शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

म्हैसाळ योजनेसाठी वसंतदादा कारखाना एक कोटी भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 01:04 IST

विशाल पाटील : थकबाकीच्या प्रश्नाची कोंडी फुटली

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने दुष्काळी प्रश्नांची दखल घेत म्हैसाळ पाणी योजनेच्या आवर्तनासाठी एक कोटी रुपये भरण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून म्हैसाळ योजनेच्या थकित रकमेच्या प्रश्नाची कोंडी कारखान्याने फोडली आहे. म्हैसाळ योजनेची १८ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी आहे. एप्रिलपासूनच्या वीज बिलास ३३ टक्के सवलत मिळाली आहे. ती वजा केल्यास १४ कोटी ५१ लाख रुपये थकबाकी राहते. त्यापैकी किमान ७ कोटी २५ लाखांची रक्कम भरल्यास योजनेतून पाणीपुरवठा सुरू होऊ शकतो, हे पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी जानेवारीमध्ये झालेल्या बैठकीत खासदार व जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या बैठकीत वीज बिलाच्या थकबाकीपोटी ‘म्हैसाळ’च्या लाभक्षेत्रातील साखर कारखानदारांनी सव्वापाच कोटी, तर उर्वरित दोन कोटी रक्कम शेतकऱ्यांकडून भरून घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र, योजनेच्या लाभक्षेत्रात उसाचे प्रमाणच कमी असल्याने कारखानदारांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे थकबाकीचा प्रश्न पुन्हा रेंगाळला होता. दिवसेंदिवस हा प्रश्न जटिल होत असल्याने वसंतदादा कारखान्याने कोंडी फोडली. मदतीचा पहिला हात या कारखान्याने देण्याचा निर्णय घेतला. पुढील हंगामात या भागातून ऊस पुरवठा होईल, या अपेक्षेने आगाऊ पैसे भरण्याचे आवाहन जानेवारीतील बैठकीत करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत वसंतदादा कारखान्याने हे पाऊल उचलले आहे. कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील म्हणाले की, वसंतदादांच्या संकल्पनेतून ही योजना उभारली आहे. थकित रकमेसाठी योजना बंद पडत असेल, तर अशावेळी योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी वसंतदादा कारखान्याचीच आहे. त्यामुळे आम्ही या भागातील शेतकऱ्यांसाठी एक कोटी रुपये भरण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेच्या कार्यक्षेत्रातील अन्य कारखान्यांनीही पैसे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)