शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

माधवनगरसह सात गावांत पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: May 5, 2017 23:23 IST

माधवनगरसह सात गावांत पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महावितरणने २५ लाखांच्या वीज बिल थकबाकीपोटी वीज पुरवठा तोडल्याने माधवनगरसह चार गावांची पाणी योजना बंद होऊन १२ दिवस पूर्ण झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरु आहे. माधवनगर व बुधगाव या गावांनी थोडीफार रक्कम जमा केली आहे. पण कवलापूर व बिसूरने अद्याप एक रुपयाही जमा केला नसल्याने, अजून सहा ते सात दिवस पाणी येणार नसल्याची शक्यता आहे. कधी जलवाहिनीला गळती, तर कधी वीज पुरवठा बंद, या कारणामुळे माधवनगरची पाणी योजना सातत्याने बंदच राहिली आहे. वर्षातील ३६५ दिवसांपैकी केवळ ४० ते ४५ वेळा माधवनगर, बुधगाव, कवलापूर व बिसूर या गावात पाणी येते. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक झाली. लोकप्रतिनिधी व उमेदवारांनी पाणीप्रश्न सोडविण्याची हमी दिली. पण गेल्या १२ दिवसांपासून या गावात पाणी नाही, याची साधी चौकशीही त्यांनी केली नाही. मे महिना असल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकेवर दहा ते पंधरा मिनिटे हापसल्यानंतर एक घागर पाणी येत आहे. कूपनलिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र उन्हाळ्यामुळे पाणीच येत नसल्याने ग्रामस्थांना सायकलला कॅन, घागरी अडकवून आसपासच्या शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. कवलापूरला एका तरुणाने वीस रुपयाला ४० लिटर घरपोच पाणी, अशी योजना सुरु केली आहे. हा तरुणही बाहेरुन कूपनलिकेचे पाणी आणून लोकांची तहान भागवत आहे. ज्या घरगुती कूपनलिकांना पाणी आहे, तिथे एक रुपयाला २० ते ३५ लिटरचा एक प्लॅस्टिकचा कॅन भरुन पाणी दिले जात आहे. तिथे पाण्यासाठी २४ तास गर्दी आहे. खर्चाच्या पाण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेऊन माधवनगर, बुधगाव ग्रामपंचायतीने चार-पाच लाख रुपयांची जुळवाजुळव केली आहे. अजूनही बिल भरण्यास तीन-चार लाख रुपये कमी पडतात. कवलापूर व बिसूरने ही रक्कम दिली असती, तर आतापर्यंत योजना सुरु झाली असती. बिसूरकरांची ६० हजारची जुळणी झाली आहे. कवलापूरकर मात्र, अजून जुळणी झाली नाही, असे सांगून हात वर करत आहेत. त्यांच्यामुळे योजना सुरु होण्यास विलंब होत आहे. कवलापुरात सोसायटीचा आधारकवलापूर येथे विकास सोसायटीने गतवर्षी शुद्धपेय जल योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत एक रुपयाला २० लिटर पाण्याची विक्री केली जात आहे. सभासद झाल्यास सोसायटी एटीएम कार्ड देते. या कार्डद्वारे पाच रुपयांना २० लिटर आणि कार्ड नसेल, तर पाच रुपयाचे क्वाईन टाकून दहा लिटर पाणी घेता येते. गेल्या १२ दिवसांपासून पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी सोसायटीमध्ये सकाळी सहापासून ते रात्री बारापर्यंत ग्रामस्थांच्या रांगा लागलेल्या असतात. उन्हाळ्यामुळे सोसायटीच्या कूपनलिकेला पाणी कमी येत आहे. ग्रामस्थांची गैरसोय नको, म्हणून सोसायटीने बाहेरून दररोज पाच हजार लिटरचे चार ते पाच टँकर खरेदी करुन शुद्ध पेय योजना नियमित सुरु ठेवली आहे.