शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांच्या माना सुरी घेऊन बसलेल्या खासगी रुग्णालयांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:27 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात आजअखेर २ हजार ३२१ इतकी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. त्यातील १ हजार ८१३ रुग्ण घरीच ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात आजअखेर २ हजार ३२१ इतकी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. त्यातील १ हजार ८१३ रुग्ण घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत. तर ४९७ रुग्ण तालुक्यातील १८ कोविड उपचार केंद्रांमध्ये प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. ११ रुग्ण तालुक्याबाहेर उपचार घेत आहेत. इस्लामपूर आणि आष्टा येथील शासकीय रुग्णालयांकडे १० अतिदक्षता तर ५५ ऑक्सिजन बेडची तोकडी व्यवस्था आहे. उर्वरित खासगी रुग्णालयांमध्ये १६५ आयसीयू बेड तर ५२४ ऑक्सिजन वॉर्ड बेडची सुविधा असल्याने कोरोना रुग्णांना आपला जीव मुठीत धरून हातात सुरी घेऊन बसलेल्या खासगी रुग्णालयांच्या ताब्यात आपली मान द्यावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे.

कृष्णा-वारणा नदीच्या पट्ट्यातील सधन तालुका म्हणून वाळवा तालुक्याची ओळख असली तरी कोरोना महामारीच्या निमित्ताने येथील आरोग्य व्यवस्था कमालीची तोकडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयूचे केवळ १० बेड हीच इथल्या आरोग्य व्यवस्थेची लुळी-पांगळी अवस्था दाखविणारी आहे. तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांच्या बाधित होण्याचा दर हा ३० टक्क्यांपर्यंत गेला आहे. त्यामुळे या सर्व रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था इथल्या शासकीय आरोग्य यंत्रणेकडे नसल्याचे स्पष्ट होत आहे.

वाळवा तालुक्यात इस्लामपूर आणि आष्ट्यासह एकूण १७ कोविड उपचार केंद्रे आहेत. त्यामध्ये १८५ आयसीयू बेडस् आणि ५२४ वॉर्ड बेडस् अशी एकूण ७०९ बेडची व्यवस्था आहे. आजअखेर अतिदक्षता विभागात १७० रुग्ण तर वॉर्डमध्ये २९० रुग्ण उपचार घेत आहेत. मोठ्या प्रमाणात घरीच विलगीकरणात असणारे रुग्ण हे कोविड नियमावलीचे पालन करत नसल्याने एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती बाधित झाल्याच्या घटना समोर येत आहेत, अशी भयावह परिस्थिती कानावर येत असतानाही प्रशासन मात्र केवळ बैठका आणि वरिष्ठांना आकडेवारी देण्याच्या कामातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. गावागावांतील स्थानिक समित्याही वाईटपणा कोणी घ्यायचा या मानसिकतेत असल्याने कोलमडून पडल्याचे चित्र आहे.

चौकट

खासगी रुग्णालयांकडून शासनाच्या कोविड उपचार सेंटरमधील मार्गदर्शक तत्त्वांना तिलांजली दिली जात असल्याचे चित्र आहे. काही अपवाद वगळता अनेक खासगी रुग्णालये हातात सुरी घेऊन बसल्याच्याच सुरस कथा बाहेर येत असतात. मात्र येथील आमदार, खासदारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना याचे काहीही देणे-घेणे उरलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांना मरण्यासाठी खासगी रुग्णालयातच जाण्याचा पर्याय निवडावा लागत असल्याचे भयावह चित्र आहे. आपण समाजाचे देणे लागतो, ही शुद्ध भावना असणारी दिलदारी प्रशासन, समाज आणि लोकप्रतिनिधींच्या पातळीवर कुठेच दिसत नाही.