शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

वारांगनाचा खून पैशाच्या वादातून

By admin | Updated: August 15, 2016 01:24 IST

एकास अटक : दोरीने गळा आवळला; एक महिला ताब्यात

सांगली : येथील गोकुळनगरमधील रेश्मा मुगूटसाब सनदी (वय ३५) या वारांगनाच्या खुनाचा उलगडा करण्यात विश्रामबाग पोलिसांना रविवारी यश आले. पैशाच्या वादातून तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संदीप मारुती कलगुटगी (२९, रा. वडर कॉलनी, सांगली) या संशयितास अटक करण्यात आली आहे. रेश्मासोबत राहणाऱ्या एका महिलेसही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रेश्मा तीन मुलींसोबत गोकुळनगरमधील चौथ्या गल्लीत राहत होती. शुक्रवारी रात्री एक ग्राहक तोंडाला रूमाल बांधून रेश्माकडे आला होता. तीन मुली दुसऱ्या खोलीत जेवण करीत होत्या. संशयित ग्राहक बारा वाजता रेश्माच्या खोलीतून बाहेर पडला. त्यानंतर मुली रेश्माला जेवण करायला बोलाविण्यास गेल्या असता, सुरुवातीला रेश्मा झोपलेल्या स्थितीत त्यांना दिसून आली होती. त्यांनी रेश्माला हाक मारली; पण काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे मुली घाबरून घराला बाहेरून कुलूप लावून जवळच्या झोपडीत राहायला गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मुलींनी रेश्माच्या बेळगाव येथील बहिणीशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. तिची बहीण आल्यानंतर रेश्माच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. रेश्माच्या नाकातून रक्तस्राव झालेला होता. डाव्या डोळ्याखाली काळसर जखम होती. गळ्यावर काळा व निळसर व्रण होता. डाव्या पायाच्या पोटरीवर हाताच्या नख्याने ओरबडलेले होते. तिचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी रेश्मासोबत राहणाऱ्या मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडून संदीप कलगुटगीचे नाव पुढे आले. त्याला तातडीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने रेश्माचा खून केल्याची कबुली दिली. संदीप गेल्या सहा वर्षांपासून रेश्माच्या संपर्कात होता. तो नेहमी तिच्याकडे येत असे. रेश्माकडे पैशाची मागणी करायचा. तीही त्याला पैसे देत असे. रेश्माने एका संस्थेत एक लाख ४० हजारांची गुंतवणूक केली होती. ही रोकड तिला आठवड्यापूर्वी मिळाली होती. ती संदीपला हवी होती. पण रेश्माने पैसे देण्यास नकार दिला होता. यातून त्यांच्यात चार दिवसांपासून वाद सुरू होता. शनिवारी रात्री तोंडाला रुमाल बांधून आलेला तो संशयित संदीपच होता. त्याने रेश्माकडे पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. हा वाद मुलीही ऐकत होत्या. त्यानंतर संदीपने लहान दोरीने रेश्माचा गळा आवळला. नाकावरही ठोसा मारला होता. मारहाणीत तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी) संशयिताला कोठडी अटकेत असलेल्या संदीपला रविवारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. सहाय्यक सरकारी वकील एस. एम. पखाली यांनी युक्तिवाद केला. संदीपचे रेश्मासोबत सहा वर्षांपासून संबंध होते. तो नेहमी तिच्याकडे पैशाची मागणी करायचा. यातूनच त्याने खून केल्याचे प्राथमिक कारण पुढे येत आहे. पण आणखी काय कारण आहे का? खुनात त्याच्यासह आणखी कुणाचा सहभाग आहे का? गळा आवळण्यासाठी त्याने कशाचा वापर केला, याचा उलगडा होणे गरजेचे असून, यासाठी त्याला पोलिस कोठडी द्यावी, अशी अ‍ॅड. पखाली यांनी मागणी केली. त्यावर न्यायालयाने संदीपला २० आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. रुमाल बांधला, पण आवाज तोच! संदीप पहिल्यांदाच तोंडाला रुमाल बांधून रेश्माकडे आला होता. रेश्माचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशानेच तो आला होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. रूमाल बांधल्याने मुलींनीही त्यास ओळखले नव्हते. रेश्मासोबत तो आवाज वाढवून भांडत असताना, मुलींनी त्याचा आवाज ओळखून संदीपच असल्याचा अंदाज बांधला होता. रेश्मा मृत झाल्यानंतर तो बारा वाजता तोंडाला रूमाल बांधूनच खोलीतून बाहेर पडला. महिलेकडे चौकशी : रेश्मासोबत राहणाऱ्या दोन मुली व एका महिलेस शनिवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दोन मुलींना रविवारी सकाळी सोडून दिले; पण एक महिला ताब्यात आहे. तिच्याकडे चौकशी केली जात आहे. तिचा खुनात सहभाग असण्याची शक्यता आहे. रेश्माच्या डाव्या पायाच्या पोटरीवर नखाने ओरबडलेली जखम कुणाची आहे? याचा तपास सुरू आहे.