शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

ग्रामविकासाच्यादृष्टीने अत्यंत चांगले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:20 IST

सांगली : गावाच्या विकासासाठी चिकाटीने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य काम करीत असतात. त्यांच्या कामाची नोंद घेतली पाहिजे. ‘लोकमत’ने सरपंचांचा गौरव करून ग्रामविकासासाठी राबणाºयांना सन्मान मिळवून दिला आहे. या पुरस्कारातून सरपंचांना निश्चित पे्ररणा मिळेल. ग्रामविकासाच्यादृष्टीने हे अत्यंत चांगले पाऊल आहे, असे मत पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव नाईक ...

सांगली : गावाच्या विकासासाठी चिकाटीने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य काम करीत असतात. त्यांच्या कामाची नोंद घेतली पाहिजे. ‘लोकमत’ने सरपंचांचा गौरव करून ग्रामविकासासाठी राबणाºयांना सन्मान मिळवून दिला आहे. या पुरस्कारातून सरपंचांना निश्चित पे्ररणा मिळेल. ग्रामविकासाच्यादृष्टीने हे अत्यंत चांगले पाऊल आहे, असे मत पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले.‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’चा सोहळा सांगलीत थाटात पार पडला. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाईक बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यात कृष्णाकाठावरील गावे सधन आहेत, तर पूर्वेला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात. अशा विचित्र परिस्थितीतही प्रत्येक गावातील सरपंच विकासासाठी अहोरात्र कार्यरत असतो. त्यांच्या कार्याची नोंद घेण्याची गरज होती. ती ‘लोकमत’च्या माध्यमातून पूर्ण झाली. आज ५० टक्के महिला सरपंच आहेत. चूल व मूल ही परिस्थितीही बदलली आहे. अनेक महिला सरपंच पुरूषांपेक्षा चांगले काम करीत आहेत. थेट सरपंच निवडीमुळे चांगल्या व्यक्ती, महिलेला संधी मिळाली आहे.गावाचा विकास ठराविक साच्यातून होत होता. रस्ते, गटारी या कामांना शासनाकडून निधी मिळतच राहील, पण या पायाभूत सुविधांपलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. गावातील नैसर्गिंक साधनसंपत्तीचा विचार करून नवीन उद्योगधंदे उभारले पाहिजेत. तरुणांच्या हाताला काम देण्याचा विचार झाला पाहिजे. शेतीवरील बोजाही कमी करण्याची गरज असल्याचे आ. नाईक यांनी सांगितले.गावाचे दारिद्र्य संपवागावाचा विकास म्हटले की, पाणी, रस्ते, शाळांच्या खोल्या बांधणे, मागासवर्गीय भागात काँक्रिटीकरण करणे, समाजमंदिरे बांधणे इतकाच विचार होतो. त्यापुढे जाऊन ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे की नाही? पायाभूत सुविधा निर्माण होतील. त्यासाठी शासन निधीही देईल. पण गावातील तरुणांना रोजगार दिला पाहिजे. हाताला काम देऊन दारिद्र्य संपविले पाहिजे, असे आ. नाईक यांनी सांगितले.