शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

‘वसंतदादा’ची निवडणूक बिनविरोध?

By admin | Updated: April 30, 2016 00:51 IST

सत्ताधाऱ्यांकडून चर्चा सुरू : ‘स्वाभिमानी’ला एक जागा मिळणार

सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे सर्वच अर्ज बाद झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनेच्या प्रदीप पाटील गटाबरोबर सत्ताधाऱ्यांनी चर्चा सुरू केली आहे. दोन्ही गटाला प्रत्येकी एक जागा देऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही हालचाली सुरू आहेत. असे असले तरी, दि. १२ मे रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्याचदिवशी बिनविरोधचा अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत १८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत यातील ९0 उमेदवारी अर्ज बाद झाले. छाननी प्रक्रिया संपली, तेव्हा ७७ उमेदवारांचे ९२ अर्ज शिल्लक राहिल्याचे चित्र आहे. सत्ताधारी गटासह शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य बहुतांश इच्छुकांचे अर्ज बाद झाले. आरक्षित जागांवरील उमेदवारांना सलग तीन वर्षे ऊस पुरवठ्याचा नियम लागू नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले. उत्पादक गटातच सर्वाधिक उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यामुळे वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीचे चित्रच बदलून गेले आहे. या निवडणुकीत आता कोणाचेही पॅनेल होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. यामध्येही शेतकरी संघटनेतील फुटीर गट असलेल्या प्रदीप पाटील समर्थक सहा उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आरक्षित जागेवर संभाजी मेंढे यांचा एकमेव अर्ज राहिला आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे सर्वच अर्ज बाद ठरल्यामुळे वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकच राहिलेला नाही, असे चित्र आहे. सत्ताधाऱ्यांना निवडणूक बिनविरोध करणे सध्या खूपच सोपे झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रदीप पाटील गटाला एखादी जागा देण्याबाबत चर्चा आहे. परंतु, काहींनी त्यांना जागा देण्याबाबत विरोध केला आहे. निवडणूक बिनविरोधसाठी पाटील यांच्याशी सत्ताधाऱ्यांना चर्चा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)