शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

सांगलीत १७ पासून भाजीपाला विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST

सांगली : शहरात भाजीपाला विक्रीला अडथळा निर्माण करून विक्रेत्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या निषेधार्थ, मंगळवार १७ ऑगस्टपासून भाजी ...

सांगली : शहरात भाजीपाला विक्रीला अडथळा निर्माण करून विक्रेत्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या निषेधार्थ, मंगळवार १७ ऑगस्टपासून भाजी विक्री पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय जनसेवा भाजीपाला संघटनेने घेतला आहे. १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांनी सांगितले.

काटकर म्हणाले, कोरोनाच्या काळात संघटनेने जिवावर उदार होऊन घरोघरी भाजीपाला पुरविण्याचे काम केले. मात्र, अधिकृत भाजी मंडईच्या नावाखाली ठरावीक रस्त्यांवरच बाजार सुरू करायचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आठवडा बाजार बंद ठेवून अन्याय केला जात आहे. उपनगरांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून विक्रेत्यांनी भाजीपाला विक्री सुरू केली होती. मात्र, काही नगरसेवक व व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलीस व महापालिकेने विक्रेत्यांवर कारवाई करीत आहेत. त्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. विक्रेत्यांचा सन्मानाने जगण्याचा अधिकारही हिरावून घेतला जात आहे.

मारुती रोडवरील बेकायदेशीर बाजारावर डोळेझाक केली जात आहे. मिरजेतील लक्ष्मी मार्केट ते दत्त चौक या रस्त्यावरही बाजारातही प्रचंड गर्दी होते. तिथे कसलीच कारवाई होत नाही, पण उपनगरात नियमांचे पालन करून, भाजीपाला विक्री करणाऱ्यांवर नियमांचा बडगा उगारण्यात येत आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी जनसेवा भाजीपाला संघटनेच्या वतीने १७ ऑगस्टपासून शहरात भाजी विक्री बंद करण्यात येईल. १९ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे काटकर यांनी सांगितले.