शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

गांडूळ खत जमिनीसाठी फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : गांडूळ खत वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो. पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची मुबलक प्रमाणात उपलब्धता होऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : गांडूळ खत वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो. पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची मुबलक प्रमाणात उपलब्धता होऊन उत्पादनात वाढ होते, असे प्रतिपादन आमदार मानसिंगभाऊ यांनी केले.

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक कारखान्यात त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी आ. नाईक बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर प्रमुख उपस्थित होते.

आ. नाईक म्हणाले, रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे हळूहळू कल वाढतो आहे. कारखान्याने यापूर्वी द्रवरूप जैविक खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात तयार होणाऱ्या विविध उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्या वापराने उत्पादनात वाढ होत असल्याचे परिणाम दिसून आले आहेत. त्याला पूरक म्हणून आता कारखान्याने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला आहे. गांडूळ खत शेतीसाठी उपयुक्त आहे. त्याच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो. पिकासाठी अन्नद्रव्यांची मुबलक प्रमाणात उपलब्धता होते. जमिनीत जीवाणूच्या संख्येत वाढ होते. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परिणामी उत्पादन वाढून शेतकऱ्यांना फायदा होतो.

प्रारंभी मुख्य शेती अधिकारी विठ्ठल चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यकारी संचालक राम पाटील यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आ. पाटील यांच्या हस्ते गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाचे फीत कापून उद्घाटन झाले. यावेळी संचालक विजयराव नलवडे, विश्वास कदम, सुरेश पाटील, मानसिंग पाटील, बिरुदेव आमरे, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.