शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जेवणावळींसाठी निर्बंध हटण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरटे : कृष्णा कारखान्याची निवडणूक काही दिवसांवर आली असून, निर्बंधांमुळे जेवणावळी बंद आहेत. त्यामुळे दोन वर्षांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरटे : कृष्णा कारखान्याची निवडणूक काही दिवसांवर आली असून, निर्बंधांमुळे जेवणावळी बंद आहेत. त्यामुळे दोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या हॉटेल व्यावसायिकांना लॉकडाऊन कधी उठेल, याचे वेध लागले आहेत.

१९८९ नंतरच्या कृष्णाच्या प्रत्येक निवडणुकीकडे कारखाना कार्यक्षेत्राचे लक्ष लागून राहिलेले असते. तीन-तीन पॅनलमध्ये चुरशीच्या लढती होऊ लागल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची संख्याही मोठी असते. कार्यकर्ते सांभाळताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत असते.

निवडणूक म्हटले की जेवणावळ आलीच. त्यामुळे कार्यक्षेत्रातील हॉटेल व्यावसायिकांची निवडणुकीत चांदीच होत असते. गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचण व उलाढाल ठप्प झालेल्या हॉटेल व्यावसायिकांना कृष्णाच्या निवडणुकीतून आर्थिक उत्पन्न मिळेल अशी आशा होती; परंतु लॉकडाऊन व शासनाच्या निर्बंधामुळे गप्प बसावे लागत आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीसाठी काही दिवसच उरले आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात शासनाचे निर्बंध शिथिल होतील याकडे लक्ष लागून राहिले आहे.

चौकट

हॉटेल व्यावसायिकांबरोबर कार्यकर्त्यांनासुध्दा लॉकडाऊनचे नियम शिथिल होऊन जेवणावळी सुरू होतील अशी आशा आहे. स्पीकर, मंडपवाले, हार-तुरे, चारचाकी भाडोत्री वाहने या सर्वांनाच निवडणूक आर्थिक उत्पन्नाचे स्रोत आहे. अर्ज माघारीनंतर हॉटेलची जेवणावळ सुरू झाली नाही तर वाडी-वस्तीवरील जेवणावळीत वाढ होईल हे निश्चित.

कोट

इतर निवडणुकांपेक्षा कृष्णाच्या निवडणुकीत हॉटेल व्यावसायिकांना चांगले पैसे मिळतात. उत्तम दर्जाचे जेवण दिल्यास लाखो रुपयांची उलाढाल होत असते. कोरोनामुळे हा व्यवसाय आर्थिक अडचणीत आला आहे. शासनाचे निर्बंध उठले नाहीत तर सर्वांनाच नुकसान सोसावे लागणार आहे.

-रविराज देसाई, हॉटेल व्यावसायिक, शिरटे