शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासाच्यादृष्टीने अत्यंत चांगले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:20 IST

सांगली : गावाच्या विकासासाठी चिकाटीने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य काम करीत असतात. त्यांच्या कामाची नोंद घेतली पाहिजे. ‘लोकमत’ने सरपंचांचा गौरव करून ग्रामविकासासाठी राबणाºयांना सन्मान मिळवून दिला आहे. या पुरस्कारातून सरपंचांना निश्चित पे्ररणा मिळेल. ग्रामविकासाच्यादृष्टीने हे अत्यंत चांगले पाऊल आहे, असे मत पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव नाईक ...

सांगली : गावाच्या विकासासाठी चिकाटीने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य काम करीत असतात. त्यांच्या कामाची नोंद घेतली पाहिजे. ‘लोकमत’ने सरपंचांचा गौरव करून ग्रामविकासासाठी राबणाºयांना सन्मान मिळवून दिला आहे. या पुरस्कारातून सरपंचांना निश्चित पे्ररणा मिळेल. ग्रामविकासाच्यादृष्टीने हे अत्यंत चांगले पाऊल आहे, असे मत पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले.‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’चा सोहळा सांगलीत थाटात पार पडला. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाईक बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यात कृष्णाकाठावरील गावे सधन आहेत, तर पूर्वेला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात. अशा विचित्र परिस्थितीतही प्रत्येक गावातील सरपंच विकासासाठी अहोरात्र कार्यरत असतो. त्यांच्या कार्याची नोंद घेण्याची गरज होती. ती ‘लोकमत’च्या माध्यमातून पूर्ण झाली. आज ५० टक्के महिला सरपंच आहेत. चूल व मूल ही परिस्थितीही बदलली आहे. अनेक महिला सरपंच पुरूषांपेक्षा चांगले काम करीत आहेत. थेट सरपंच निवडीमुळे चांगल्या व्यक्ती, महिलेला संधी मिळाली आहे.गावाचा विकास ठराविक साच्यातून होत होता. रस्ते, गटारी या कामांना शासनाकडून निधी मिळतच राहील, पण या पायाभूत सुविधांपलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. गावातील नैसर्गिंक साधनसंपत्तीचा विचार करून नवीन उद्योगधंदे उभारले पाहिजेत. तरुणांच्या हाताला काम देण्याचा विचार झाला पाहिजे. शेतीवरील बोजाही कमी करण्याची गरज असल्याचे आ. नाईक यांनी सांगितले.गावाचे दारिद्र्य संपवागावाचा विकास म्हटले की, पाणी, रस्ते, शाळांच्या खोल्या बांधणे, मागासवर्गीय भागात काँक्रिटीकरण करणे, समाजमंदिरे बांधणे इतकाच विचार होतो. त्यापुढे जाऊन ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे की नाही? पायाभूत सुविधा निर्माण होतील. त्यासाठी शासन निधीही देईल. पण गावातील तरुणांना रोजगार दिला पाहिजे. हाताला काम देऊन दारिद्र्य संपविले पाहिजे, असे आ. नाईक यांनी सांगितले.