शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

वैभव नायकवडी काँग्रेसच्या वाटेवर

By admin | Updated: July 25, 2014 23:35 IST

हालचालींना गती : मुंबई, दिल्ली दौरे वाढले

महेंद्र किणीकर -वाळवाक्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे सुपुत्र व हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी काँग्रेसच्या संपर्कात असून लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. अलीकडील काळात त्यांच्या मुंबई, दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. शिवाय प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे.नागनाथअण्णांनी वयाच्या आठव्या वर्षी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सभेत तिरंगा खांद्यावर घेतला होता. तो स्वातंत्र्य मिळेपर्यंत खाली ठेवला नाही. अण्णांनी जातीयवादी पक्षांना कधीही जवळ केले नाही. डाव्या विचारसरणीनेच त्यांची वाटचाल राहिली. दलित समाजाच्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी अण्णांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. राजारामबापू पाटील जनता पक्षात गेल्यानंतर वाळवा तालुक्यात त्यांना नागनाथअण्णांनी टोकाचा विरोध केला. त्यांचे पुत्र वैभव नायकवडी यांनी आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांना समान अंतरावर ठेवले होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्लापाण्णा आवाडे यांचा प्रचार केला होता. तेव्हापासून त्यांची काँग्रेसशी जवळीक वाढली आहे. २००९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याविरोधात लढवली होती. शिवसेना, भाजप किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यापेक्षा काँग्रेस हाच एकमेव पर्याय मानून त्यांनी त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. अण्णांच्या जयंती कार्यक्रमानंतर वैभव नायकवडी यांच्या मुंबई, दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या असून विधानसभा निवडणुकीआधी ते पक्षप्रवेशाचा निर्णय जाहीर करतील, असे सांगितले जाते. नागनाथअण्णांनी हुतात्मा संकुलाच्या सर्व संस्थांमधील कारभारात पारदर्शकता आणली. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाने निर्माण झालेला अण्णांचा दबदबा व तीव्र लढा यामुळे राज्यकर्त्यांना भरलेली धडकी सर्वश्रुत आहे. मात्र अण्णांच्या निधनानंतर तीन वर्षात ही किमया ओसरू लागली आहे. वैभव नायकवडी यांना अपक्ष राहून करणे अशक्य आहे. त्यामुळेच त्यांनी सक्रिय राजकारणात उतरून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे हुतात्मा संकुलातून चर्चिले जात आहे.हुतात्मा संकुलाच्या कार्यक्रमांना आतापर्यंत कधीही एकाच राजकीय पक्षाचे प्रमुख निमंत्रित केले जात नव्हते, परंतु नागनाथअण्णांच्या १५ जुलैरोजी झालेल्या जयंती कार्यक्रमास प्रथमच काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व ज्येष्ठ सिनेअभिनेते माजी खासदार राज बब्बर, तर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. कार्यक्रमानंतर नायकवडी यांची दोन्ही नेत्यांशी बंद खोलीत काँग्रेस प्रवेशाबाबत खलबते झाल्याची चर्चा आहे.