शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

पूर्व, पश्चिम, उत्तरेतील गावांची बदलती कहाणी--राजकीय भूगोल

By admin | Updated: September 18, 2014 23:23 IST

सांगली मतदारसंघ : ग्रामीण व शहरी भागातील मतांच्या संमिश्र गणितावर राजकारणाची मदार

अविनाश कोळी - सांगली -दक्षिणेचा भाग सोडला, तर सांगली विधानसभा मतदारसंघातील अन्य तीन दिशांच्या गावांचे सांगली विधानसभा मतदारसंघाशी असलेले नाते बदलत राहिले. या मतदारसंघातील पश्चिमेची गावे इस्लामपूर मतदारसंघाशी, तर पूर्व व उत्तरेची काही गावे मिरज मतदारसंघाशी जोडली व नंतर तोडली गेली. या बदलांचे फारसे परिणाम मात्र येथील निकालांवर दिसून आले नाहीत. सांगली विधानसभा मतदारसंघात सांगली शहरासह चारही बाजूंना असणाऱ्या छोट्या-छोट्या गावांचा समावेश आहे. सध्या महापालिका क्षेत्र वगळता अन्य बारा गावे या मतदारसंघात समाविष्ट आहेत. गत निवडणुकीत सांगली मतदारसंघात मोठे बदल झाले. या मतदारसंघात पूर्वी तुंग, कसबे डिग्रज, मिरजवाडी, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, मौजे डिग्रज, नावरसवाडी ही पश्चिम भागातील काही वाळवा व मिरज तालुक्यातील गावांचा समावेश इस्लामपूर मतदारसंघात झाला. या भागातून आ. संभाजी पवार यांना चांगली मते मिळाल्याच्या नोंदी आहेत. ही गावे गेल्यानंतर गत निवडणुकीत संभाजी पवारांच्या समर्थकांत नाराजीचा सूर उमटत होता. तरीही अन्य ग्रामीण भागातून गतवेळी त्यांना काँग्रेस उमेदवारापेक्षा अधिक मते मिळाली होती. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहिला, तर या मतदारसंघात बदल होऊनही निवडणूक निकालात ग्रामीण आणि शहरी असे वेगवेगळे चित्र कधीच दिसले नाही.१९७८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मिरज पूर्व भागातील गावे कवठेमहांकाळला जोडून मतदारसंघाची फेररचना करण्यात आली. त्याऐवजी पश्चिम भागातील नांद्रे, वसगडे, बिसूर, कवलापूर, बुधगाव, माधवनगर ही काँग्रेस समर्थकांची मोठी संख्या असलेली गावे मिरज मतदारसंघाला जोडण्यात आली होती. सध्या यातील माधवनगर, बिसूर, नांद्रे, बुधगाव ही गावे सांगली मतदारसंघात आहेत. अंकली, इनाम धामणी व हरिपूर ही गावे कायम सांगलीशी संलग्न राहिली. पूर्वी कुपवाड व वानलेसवाडी हा भाग सांगलीत नव्हता. १९९८ ला महापालिका झाली आणि नंतर हे दोन्ही भाग सांगली विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आले. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील मोठी लोकसंख्या आता या मतदारसंघातील निकालासाठी निर्णायक ठरू लागली आहेत. या मतदारसंघातील मतदारसंख्या आता सव्वा तीन लाखाच्या घरात आहेत. यातील बहुतांश मतदार महापालिका क्षेत्रातील आहेत. बारा गावांमधील जनतेचा कौल आणि शहरी भागातील कौल संमिश्र राहिला. पश्चिम आणि पूर्वेकडील गावांची सारखी अदलाबदल झाल्याने याठिकाणी दीर्घकाळ कोणत्याही पक्षाचे, नेत्याचे वर्चस्व राहिले नाही. पद्माळ, कर्नाळ, नांद्रे या गावांवर आजही काँग्रेसचे वर्चस्व आहे. वसंतदादांचे मूळ गाव पद्माळे हे सांगली मतदारसंघात कायम राहिले. वसंतदादांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. १९५२ ते १९८५ पर्यंत उत्तर-पूर्व गावांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते. आता या गावांमध्ये वर्चस्वाचा दावा कोणीही करू शकत नाही. राजकारण बदलले२00९ च्या निवडणुकीत मतदारसंघात बदल झाले. गतवेळी आ. संभाजी पवार व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील एकत्र होते. या एकीचा फायदा पश्चिमेकडील गावांमध्ये झाला. यंदाच्या निवडणुकीत यातील काही गावे इस्लामपूरला जोडली गेली आहेत. जयंत पाटील व संभाजी पवारांमध्ये दरी आल्याने पश्चिमेची गावे आणि महापालिका क्षेत्रात दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांविरोधात कुरघोड्या करण्याची चिन्हे आहेत.