शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

विटा पालिकेत पाणीपट्टी वाढीस विरोध

By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST

साडेचौसष्ट कोटीचा शिलकी अर्थसंकल्प : मूलभूत सुविधांसाठी भरीव तरतूद

विटा : विटा नगरपरिषदेच्या २०१६-२०१७ च्या ६४ कोटी ४६ लाख ६ हजार ५७ रूपयांच्या शिलकी अर्थसंकल्पास विशेष सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पाणी, आरोग्य, रस्ते, शिक्षण यांसह विविध मूलभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने मांडलेल्या वार्षिक ५०० रूपये पाणीपट्टी वाढीला दुष्काळाचे कारण देत नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनीच विरोध केला. त्यामुळे विटेकरांवरील पाणीपट्टी वाढीचे संकट दुष्काळामुळे टळले गेले. नगरपरिषदेच्या सभागृहात २०१५-२०१६ चा सुधारित व २०१६-२०१७ चा अनुमानित अर्थसंकल्प नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत मांडण्यात आला. प्रारंभी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. सचिन जाधव यांनी हा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. यावेळी आरंभीची शिल्लक १४ कोटी ८३ लाख १६ हजार ५७ रूपये व २०१६-२०१७ ची जमा ४९ कोटी ६२ लाख ९० हजार, असे एकूण ६४ कोटी ४६ लाख ६ हजार ५७ रूपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प सभेत सादर करण्यात आला.यावर्षीच्या अर्थसंकल्पात शहरात नवीन बसस्टॉप उभारणी व देखभाल- दुरूस्तीसाठी १५ लाख, तर शहरातील चौकांचे सुशोभिकरण करण्याच्या कामासाठी २५ लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण कामासाठी ८ लाख २८ हजार ७०० व मागासवर्गीय कल्याणकारी योजनेसाठी ८ कोटी २८ लाख ७०० आणि अंध व अपंग कल्याण निधीसाठी ४ लाख ९७ हजार २०० रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. रस्ता दुरूस्ती, रस्ता दुभाजक व पूल बांधकामासाठी २ कोटी ७५ लाख रूपयांची भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यासह बजरंगनगर येथील पाणीपुरवठा योजनेसाठीही अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे.या अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा झाली. या चर्चेत माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक किरण तारळेकर, विशाल पाटील, अनिल म. बाबर, कृष्णात गायकवाड यांनी सहभाग घेतला. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. मनीषा शितोळे, सौ. मीनाक्षी पाटील, माजी उपनगराध्यक्षा सौ. मालती कांबळे, नगरसेविका सौ. प्रतिभा चोथे, लता मेटकरी, मनीषा तारळेकर, स्वाती भिंगारदेवे, झाकीर तांबोळी, दहावीर शितोळे, हेमलता शितोळे, रूपाली मेटकरी, संजय कांबळे, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते. (वार्ताहर)दुष्काळी स्थिती : पाणीपट्टी वाढीला विरोधविटा शहराला घोगाव येथून कृष्णा नदीतून पिण्याचे पाणी आणले आहे. परंतु, या योजनेचा वाढता खर्च पाहता, ही योजना पूर्णपणे आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे हे संकट काही प्रमाणात दूर करण्यासाठी वार्षिक पाणीपट्टीत ५०० रूपयांची वाढ करावी, अशी सूचना प्रशासनाने मांडली. परंतु, दुष्काळी परिस्थिती असल्याने यावर्षी पाणीपट्टी वाढ करू नये, असा पवित्रा घेत नगरपरिषदेत सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांसह विरोधी गटानेही तीव्र विरोध केला.