शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

‘उदगिरी’ची ऊस वाहतूक रोखली

By admin | Updated: December 26, 2014 00:18 IST

मंगरूळ चिंचणीत प्रकार : रस्ते उखडल्याने ग्रामस्थ संतप्त

पारे : चिंचणी (मं.) येथील संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी रात्री सात वाजता उदगिरी शुगरची ऊस वाहतूक सुमारे दोन तास रोखून धरली. गेल्या दोन वर्षापासून बामणी-पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीमुळे चिंचणी (मं.) परिसरातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरूस्त करावेत, तसेच पारे तलावातून ओढ्यात सोडण्यात आलेले पाणी कारखान्याने उचलू नये, यासह विविध मागण्या ग्रामस्थांनी केल्या. यावेळी कारखाना प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. अखेर कारखान्याचे उपाध्यक्ष एन. एस. कदम यांनी तातडीने रस्ते दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.बामणी-पारे येथील उदगिरी शुगर अ‍ॅन्ड पॉवर या साखर कारखान्यासाठी कार्वे-चिंचणी ते बामणी आणि रिकाम्या गाड्यांसाठी बामणी ते मंगरूळमार्गे असा ऊस वाहतुकीचा मार्ग तयार केला आहे. या ऊस वाहतुकीमुळे कार्वे, मंगरूळ, चिंचणी, बामणी परिसरातील रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. चिंचणी येथील विद्यालयाजवळच रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच पारे तलावातून रब्बी पिकांसाठी पाटबंधारे विभागाने ओढ्याला पाणी सोडले आहे. पारे हद्दीत ओढ्यालगत असलेल्या एका विहिरीतील पाणी कारखान्यासाठी वापरले जाते. त्यामुळे रब्बी पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे हे पाणीही तातडीने बंद करावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती.या पार्श्वभूमीवर बुधवारी चिंचणी (मं.) येथील संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी या मागण्यांसाठी विद्यालयाजवळ उदगिरी कारखान्याची ऊस वाहतूक सुमारे दोन तास रोखून धरली. त्यावेळी प्रशासन अधिकारी अमोल पाटील पोलीस कुमक घेऊनच घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे ग्रामस्थ जास्तच आक्रमक झाले. कारखान्याच्या उपाध्यक्षांनाच बोलवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यानंतर तासाभरानंतर उपाध्यक्ष कदम आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची मागणी मान्य करीत तातडीने रस्त्यांची दुरूस्ती करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रोखून धरलेली ऊस वाहतूक पूर्ववत सुरू झाली. यावेळी चिंचणी येथील सरपंच शिवाजीराव निकम, किसन निकम, बालाजी निकम, विकास शिंदे, कुमार निकम उपस्थित होते. (वार्ताहर)आश्वासनानंतर वाहतूक सुरळीतउदगिरी कारखान्याची ऊस वाहतूक सुमारे दोन तास रोखून धरली. यावेळी प्रशासन अधिकारी अमोल पाटील पोलीस कुमक घेऊनच घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे ग्रामस्थ जास्तच आक्रमक झाले. कारखान्याच्या उपाध्यक्षांनाच बोलवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यानंतर तासाभरानंतर उपाध्यक्ष कदम आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची मागणी मान्य करीत तातडीने रस्त्यांची दुरूस्ती करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रोखून धरलेली ऊस वाहतूक पूर्ववत सुरू झाली.