शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कविसंमेलनात विषमतेवर प्रहार, विटा येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : नवोदित कवींच्या ज्वलंत प्रश्नावर कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:49 IST

विटा : आम्हाला आपापसात झुंजायला लावणारे ते लोक कोण होते? माणूस मारणारे ते लोक कोण होते? सत्यास जाळणारे व सामाजात चौफळी माजविणारे ते लोक कोण होते?

विटा : आम्हाला आपापसात झुंजायला लावणारे ते लोक कोण होते? माणूस मारणारे ते लोक कोण होते? सत्यास जाळणारे व सामाजात चौफळी माजविणारे ते लोक कोण होते? मूल्यास गाढणारे ते लोक कोण होते? असे विविध सवाल करीत विटा (जि. सांगली) येथील कविसंमेलनात प्रसिध्द गजलकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी, कोरेगाव-भीमा प्रकरणामुळे निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेवर भाष्य करीत प्रहार केला.विटा येथे रविवारी भारतमाता ज्ञानपीठ साहित्य सेवा मंडळ व मुक्तांगण वाचनालयाच्यावतीने आयोजित केलेल्या ३६ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सांगोलेकर बोलत होते.

कविसंमेलनाचे सरस्वतीपूजन कविता चव्हाण व बाळकृष्ण चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड. मोहनराव कदम, माधुरी कदम, सुधीर कुलकर्णी, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, रघुराज मेटकरी, डॉ. ऋषिकेश मेटकरी, वैशाली कोळेकर उपस्थित होते.

कविसंमेलनात सुमंत सगरे, राजाजी महाराज, अशोक ताटपुजे, साक्षी जाधव, शंकर कांबळे, शकुंतला होनमाने, संदीप शितोळे, नीता वीर, डॉ. प्रकाश जाधव, स्वाती शिंदे-पवार, बबुताई गावडे, हर्षवर्धन मेटकरी, प्रभाकर पाटील, वृषाली कुलकर्णी, दीपाली घाडगे, गौरी बागलकोटे, पृथ्वीराज भिंगारदेवे, सुभद्रा गायकवाड, सुवर्णा माळी, शबाना मुल्ला, नीशा वायदंडे, संजय नायकवडी, भीमराव कुंभार, नितीन गवळी, अनिल तावरे, अल्ताफ हुसेन मुजावर, शारदा कदम, विठ्ठल भागवत, अशोक पवार, शिवाजी जाधव, सुधाकर महामुनी, वीर राहुल, चंद्रकांत बल्लाळ, चंद्रवर्धन लांडगे, चंद्रकांत कान्हेरे, अमर गंगथडे, नवनाथ आडे, कृष्णा काळे, प्रा. दिनकर जगदाळे, प्रा. प्रकाश कुलकर्णी, अर्चना लाड, शाहीर पाटील, बाबूराव शेळके, दयासागर बन्ने, नामदेव भोसले, गौतम कांबळे, डॉ. अंजली रसाळ, देविका दिवटे, प्राची मेटकरी, दादा सावंत या कवींनी कविता सादर केल्या. त्यांच्या कविताना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

योगेश्वर मेटकरी यांनी प्रास्ताविक, तर रघुराज मेटकरी यांनी स्वागत केले. डॉ. ऋषिकेश मेटकरी यांनी आभार मानले.सामाजिक : विषयभारतमाता ज्ञानपीठ साहित्य सेवा मंडळ व मुक्तांगण वाचनालयाच्यावतीने आयोजित या कविसंमेलनात विविध निमंत्रित कवींनी स्त्री-भूणहत्या, राष्टÑीय एकात्मता, राजकारण, महागाई, आरक्षण, जातीय तंटे यासारख्या अनेक सामाजिक विषयांना स्पर्श करणाºया कविता सादर केल्या. याला उपस्थित श्रोत्यांकडून चांगलीच दाद मिळाली.विटा येथे रविवारी आयोजित केलेल्या कविसंमेलनात प्रसिध्द गजलकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कवयित्री सौ. स्वाती शिंदे-पवार, कवी सुधीर इनामदार, योगेश्वर मेटकरी उपस्थित होते.