शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दराअभावी भाजीपाला बागा काढून टाकल्या!

By admin | Updated: January 6, 2017 00:14 IST

मिरज पूर्व भागातील चित्र : शेतकरी हतबल; वांगी पाच रुपयात, तर ढबू मिरचीचे फुकटात वाटप

मोहन मगदूम ल्ल लिंगनूरअतिरिक्त आवक आणि नोटाबंदीमुळे दीड महिन्यापासून बाजारभाव गडगडल्याने मिरज पूर्व भागातील आरग, लिंगनूर, बेळंकी येथील शेतकरी भाजीपाला शेती काढून टाकत आहेत. सध्या बाजारात वांगी पाच रुपये किलोने विकली जात असून, ढबू मिरची तर फुकटही कोणी घेत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मिरज पूर्व भागातील शेतकरी कमी कालावधित जादा पैसे मिळवून देणारी भाजीपाल्याची पिके घेत असतात. मात्र सध्या भाजीपाला शेती दराअभावी तोट्यात जाऊ लागली आहे. बाजारपेठेत भाजीपाल्याची अतिरिक्त आवक होत आहे. त्यातच नोटाबंदीनंतर चलन तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून भाजीपाला उत्पादकांसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. सुटे पैसे नसल्याने तोटा सहन करावा लागत आहे. अतिरिक्त भाजीपाल्याची आवक झाल्याने भाजीपाल्याची विक्री कवडीमोल दराने करावी लागत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नाही. आर्थिक अडचणीत भरअनेकांनी कर्ज काढून बागा जतन केल्या होत्या. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीने यापूर्वीही अनेकदा शेतकऱ्यांना रडविले आहे. यंदा निसर्गाने साथ दिली असली, तरी बाजारातील परिस्थितीने शेतकऱ्यांना घाईला आणले आहे. दराचा प्रश्न इतका भेडसावत आहे की, आलेल्या बागा उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हतबलतेपाठोपाठ आता आर्थिक अडचणींची भर शेतकऱ्यांच्या आयुष्यात पडली आहे. त्यामुळे चिंतेचे ढग त्यांच्या शेतीवर दाटले आहेत. फुकटात वांगी वाटण्याची वेळलिंगनूर येथील भाजीपाला उत्पादक मनोहर नाईक यांनी तीस गुंठ्यामध्ये वांग्याची लागण केली असून, त्यासाठी चाळीस ते पन्नास हजार खर्च आला आहे. मात्र समाधानकारक दरच नसल्याने त्यांनी बाजारपेठेत वांगी पाठविणे बंद केले आहे. शेत रस्त्यालगतच असल्याने त्यांनी लोकांना वांगी फुकट देऊ केली, तरीही कोणी वांगी घेत नसल्यामुळे त्यांनी टॅ्रक्टरने वांग्याची सर्व शेती नांगरून टाकली. तीच परिस्थिती ढबू मिरचीची झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून लावलेली पिके काढून टाकली आहेत.ढबू मिरची तर फुकटही कोणी घेत नाहीवांगी पाच रुपये किलोने विकली जात आहेतआरग, लिंगनूर, बेळंकी येथील शेतकऱ्यांनी वांगी, ढबू मिरचीच्या बागा काढून टाकल्या आहेत