शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

वाळवा तालुक्याचा मृत्युदर जिल्ह्यात सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्याचा मृत्युदर महाराष्ट्र व देशाच्या मृत्युदरापेक्षा अधिक असून जिल्ह्यात सर्वाधिक मृत्युदर वाळवा तालुक्याचा ३.८८ टक्के इतका आहे. ...

सांगली : जिल्ह्याचा मृत्युदर महाराष्ट्र व देशाच्या मृत्युदरापेक्षा अधिक असून जिल्ह्यात सर्वाधिक मृत्युदर वाळवा तालुक्याचा ३.८८ टक्के इतका आहे. विभागनिहाय विचार केल्यास ग्रामीण व शहरी भागाच्या तुलनेत महापालिका क्षेत्रातील मृत्युदर सर्वाधिक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी मृत्युदर अधिक आहे, तिथे कडक उपाययोजना करण्याची व अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा कहर अजूनही कायम आहे. कडक लॉकडाऊन सुरू असतानाही रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. दररोज १ हजार २०० च्या घरात रुग्णसंख्या असून, मृत्यूचे आकडे ४० ते ५० च्या घरात कायम आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येपेक्षा मृत्युदराची चिंता अधिक आहे. सध्याची उपलब्ध खाटांची त्यातही ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्सच्या खाटांची संख्या पाहिली तर ती खूपच कमी आहे. वेळेत उपचार मिळणे, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचा बेड मिळणे आता कठीण होत आहे. अनेकांना रुग्णालयातील बेड मिळण्याच्या प्रतीक्षेत थांबून रहावे लागत आहे. ही स्थितीच मृत्युदर वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

जत, आटपाडी, खानापूर या दुष्काळी पट्ट्यातील तसेच अन्य तालुक्यांतील लांबच्या गावांत आढळणाऱ्या रुग्णांना तालुकास्तरावर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नसल्याने त्यांना कित्येक किलोमीटरचे अंतर कापत सांगली, मिरजेत यावे लागते. तोपर्यंत उशीर होतो. त्यामुळेही मृत्यूच्या घटना वाढत आहेत. मृत्यूचे प्रमाण का वाढत आहे, याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्याची अधिक गरज आहे. सध्या अशा उपाययोजना होताना दिसत नाहीत.

चौकट

विभागनिहाय मृत्युदर

ग्रामीण २.७८

शहरी ३.०८

महापालिका क्षेत्र ३.१९

जिल्ह्याचा एकूण २.९३

चौकट

तालुकानिहाय मृत्युदर

आटपाडी १.११

जत २.११

कडेगाव २.८६

क. महांकाळ २.८६

मिरज ३.०७

पलूस ३.५९

तासगाव ३.८४

वाळवा ३.८८

चौकट

काय आहेत कारणे?

वेळेत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर न मिळणे

रुग्णालयातील बेड लवकर उपलब्ध न होणे

मदत कक्ष व रुग्णालयातील समन्वयाचा अभाव असल्याने रुग्णांचे हेलपाटे

तातडीने निदान न होणे

खासगी रुग्णालयात तपासणी न करताच औषधोपचार घेणे

ग्रामीण स्तरावर वैद्यकीय उपकरणांची कमतरता