शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘वसंतदादा’कडे चाळीस कोटी थकित

By admin | Updated: July 8, 2014 00:45 IST

कारखान्यासमोर निदर्शने : शेतकरी शुक्रवारी रास्तो रोको आंदोलन करणार

सांगली : येथील वसंतदादा साखर कारखान्याला ऊस पाठविलेल्या सुमारे दोनशे शेतकऱ्यांना पहिला हप्ताही मिळाला नाही. या शेतकऱ्यांची सुमारे ४० ते ५० कोटींची रक्कम कारखान्याकडे थकित आहे. या शेतकऱ्यांनी थकित रक्कम त्वरित देण्याच्या मागणीसाठी कारखान्यासमोर निदर्शने करून प्रशासनाचा निषेध केला. १० जुलैपर्यंत पैसे न मिळाल्यास दि. ११ रोजी कारखान्यासमोरील सांगली-तासगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनाचा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची थकित रक्कम देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले.वसंतदादा कारखान्याला २०१३-१४ या वर्षाच्या गळीत हंगामासाठी ऊस देणाऱ्या निंबळक, नांद्रे, बुधगाव, कसबे डिग्रज, वसगडे, कुकटोळी, कवठेएकंद, कर्नाळ, कवलापूर, जुनी धामणी, बिसूर, बेडग, बांबवडे, बागणी आदी गावांतील दोनशेहून अधिक शेतकऱ्यांची बिले थकित आहेत. १५ फेबु्रवारी ते एप्रिलअखेरपर्यंत ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना पहिला हप्ताही मिळाला नााही. या शेतकऱ्यांचे सुमारे ४० ते ५० कोटी रुपये कारखान्याकडे थकले आहेत. शेतकरी गेल्या महिन्यापासून थकित बिलासाठी कारखाना प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांकडे प्रयत्न करीत आहेत. पण, उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. सोमवारी प्रशासनाने शेतकऱ्यांना बिल देण्यासाठी बोलाविले. परंतु, कारखाना कार्यालयात अधिकारीही नाहीत आणि कारखान्याच्या अध्यक्षांचाही पत्ता नव्हता. यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर जोरदार निदर्शने करून जाहीर निषेध केला. १० जुलैपर्यंत कारखान्याकडून बिल न मिळाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय सूर्यवंशी, अनिल सरगर, धोंडिराम पाटील, निंबळक येथील भागवत पाटील, शामराव साळुंखे, बाबासाहेब पाटणे, प्रकाश पाटील, पांडुरंग घारगे, सतीश पाटील आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थकित बिलाबाबत निवेदन दिले. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांची उपासमार सुरू असून, त्वरित निर्णय घेण्याची मागणी त्याद्वारे केली आहे. कारखाना प्रशासनाला थकित बिल देण्याबाबत सूचना देऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिले. त्यानंतर काही प्रमाणात संतप्त शेतकऱ्यांचे समाधान झाले. (प्रतिनिधी)