शहरं
Join us  
Trending Stories
1
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
2
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
3
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
4
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
5
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
6
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
7
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
8
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
9
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
10
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
11
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
12
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
13
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
14
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
15
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
16
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
17
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
18
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
19
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
20
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी

अठराशे कृषी पंपांना वीज कनेक्शनची प्रतीक्षा

By admin | Updated: July 10, 2015 23:51 IST

तासगाव तालुक्यातील चित्र : ठेकेदार शिरजोर; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप--महावितरणचा बट्ट्याबोळ -२

दत्ता पाटील -तासगाव तालुक्यात तासगाव १, तासगाव २ आणि सावळज असे महावितरण कंपनीचे तीन उपविभाग आहेत. या तीन विभागात कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केलेल्या अठराशे शेतकऱ्यांना चार-पाच वर्षांपासून कनेक्शन मिळालेले नाही. मार्च २०१४ पर्यंतच्या कनेक्शन जोडणीच्या वर्क आॅर्डर ठेकेदार कंपनीला देऊनही, अद्यापही वीज कनेक्शन मिळालेले नाही. महावितरणचे उंबरठे झिजवून शेतकरी हतबल झाला आहे. ठेकेदार कंपनीची शिरजोरी, महावितरण कंपनीतील अधिकाऱ्यांचा सुस्तावलेपणा यामुळे शेती पंपाच्या वीज कनेक्शनकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.काही वर्षांपूर्वी महावितरणच्या कामांसाठी जिल्हास्तरावरुन निविदा काढून कामे देण्यात येत होती. मार्च २०१२ नंतर जिल्ह्यात शेतीपंपाच्या वीज कनेक्शन जोडणीसाठी निविदाच काढण्यात आलेली नाही. त्यानंतर सप्टेंबर २०१३ मध्ये दोन वर्षांसाठी शलाका इन्फ्राटेक, पुणे या एकाच कंपनीला मुख्यालयातूनच निविदा मंजूर करुन काम देण्यात आले. महावितरणची सर्वच कामे या कंपनीकडे आहेत. त्यामुळे या कंपनीकडून नव्याने फीडर जोडणी, ट्रान्स्फॉर्मर जोडणीपासून मोठ-मोठ्या निविदा असणाऱ्या कामांनाच प्राधान्य देऊन काम करण्यात येत आहेत. तालुक्यासह जिल्ह्यातील महावितरणची मोठ्या निविदेची कामे ठेकेदार कंपनीकडून तातडीने करण्यात येत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी सातत्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन उंबरठे झिजविले आहेत. मात्र सर्वच अधिकारी ठेकेदार कंपनीकडे बोट करुन, हात वर करीत आहेत. २०११ मध्ये महावितरण आपल्या दारी अशी योजना शासनाकडून आणण्यात आली होती. या योजनेअंतर्गत मागेल त्याला वीज कनेक्शन देण्याची मोहीम सुरु करण्यात आली होती. त्यानुसार अर्ज करणाऱ्यांना सहा महिन्यांत कनेक्शनही देण्यात आली. मात्र याच योजनेत समावेश असणाऱ्या तालुक्यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांना अद्यापही वीज कनेक्शनसाठी महावितरणचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. मार्च २०१४ पर्यंत कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केलेल्या तालुक्यातील अठराशे शेतकऱ्यांना महावितरणकडून मंजुरी देण्यात आली. त्याबाबतची वर्क आॅर्डरही ठेकेदार कंपनीकडे देण्यात आली. मात्र कंपनीकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. याचवेळी शेतीत स्वत: खांब उभे करून जादा पैसे देणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन मात्र तातडीने जोडली जात असल्याचे प्रकारही अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. शेतकऱ्यांना नियमानुसार अनामत रक्कम भरुन आणि कनेक्शन मंजुरी मिळूनही महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळेच उपेक्षा आलेली आहे. किमान शासनाने दखल घेऊन तातडीने कनेक्शन जोडून द्यावीत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.२०११ मध्ये शेतात खोदलेल्या कूपनलिकेला पाणी चांगले लागल्याचे दिसल्यानंतर, शेतीच्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केला. कनेक्शन मंजूर झाल्याचे पत्र कार्यालयाकडून आले. शेतात विजेचे खांब येऊन पडले. मात्र अजूनही कनेक्शन जोडण्यात आलेले नाही. कार्यालयात चौकशी केल्यावर मात्र अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जात आहे. - चंद्रकांत पाटील,बस्तवडे (ता. तासगाव)दोनशे घरे अंधारातघरगुती वापरासाठी कनेक्शन मिळण्याबाबत तालुक्यातून दोनशे अर्ज महावितरणकडे आलेले आहेत. या कनेक्शन्ससाठी खांब रोवण्याची आवश्यकता आहे. ही कनेक्शन्स देण्याबाबतही वर्क आॅर्डर देण्यात आलेली आहे. मात्र तरीही अद्याप कनेक्शन मिळालेली नसल्यामुळे दोनशे घरांत अद्यापही अंधाराचेच साम्राज्य आहे.