शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

कत्तलखान्याचा वापर व्यापारी कारणांसाठी

By admin | Updated: June 12, 2017 23:48 IST

कत्तलखान्याचा वापर व्यापारी कारणांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरजेत महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या कत्तलखान्याचा खासगी ठेकेदाराच्या मांस निर्यातीच्या व्यवसायासाठी वापर सुरु आहे. ठेकेदाराच्या कारभारामुळे चर्चेत असलेल्या कत्तलखान्याची पाहणी करून कारवाई करणार असल्याचे प्रभाग समिती सभापती शुभांगी देवमाने यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील मोठ्या जनावरांच्या कतलीसाठी मिरजेत बेडग रस्त्यावर सुमारे तीन कोटी रुपये खर्चून कत्तलखान्याची उभारणी करण्यात आली आहे. हा कत्तलखाना चालविण्यासाठी मुंबईच्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. हा ठेकेदार उपठेकेदारामार्फत हा कत्तलखाना चालवित आहे. महापालिकेने केलेल्या करारातील अटींचे कत्तलखान्यात उल्लंघन सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.जिल्ह्यातील व स्थानिक जनावरे कापण्यासाठी कत्तलखान्याची उभारणी करण्यात आली असताना, कर्नाटकातील जनावरे आणून मोठ्या शहरात मांस निर्यात करण्याचा उद्योग सुरु आहे. स्थानिक मांस विक्रेते शहरापासून दूर असलेल्या कत्तलखान्याकडे जात नसल्याने परजिल्ह्यातील जनावरे कापून मांस निर्यातीच्या व्यवसायासाठी महापालिकेच्या कत्तलखान्याचा वापर सुरु आहे. कापण्यात येणाऱ्या जनावरांची वैद्यकीय तपासणी न करता, पशुवैद्यक तज्ज्ञाच्या अनुपस्थितीत जनावरांची कत्तल करुन आर्थिक फायद्यासाठी रात्रंदिवस कत्तलखाना चालविण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. जनावरांची आतडी व अन्य टाकाऊ अवयवांची विल्हेवाट लावण्याऐवजी ते आजुबाजूच्या परिसरात टाकण्यात येत असल्याने मोकाट कुत्र्यांचा उपद्रव सुरु आहे. ठेकेदाराशी कराराप्रमाणे कत्तलखान्याच्या नूतनीकरणाचे काम अपूर्ण आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमांच्या उल्लंघनाबद्दल कत्तलखान्याला टाळे ठोकले होते. मात्र त्यानंतरही कत्तलखान्याचा कारभार सुधारलेला नाही. काही नगरसेवक व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीमुळे ठेकेदाराकडून कत्तलखान्याचा व्यापारीकरणासाठी वापर सुरुच आहे. कत्तलखान्यात जनावरांच्या चरबीपासून तेल तयार करण्याचा व हाडांवर प्रक्रिया करण्याचा विनापरवाना उद्योग सुरु आहे. महापालिका प्रभाग समिती सभेत कत्तलखान्याच्या ठेकेदाराच्या नियमबाह्य कारभाराबाबत शुभांगी देवमाने यांनी कत्तलखान्याची पाहणी करुन तेथील गैरप्रकार बंद करणार असल्याचे सांगितले. ठेकेदाराची न्यायालयात धाव यापूर्वीचा ठेका रद्द करण्यात आल्याने ठेकेदाराने ४८ कोटी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. कत्तलखान्याचे अर्थकारण मोठे असल्याने कारभारी नगरसेवकांच्या मर्जीतील ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येते. प्रभाग समिती सभेत कत्तलखान्यात निर्बंध असलेल्या जनावरांचीही कत्तल होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. कुत्र्यांचा मोठा उपद्रवकत्तलखान्यातील टाकाऊ कचऱ्यामुळे परिसरातील गावांना कुत्र्यांचा मोठा उपद्रव होत आहे. पाच वर्षापूर्वी मोकाट कुत्र्यांनी टाकळीतील एका बालिकेवर हल्ला करुन तिचा बळी घेतला. मात्र त्यानंतरही कत्तलखान्यातील जनावरांच्या टाकाऊ अवयवांच्या विल्हेवाटीबाबत काहीच उपाययोजना झालेली नाही.