शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

कत्तलखान्याचा वापर व्यापारी कारणांसाठी

By admin | Updated: June 12, 2017 23:48 IST

कत्तलखान्याचा वापर व्यापारी कारणांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरजेत महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या कत्तलखान्याचा खासगी ठेकेदाराच्या मांस निर्यातीच्या व्यवसायासाठी वापर सुरु आहे. ठेकेदाराच्या कारभारामुळे चर्चेत असलेल्या कत्तलखान्याची पाहणी करून कारवाई करणार असल्याचे प्रभाग समिती सभापती शुभांगी देवमाने यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील मोठ्या जनावरांच्या कतलीसाठी मिरजेत बेडग रस्त्यावर सुमारे तीन कोटी रुपये खर्चून कत्तलखान्याची उभारणी करण्यात आली आहे. हा कत्तलखाना चालविण्यासाठी मुंबईच्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. हा ठेकेदार उपठेकेदारामार्फत हा कत्तलखाना चालवित आहे. महापालिकेने केलेल्या करारातील अटींचे कत्तलखान्यात उल्लंघन सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.जिल्ह्यातील व स्थानिक जनावरे कापण्यासाठी कत्तलखान्याची उभारणी करण्यात आली असताना, कर्नाटकातील जनावरे आणून मोठ्या शहरात मांस निर्यात करण्याचा उद्योग सुरु आहे. स्थानिक मांस विक्रेते शहरापासून दूर असलेल्या कत्तलखान्याकडे जात नसल्याने परजिल्ह्यातील जनावरे कापून मांस निर्यातीच्या व्यवसायासाठी महापालिकेच्या कत्तलखान्याचा वापर सुरु आहे. कापण्यात येणाऱ्या जनावरांची वैद्यकीय तपासणी न करता, पशुवैद्यक तज्ज्ञाच्या अनुपस्थितीत जनावरांची कत्तल करुन आर्थिक फायद्यासाठी रात्रंदिवस कत्तलखाना चालविण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. जनावरांची आतडी व अन्य टाकाऊ अवयवांची विल्हेवाट लावण्याऐवजी ते आजुबाजूच्या परिसरात टाकण्यात येत असल्याने मोकाट कुत्र्यांचा उपद्रव सुरु आहे. ठेकेदाराशी कराराप्रमाणे कत्तलखान्याच्या नूतनीकरणाचे काम अपूर्ण आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमांच्या उल्लंघनाबद्दल कत्तलखान्याला टाळे ठोकले होते. मात्र त्यानंतरही कत्तलखान्याचा कारभार सुधारलेला नाही. काही नगरसेवक व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीमुळे ठेकेदाराकडून कत्तलखान्याचा व्यापारीकरणासाठी वापर सुरुच आहे. कत्तलखान्यात जनावरांच्या चरबीपासून तेल तयार करण्याचा व हाडांवर प्रक्रिया करण्याचा विनापरवाना उद्योग सुरु आहे. महापालिका प्रभाग समिती सभेत कत्तलखान्याच्या ठेकेदाराच्या नियमबाह्य कारभाराबाबत शुभांगी देवमाने यांनी कत्तलखान्याची पाहणी करुन तेथील गैरप्रकार बंद करणार असल्याचे सांगितले. ठेकेदाराची न्यायालयात धाव यापूर्वीचा ठेका रद्द करण्यात आल्याने ठेकेदाराने ४८ कोटी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. कत्तलखान्याचे अर्थकारण मोठे असल्याने कारभारी नगरसेवकांच्या मर्जीतील ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येते. प्रभाग समिती सभेत कत्तलखान्यात निर्बंध असलेल्या जनावरांचीही कत्तल होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. कुत्र्यांचा मोठा उपद्रवकत्तलखान्यातील टाकाऊ कचऱ्यामुळे परिसरातील गावांना कुत्र्यांचा मोठा उपद्रव होत आहे. पाच वर्षापूर्वी मोकाट कुत्र्यांनी टाकळीतील एका बालिकेवर हल्ला करुन तिचा बळी घेतला. मात्र त्यानंतरही कत्तलखान्यातील जनावरांच्या टाकाऊ अवयवांच्या विल्हेवाटीबाबत काहीच उपाययोजना झालेली नाही.