शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘विसापूर-पुणदी’चे निव्वळ राजकारण!

By admin | Updated: May 28, 2015 00:59 IST

ग्रामस्थांमध्ये फसवणुकीची भावना : आठ गावांमधील दुष्काळ संपणार कधी?

प्रवीण पाटील - सावळज -तासगाव पूर्व भागाचा दुष्काळ कायमचा संपविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अथक् प्रयत्नातून विसापूर-पुणदी ही २७५ कोटी रुपये खर्चाची योजना पूर्ण केली. मात्र ज्या पूर्व भागातील आठ गावांसाठी ही योजना करण्यात आली, त्या आठ गावांचाच या योजनेत समावेश नसल्यामुळे जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नेत्यांकडून या आठ गावांतील जनतेची फसवणूक झाल्याची भावना आहे.सावळज, वायफळे, यमगरवाडी, बिरणवाडी, जरंडी, दहीवडी, सिध्देवाडी, डोंगरसोनी या गावांचा या योजनेत समावेश झालेला नाही. त्यामुळे या गावांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सिध्देवाडी तलावामध्ये पुणदी योजनेचे पाणी टाकून तेथून या गावांना पाणी मिळणार होते. मात्र या योजनेत या गावांचा समावेशच नसल्यामुळे पाणी मिळण्याचा प्रश्नच येत नाही.सावळज जिल्हा परिषद गटातूनच आर. आर. पाटील यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर कायम या भागातील जनतेने शेवटपर्यंत त्यांना साथ दिली. मात्र आज याच लोकांना शेतीसाठी तर सोडाच, पण पिण्यासाठीही पुरेसे पाणी नसल्याची परिस्थिती आहे. कमीत कमी पाण्यावर द्राक्षबागांच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांनी क्रांती केली. मात्र सततच्या दुष्काळामुळे द्राक्षबागा काढाव्या लागल्या. गेल्या वीस वर्षांपासून शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी सर्व प्रयत्न केले. पुणदी योजना पूर्ण झाल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या, पण या योजनेत समावेशच नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या आशेला निराशेचे ग्रहण लागले आहे.तत्कालीन आमदार संजय पाटील यांनी या योजनेत या गावांचा समावेश नसल्यामुळे आर. आर. पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर परिस्थिती बदलली. सध्या राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आले आहे. संजय पाटील खासदार झाले. मात्र खासदारांनी वर्षभरात या गावांचा समावेश या योजनेत का केला नाही?, असा सवाल या भागातील शेतकरी विचारत आहेत.आतापर्यंत सर्वच नेत्यांनी या योजनेचे भांडवल करून राजकीय स्वार्थ साधला. मात्र या आठ गावांतील लोकांचा नेत्यांनी विश्वासघात केला आहे. आतापर्यंत आश्वासने मिळाली, मात्र पाणी मिळालेले नाही. अजून किती काळ नेते नुसती आश्वासनेच देणार?, असा सवाल ग्रामस्थांतून होत आहे. विद्यमान आमदार व खासदारांनी या गावांचा या योजनेत समावेश करावा, अशी मागणी होत आहे.ना घर का ना घाट का !विसापूर-पुणदी योजनेत समावेश करण्यासाठी यापूर्वी या गावांकरिता टेंभू योजनेतून तामखडी येथून अग्रणीतून सिध्देवाडी तलावामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यात येणार होते. मात्र विसापूर-पुणदी योजनेची चर्चा सुरू झाल्यानंतर टेंभू योजनेतून ही गावे वगळण्यात आली. बदलत्या परिस्थितीत विसापूर-पुणदी योजनेतही या गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे ‘ना घर का ना घाट का’ अशी या गावांची अवस्था झाली आहे.या योजनेसाठी वापरल्या गेलेल्या जलवाहिन्या निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्यामुळे ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू केल्यानंतर अडचणी येणार आहेत. याचा प्रत्यय आरवडे येथे जलवाहिनी फुटल्यानंतर आला. एका नेत्याच्या निकटवर्तीयाच्या कारखान्यातून या जलवाहिन्या घेतल्या असून, त्या हलक्या दर्जाच्या आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने खासगीत दिली.