शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

वैभव नायकवडी काँग्रेसच्या वाटेवर

By admin | Updated: July 25, 2014 23:35 IST

हालचालींना गती : मुंबई, दिल्ली दौरे वाढले

महेंद्र किणीकर -वाळवाक्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे सुपुत्र व हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी काँग्रेसच्या संपर्कात असून लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. अलीकडील काळात त्यांच्या मुंबई, दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. शिवाय प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे.नागनाथअण्णांनी वयाच्या आठव्या वर्षी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सभेत तिरंगा खांद्यावर घेतला होता. तो स्वातंत्र्य मिळेपर्यंत खाली ठेवला नाही. अण्णांनी जातीयवादी पक्षांना कधीही जवळ केले नाही. डाव्या विचारसरणीनेच त्यांची वाटचाल राहिली. दलित समाजाच्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी अण्णांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. राजारामबापू पाटील जनता पक्षात गेल्यानंतर वाळवा तालुक्यात त्यांना नागनाथअण्णांनी टोकाचा विरोध केला. त्यांचे पुत्र वैभव नायकवडी यांनी आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांना समान अंतरावर ठेवले होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्लापाण्णा आवाडे यांचा प्रचार केला होता. तेव्हापासून त्यांची काँग्रेसशी जवळीक वाढली आहे. २००९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याविरोधात लढवली होती. शिवसेना, भाजप किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यापेक्षा काँग्रेस हाच एकमेव पर्याय मानून त्यांनी त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. अण्णांच्या जयंती कार्यक्रमानंतर वैभव नायकवडी यांच्या मुंबई, दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या असून विधानसभा निवडणुकीआधी ते पक्षप्रवेशाचा निर्णय जाहीर करतील, असे सांगितले जाते. नागनाथअण्णांनी हुतात्मा संकुलाच्या सर्व संस्थांमधील कारभारात पारदर्शकता आणली. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाने निर्माण झालेला अण्णांचा दबदबा व तीव्र लढा यामुळे राज्यकर्त्यांना भरलेली धडकी सर्वश्रुत आहे. मात्र अण्णांच्या निधनानंतर तीन वर्षात ही किमया ओसरू लागली आहे. वैभव नायकवडी यांना अपक्ष राहून करणे अशक्य आहे. त्यामुळेच त्यांनी सक्रिय राजकारणात उतरून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे हुतात्मा संकुलातून चर्चिले जात आहे.हुतात्मा संकुलाच्या कार्यक्रमांना आतापर्यंत कधीही एकाच राजकीय पक्षाचे प्रमुख निमंत्रित केले जात नव्हते, परंतु नागनाथअण्णांच्या १५ जुलैरोजी झालेल्या जयंती कार्यक्रमास प्रथमच काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व ज्येष्ठ सिनेअभिनेते माजी खासदार राज बब्बर, तर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. कार्यक्रमानंतर नायकवडी यांची दोन्ही नेत्यांशी बंद खोलीत काँग्रेस प्रवेशाबाबत खलबते झाल्याची चर्चा आहे.