शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

वाळवा तालुक्याचा मृत्युदर जिल्ह्यात सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्याचा मृत्युदर महाराष्ट्र व देशाच्या मृत्युदरापेक्षा अधिक असून जिल्ह्यात सर्वाधिक मृत्युदर वाळवा तालुक्याचा ३.८८ टक्के इतका आहे. ...

सांगली : जिल्ह्याचा मृत्युदर महाराष्ट्र व देशाच्या मृत्युदरापेक्षा अधिक असून जिल्ह्यात सर्वाधिक मृत्युदर वाळवा तालुक्याचा ३.८८ टक्के इतका आहे. विभागनिहाय विचार केल्यास ग्रामीण व शहरी भागाच्या तुलनेत महापालिका क्षेत्रातील मृत्युदर सर्वाधिक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी मृत्युदर अधिक आहे, तिथे कडक उपाययोजना करण्याची व अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा कहर अजूनही कायम आहे. कडक लॉकडाऊन सुरू असतानाही रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. दररोज १ हजार २०० च्या घरात रुग्णसंख्या असून, मृत्यूचे आकडे ४० ते ५० च्या घरात कायम आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येपेक्षा मृत्युदराची चिंता अधिक आहे. सध्याची उपलब्ध खाटांची त्यातही ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्सच्या खाटांची संख्या पाहिली तर ती खूपच कमी आहे. वेळेत उपचार मिळणे, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचा बेड मिळणे आता कठीण होत आहे. अनेकांना रुग्णालयातील बेड मिळण्याच्या प्रतीक्षेत थांबून रहावे लागत आहे. ही स्थितीच मृत्युदर वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

जत, आटपाडी, खानापूर या दुष्काळी पट्ट्यातील तसेच अन्य तालुक्यांतील लांबच्या गावांत आढळणाऱ्या रुग्णांना तालुकास्तरावर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नसल्याने त्यांना कित्येक किलोमीटरचे अंतर कापत सांगली, मिरजेत यावे लागते. तोपर्यंत उशीर होतो. त्यामुळेही मृत्यूच्या घटना वाढत आहेत. मृत्यूचे प्रमाण का वाढत आहे, याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्याची अधिक गरज आहे. सध्या अशा उपाययोजना होताना दिसत नाहीत.

चौकट

विभागनिहाय मृत्युदर

ग्रामीण २.७८

शहरी ३.०८

महापालिका क्षेत्र ३.१९

जिल्ह्याचा एकूण २.९३

चौकट

तालुकानिहाय मृत्युदर

आटपाडी १.११

जत २.११

कडेगाव २.८६

क. महांकाळ २.८६

मिरज ३.०७

पलूस ३.५९

तासगाव ३.८४

वाळवा ३.८८

चौकट

काय आहेत कारणे?

वेळेत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर न मिळणे

रुग्णालयातील बेड लवकर उपलब्ध न होणे

मदत कक्ष व रुग्णालयातील समन्वयाचा अभाव असल्याने रुग्णांचे हेलपाटे

तातडीने निदान न होणे

खासगी रुग्णालयात तपासणी न करताच औषधोपचार घेणे

ग्रामीण स्तरावर वैद्यकीय उपकरणांची कमतरता