटाला धोबीपछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 00:08 IST

बाजार समिती निवडणूक : नाराजांच्या खांद्यावरून साधलेला भाजपचा निशाणा चुकला; काँग्रेसही चितपट

दत्ता पाटील- तासगाव --आर. आर. आबांच्या अनुपस्थितीत तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात बाहुबल अजमावताना राष्ट्रवादीने भाजपच्याविरोधात आपली ताकद पणाला लावली होती. नाराजांच्या खांद्यावरून खासदार संजय पाटील यांच्या गटाने धरलेला निशाणा चुकला आणि आबांच्या सैन्याने काका गटाला धोबीपछाड देत बघता-बघता मैदान मारले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चमत्कार घडविणाऱ्या काँग्रेसलाही त्यांनी चितपट केल्याने आबांच्या गटाने तालुक्यातील आपल्या ताकदीची प्रचिती या निवडणुकीतून दिली. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चोवीस वर्षांपासून बिनविरोधचा पायंडा होता. बाजार समितीसाठी मतदान असते, ही बाबच मतदार असणाऱ्या सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींना माहीत नव्हती. या निवडणुकीने मात्र मतदारांना हक्क बजावण्याची संधी मिळाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आघाडीचा फॉर्म्युला राबविण्यात आला. तेव्हापासूनच भाजप आणि राष्ट्रवादीच्या तासगाव बाजार समितीच्या आघाडीबाबत चर्चा सुरू झाली होती. दोन्ही पक्षांत याबाबत मतभिन्नता होतीच. किंंबहुना तालुक्याचे महत्त्वाचे सत्ताकेंद्र असल्यामुळे वर्चस्वासाठी जागावाटपात ओढाताणही सुरू होती. अगदी अखेरच्याक्षणी दोन्ही पक्षांकडून स्वबळ अजमावण्याचा निर्णय झाला.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तासगाव तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक वेगळाच फॉर्म्युला राबवला. राष्ट्रवादीच्या नाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सोसायटी गटात राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का दिला. तालुक्यात सोसायट्या आणि ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. मात्र राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदीचा फायदा घेऊन सत्तेत येण्याचा आत्मविश्वास भाजपच्या नेत्यांना होता. या जोरावरच भाजपने स्वबळ अजमावले. मात्र भाजपची व्यूहरचना फोल ठरली. तालुक्यात खासदार गट पूर्वीसारखाच अभेद्य आहे. मात्र राज्यात, केंद्रात सत्तेत असूनदेखील खासदार पाटील यांना राष्ट्रवादीतील नाराज मतदारांना भाजपकडे खेचून घेण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे. या विजयाने पक्षातील कार्यकर्त्यांत आलेली मरगळ जाऊन आत्मविश्वास दुणावला असल्याचे दिसून येत आहे. तसेच तिसरे स्वतंत्र पॅनेल उभे करून पक्षाची ताकद अजमावणाऱ्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनाही साफ अपयश आल्याचे दिसून आले. त्यांच्या पदरी एकही जागा आली नसल्याने त्यांना सर्वात मोठा हादरा बसला आहे. जिल्हा बँकेच्या फॉर्म्युल्याने कार्यकर्त्यांची एकजूट जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गाफील राहिल्यामुळेच राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला होता. यापेक्षा भाजपच्या खेळीचे शल्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बोचत होते. दोन्ही पक्षांची आघाडी असताना भाजपकडून राष्ट्रवादीतील नाराजांना हाताशी धरून कुरघोडीचे राजकारण झाले होते. या फॉर्म्युल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहाणपण घेतले. कार्यकर्त्यांनीच निवडणुकीची जबाबदारी अंगावर घेतल्यामुळे गटबाजीला थारा मिळाला नाही. ही खेळी भाजपच्या अंगलट आली.अविनाश पाटील यांची निर्णायक भूमिका या निवडणुकीत दिनकरआबा घराण्यातीलच भाजपचे नेते खासदार संजय पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अविनाश पाटील आमने-सामने आले होते. भाजपशी आघाडी करण्यासाठी प्रामुख्याने अविनाश पाटील यांचाच ठाम विरोध होता. खासदार पाटील यांनी राष्ट्रवादीवर केलेले शाब्दीक हल्ले अविनाश पाटील यांनीच परतवून लावले होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत आलेले सूतगिरणीचे संचालक युवराज पाटील आणि उमेदवार विठ्ठल काशीद यांचाही फायदा राष्ट्रवादीला झाला.स्वाभिमान डिवचल्याने अस्तित्वाची लढाई...बाजार समितीच्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत गटबाजी मोठ्या प्रमाणात होती. आर. आर. पाटील यांच्या पश्चात राष्ट्रवादीचे भवितव्य काय? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत होता. कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचलेले होते. अशा परिस्थितीत पक्षाची कोंडी झाली होती. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान डिवचला गेला. त्यामुळे अस्तित्वाची लढाई समजून कार्यकर्त्यांनीच व्यूहरचना करून बाजी मारली. बिनविरोध संचालकांच्यागैरहजेरीची चर्चा प्रक्रिया गटात राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्यामुळे खासदार संजयकाका पाटील यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पितांबर पाटील बिनविरोध निवडून आले. त्यांच्या उमेदवारीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शंकर पाटील यांनी जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर सर्व विजयी उमेदवार उपस्थित असताना, पितांबर पाटील यांची गैरहजेरी मात्र प्रकर्षाने जाणवत होती. त्यांच्यासोबतच माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील आणि सूतगिरणीचे माजी संचालक दिलीपराव पवार हेही उपस्थित नव्हते. याबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा सुरू होती.