शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

शाकाहारच आरोग्याचा खरा मूलमंत्र: कल्याण गंगवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:50 IST

सांगली : मांसाहाराने मानवाच्या जीवनात तामसी प्रवृत्ती वाढते. शिवाय कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह यांसारख्या आजारांनाही निमंत्रण मिळते. मांसाहार हा माणसाच्या ...

सांगली : मांसाहाराने मानवाच्या जीवनात तामसी प्रवृत्ती वाढते. शिवाय कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह यांसारख्या आजारांनाही निमंत्रण मिळते. मांसाहार हा माणसाच्या शरीरासाठी बनलेला नाही. याउलट शाकाहारात अनेक पोषक घटक असतात. तोच आरोग्याचा खरा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी रविवारी सांगलीत केले.येथील नेमिनाथनगरमध्ये आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य नियमसागरजी महाराज, प्रबोधसागरजी महाराज, वृषभसागरजी महाराज, अभिनंदनसागरजी आणि सुपार्श्वसागरजी महाराज यांचा संयम स्वर्ण पावन वर्षायोग सुरू आहे. या महोत्सवानिमित्त रविवारी शाकाहार संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. गंगवाल बोलत होते. या संमेलनात डॉ. रावसाहेब पाटील (सोलापूर) व ‘बौध्द साहित्य व शाकाहार’ विषयावर डॉ. संघप्रकाश दुड्डे (सोलापूर) यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी संयोजक माजी महापौर सुरेश पाटील यांनी शाकाहार संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली.गंगवाल म्हणाले की, जैन समाज शाकाहारासाठी आग्रही राहिला आहे. अन्य समाजात शाकाहाराचा प्रसार करण्याची गरज आहे. शाकाहाराची लाट निर्माण झाल्यास मांसाहाराची दुकाने, कत्तलखाने बंद होतील. ही प्रक्रिया मोठी आहे. त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. एका व्यक्तीस शाकाहारी बनविले तरी, आपणास ५०० जिवांना अभयदान दिल्याचे पुण्य लाभेल. अनेक असाध्य आजारांचे कारण मांसाहार असल्याचे आता शास्त्रीयदृष्ट्याही स्पष्ट झाले आहे. भगवान महावीरांनी अहिंसेचा संदेश दिला. पण नकारात्मक अहिंसा महत्त्वाची नाही. त्याप्रमाणे दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी पुरूषार्थ दाखविण्याची गरज आहे. त्यातूनच अहिंसेचा संदेश समाजापर्यंत पोहोचू शकेल.डॉ. संघप्रकाश दुड्डे म्हणाले की, अडीच हजार वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांनी प्राणी हिंसेला विरोध केला होता. काया, वाचा व मन या तीनद्वारे माणूस हिंसा करीत असतो. भगवान बुद्धांनी शाकाहाराचा आग्रह धरला आहे. बौद्ध भिक्षूंनाही शाकाहाराबाबत २०८ नियम घालून दिले आहेत. वैराने वैर शमत नाही, तर ते अवैराने शमते, असे बुद्धांचे तत्त्वज्ञान होते. भगवान महावीर व भगवान बुद्ध यांच्या ‘जगा व जगू द्या’ या संदेशांची आज समाजाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दुड्डे यांनी पाली भाषेतील अनेक उदाहरणे देत बौद्ध साहित्यातील शाकाहारावर प्रकाशझोत टाकला.डॉ. रावसाहेब पाटील म्हणाले की, भगवान महावीर, भगवान गौतम बुद्धांच्या आधी भगवान नेमीनाथ तीर्थंकरांनी प्राणीहत्येविरोधात विद्रोह केला होता. शाकाहार हा केवळ कुठला पदार्थ नाही, तर तो जीवनशैलीचा भाग आहे. माणसाचे शरीर हे मांसाहारासाठी बनलेले नसून ते शाकाहारासाठीच आहे. पारंपरिक आहारामुळे जीवन सुदृढ बनते. अमेरिकेत चार माणसांमागे एक माणून मानसिक रोगी आहे. त्यामागे मांसाहार हेच कारण आहे.मिश्रआहार बंद करा : नियमसागर महाराजनियमसागर महाराज म्हणाले की, आपण शाकाहार करीत असलो तरी, संपूर्ण शाकाहारी बनलेलो नाही. भगवान महावीरांनी, सूर्यास्तानंतर भोजन केल्यास ते शाकाहारी असले तरी मांसाहारच मानले आहे. आपण पिण्याचे पाणी शोषून घेत नाही. त्यातून अनेक जिवाणू आपल्या शरीरात जातात. तन, मन, वाणीवर मांसाहाराचा विकृत परिणाम होत असतो. बेकरी उत्पादने हा शाकाहार व मांसाहाराचा मिश्र आहार आहे. पण आपण बेकरीतील उत्पादने खात असतो. त्यामुळे हा मिश्रआहार बंद केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.