शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

‘वसंतदादा’ची ऊसतोड रोखली

By admin | Updated: October 15, 2015 00:27 IST

गळिताच्या प्रारंभीच खळबळ : ब्रह्मनाळ येथे ‘स्वाभिमानी’चा दणका

भिलवडी : एफआरपीनुसार उसाला हमीभाव जाहीर न करता ऊसतोड सुरू करणाऱ्या सांगली येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेने ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे सुरू केलेली ऊसतोड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांच्यासह कार्यकर्त्यांनी बंद पाडली.बुधवारी सकाळी सांगली येथे वसंतदादा कारखान्याने गळिताचा प्रारंभ केला. मात्र याचदिवशी स्वाभिमानीने आंदोलनाचे हत्यार उपसल्याने जिल्हाभर खळबळ उडाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व पलूस तालुका पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा यांनी वसंतदादा कारखान्याने गेल्या दोन गळित हंगामातील शेतकऱ्यांची थकित ऊसबिले दिल्याशिवाय कारखान्याचे धुराडे पेटवून देणार नसल्याचा इशारा दिला होता. यावेळी वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, भिलवडी, अंकलखोप आदी गावातील शेतकऱ्यांचे कारखाना प्रशासन कोट्यवधी रुपयांची देणीबाकी आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्यावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी कारखाना प्रशासनाने यंदाच्या हंगामापुरते सहकार्य करा, आम्ही मागची बिले देतो, असे आश्वासनही दिले होते.मात्र बुधवारी कारखान्याच्या गळित हंगामाचा प्रारंभ सुरू करीत असतानाच प्रशासनाला शेतकऱ्यांची बिले देण्याचा विसर पडला. पलूस तालुक्यात कारखान्याने ब्रह्मनाळ येथे ऊसतोड सुरू केली. एका शेतकऱ्यास कारखान्याचे कर्मचारी व ऊस वाहतूकदारांनी ‘तुम्ही आम्हास आता सहकार्य करा, आम्ही एफआरपीनुसार तुम्हाला दर देतो,’ असे सांगून बुधवारी सकाळी ऊसतोड सुरू केली. ही माहिती स्वाभिमानीच्या संदीप राजोबा यांना समजताच त्यांनी शेतात समक्ष जाऊन ऊसतोड रोखली. (वार्ताहर)बिल द्या : अन्यथा कांडेही देणार नाही...वसंतदादा सहकारी साखर कारखान्याकडून गेल्या दोन हंगामापासून ऊसबिले थकित आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे देण्यास टाळाटाळ होत आहे. कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांची गेल्या दोन गळीत हंगामातील थकित बिले दिल्याशिवाय वसंतदादा कारखान्याला उसाचे कांडेही देणार नसल्याचा इशारा संदीप राजोबा यांनी दिला आहे.