शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांच्या माना सुरी घेऊन बसलेल्या खासगी रुग्णालयांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:27 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात आजअखेर २ हजार ३२१ इतकी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. त्यातील १ हजार ८१३ रुग्ण घरीच ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात आजअखेर २ हजार ३२१ इतकी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. त्यातील १ हजार ८१३ रुग्ण घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत. तर ४९७ रुग्ण तालुक्यातील १८ कोविड उपचार केंद्रांमध्ये प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. ११ रुग्ण तालुक्याबाहेर उपचार घेत आहेत. इस्लामपूर आणि आष्टा येथील शासकीय रुग्णालयांकडे १० अतिदक्षता तर ५५ ऑक्सिजन बेडची तोकडी व्यवस्था आहे. उर्वरित खासगी रुग्णालयांमध्ये १६५ आयसीयू बेड तर ५२४ ऑक्सिजन वॉर्ड बेडची सुविधा असल्याने कोरोना रुग्णांना आपला जीव मुठीत धरून हातात सुरी घेऊन बसलेल्या खासगी रुग्णालयांच्या ताब्यात आपली मान द्यावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे.

कृष्णा-वारणा नदीच्या पट्ट्यातील सधन तालुका म्हणून वाळवा तालुक्याची ओळख असली तरी कोरोना महामारीच्या निमित्ताने येथील आरोग्य व्यवस्था कमालीची तोकडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयूचे केवळ १० बेड हीच इथल्या आरोग्य व्यवस्थेची लुळी-पांगळी अवस्था दाखविणारी आहे. तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांच्या बाधित होण्याचा दर हा ३० टक्क्यांपर्यंत गेला आहे. त्यामुळे या सर्व रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था इथल्या शासकीय आरोग्य यंत्रणेकडे नसल्याचे स्पष्ट होत आहे.

वाळवा तालुक्यात इस्लामपूर आणि आष्ट्यासह एकूण १७ कोविड उपचार केंद्रे आहेत. त्यामध्ये १८५ आयसीयू बेडस् आणि ५२४ वॉर्ड बेडस् अशी एकूण ७०९ बेडची व्यवस्था आहे. आजअखेर अतिदक्षता विभागात १७० रुग्ण तर वॉर्डमध्ये २९० रुग्ण उपचार घेत आहेत. मोठ्या प्रमाणात घरीच विलगीकरणात असणारे रुग्ण हे कोविड नियमावलीचे पालन करत नसल्याने एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती बाधित झाल्याच्या घटना समोर येत आहेत, अशी भयावह परिस्थिती कानावर येत असतानाही प्रशासन मात्र केवळ बैठका आणि वरिष्ठांना आकडेवारी देण्याच्या कामातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. गावागावांतील स्थानिक समित्याही वाईटपणा कोणी घ्यायचा या मानसिकतेत असल्याने कोलमडून पडल्याचे चित्र आहे.

चौकट

खासगी रुग्णालयांकडून शासनाच्या कोविड उपचार सेंटरमधील मार्गदर्शक तत्त्वांना तिलांजली दिली जात असल्याचे चित्र आहे. काही अपवाद वगळता अनेक खासगी रुग्णालये हातात सुरी घेऊन बसल्याच्याच सुरस कथा बाहेर येत असतात. मात्र येथील आमदार, खासदारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना याचे काहीही देणे-घेणे उरलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांना मरण्यासाठी खासगी रुग्णालयातच जाण्याचा पर्याय निवडावा लागत असल्याचे भयावह चित्र आहे. आपण समाजाचे देणे लागतो, ही शुद्ध भावना असणारी दिलदारी प्रशासन, समाज आणि लोकप्रतिनिधींच्या पातळीवर कुठेच दिसत नाही.