शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

वापरलेले मास्क जातात महापालिकेच्या घंटागाडीतून कचरा डेपोवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:26 IST

सांगली : शहरातील वाढत्या लोकसंख्येसोबतच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्नही तितकाच मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यात नागरिकांनी वापरलेल्या मास्कचे काय केले ...

सांगली : शहरातील वाढत्या लोकसंख्येसोबतच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्नही तितकाच मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यात नागरिकांनी वापरलेल्या मास्कचे काय केले जाते, असा प्रश्न पडतो. घरातील कचऱ्यातून येणारे मास्क घंटागाडीतून कचरा डेपोवर जातात. तर रुग्णालयातील कचऱ्याची भस्मीकरण केंद्रात प्रक्रिया केली जात असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिकेने गेल्या दोन ते तीन वर्षांत कचरा उठाव करणारी यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे. कचरा उचलण्यासाठी लागणारी वाहनांची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या प्रत्येक प्रभागासाठी दोन रिक्षा घंटागाड्या आहेत. या रिक्षा घंटागाड्या नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन कचरा उचलत आहेत. कचरा गोळा करताना ओला कचरा आणि सुका कचरा असे विघटनही करण्यात येत नाही. तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाही महापालिकेकडे नाही. घनकचरा प्रकल्प रखडल्याचे परिणाम कोरोनाच्या काळात समोर येत आहेत. कोरोनामुळे मास्क, सॅनिटायझर वापराचे प्रमाण वाढले आहे. कचऱ्यामध्ये मास्क, हँड ग्लोव्ह्ज यासारखे घटकही पहायला मिळतात. हा कचरा घंटागाडीतून कचरा डेपोवर जातो. तिथे मास्क, ग्लोव्हज वेगळे केले जात नाहीत.

चौकट

रुग्णालयातील कचऱ्यावर होते प्रक्रिया

वैद्यकीय महाविद्यालयात दैनंदिन कचऱ्यासोबतच आता कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा वापराचा कचरा जमा होतो. यामध्ये पीपीई कीट, मास्क, हँड ग्लोव्ह्ज, ऑपरेशनचे साहित्य यासह विविध निरूपयोगी साहित्य कचऱ्यामध्ये टाकण्यात येते. वैद्यकीय महाविद्यालये, कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये जमा होणाऱ्या या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. मिरजेत या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे युनिट आहे. तिथे हा कचरा भस्म केला जातो. अलीकडे या कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे.

चौकट

दररोजच्या कचऱ्यातील मास्कचे काय?

महापालिका हद्दीत जमा होणारा संपूर्ण कचरा वाहनांद्वारे शहराबाहेरील कचरा डेपोवर नेऊन टाकला जातो. सांगलीतील कचरा समडोळी रस्त्यावरील तर मिरज, कुपवाडचा कचरा बेडग रोडवरील डेपोवर टाकला जातो. कचऱ्यामध्ये मास्क, हँड ग्लोव्ह्ज, कीट यासह अनेक वस्तू पहायला मिळतात. शहरातील नागरिकांनी रस्त्यावर टाकलेला हा कचरा जमा होऊन तो शहराच्या बाहेर टाकला जातो. याठिकाणी कचऱ्यात मास्कसारख्या वस्तू पहायला मिळतात.

कोट

आरोग्याच्यादृष्टीने सर्वांनीच मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. मास्क वापरल्यानंतर तो निर्जंतुकीकरण करणेही गरजेचे आहे. मास्क उघड्यावर फेकणे हे सर्वाधिक धोकादायक आहे. यापासून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी कचऱ्यामध्ये मास्क न टाकता ते एका साईडला ठेवायला हवेत. नागरिकांनी मास्क कुठेही न फेकता त्याची खबरदारी घेण्याची आणि प्रसार न होण्याची काळजी घेतली पाहिजे.

- डाॅ. रवींद्र ताटे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका