शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थांत भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यात बिबट्या आता सर्वत्र दिसू लागला आहे. हा बिबट्या नरभक्षक बनल्याने त्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा तालुक्यात बिबट्या आता सर्वत्र दिसू लागला आहे. हा बिबट्या नरभक्षक बनल्याने त्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पावले उचलण्याची गरज आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे पाळीव प्राण्यांबरोबरच मानवावर हल्ला करण्यापर्यंत मजल गेली असल्याने तालुक्यातील वाडी-वस्तीवर भीतीचे वातावरण आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्यानात बिबट्याचा वावर हा कायमचाच आहे. त्यातील काही बिबटे अन्नाच्या शोधत बाहेर पडले. त्यांचा वावर हा चांदोली राष्ट्रीय उद्यानापासून ६० किमी अंतरापर्यंत आहे. हा डोंगरी तालुका असल्याने बिबट्याला राहण्यासाठी सुरक्षित जागा आहे. आता उसाचे क्षेत्र वाढल्याने त्याच्यासाठी गावोगावी मिनी जंगल तयार झाले आहे. त्याला ससे, डुक्कर, कुत्री, वानरे हे चांगले खाद्य मिळू लागले आहे. राहायला सुरक्षित जागा व खायला पुरेसे अन्न व प्यायला नदी व पाझर तलावातील मुबलक पाणी मिळत असल्याने त्याला पुन्हा उद्यानात जाण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे बिबट्याने गावोगावी आपले वास्तव्य निर्माण केले आहे.

वन्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या आता माणसावर हल्ले करू लागला आहे. त्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

बिबट्याने आतापर्यंत तालुक्यातील मांगरूळ ,बिळाशी, वाकुर्डे, येळापुर, कुसाईवाडी, मांगले, मिरुखेवाडी, बेरडेवाडी, निगडी, शिराळा, मोरणा धरण, कांदे, कापरी, रेड, आदी परिसरातील पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारले आहे.

दोन वर्षांपूर्वी गोरक्षनाथ मंदिरजवळील बाह्य वळण रस्त्यावर बिबट्याने मोटारसायकलवर उडी मारून शिराळा येथील युवक अभिजित कुरणे यांच्या पायावर पंजा मारून जखमी केले होते. आठ महिन्यांपूर्वी चरण येथील युवक व त्यानंतर मांगले येथील युवकावर हल्ला केला होता. तडवळे येथे एक वर्षाच्या सुफीयानचा बळी घेतला.

जून महिन्यात घागरेवाडी येथे जनावरांच्या गोठ्यात घुसलेल्या व चार महिन्यांपूर्वी मांगले येथे बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे. पश्चिम घाटात बिबट्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक बिबटे जंगल सोडून बाहेर पडत आहेत. त्यामुळे तो ज्या भागात फिरतो, त्याच भागात कायम वास्तव्य करतो. त्या परिसरात अन्नासाठी भटकत असतो.

चौकट-

चांदोली अभयारण्यमधून बाहेर पडलेल्या बिबट्यांच्या पुढील पिढीचा जन्म ऊस, गावांजवळ असणाऱ्या वनराईमध्ये झाला आहे. त्यामुळे या नवीन पिढीला जंगलाशी संपर्क नाही. त्यामुळे तेथील भक्ष्य काय, आदींची माहिती नाही. त्यामुळे हे बिबटे या परिसरातच वाढत आहे. हे बिबटे ऊसपिकांच्या शेतातच फिरत आहेत. तिथे त्यांच्या अन्न साखळीत अडथळे निर्माण झाल्याने त्यांचे हल्ले मानवी वस्तीवरील जनावरे आणि माणसांवर सुरू झाले आहेत. काही महिन्यांत ही संख्या लक्षणीय असेल. त्यामुळे आतापासूनच यावर काही निर्बंध घालणे आवश्यक आहे.