शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

उरमोडीचे पाणी खटाव-माणला आणणार

By admin | Updated: April 7, 2017 22:50 IST

सदाभाऊ खोत : येरळवाडी धरणाच्या डाव्या पोटकालव्याचे काम तातडीने सुरू

वडूज : ‘येरळा धरणालगत सुरू असलेला वाळू उपसा गंभीर बाब असून, संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. टंचाईची भयानकता लक्षात घेऊन लवकरच उरमोडीचे पाणी खटाव, माणला देण्याचे नियोजन केले जाईल. येरळवाडी धरणातही हे पाणी सोडण्यात येणार आहे,’ अशी माहिती सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.येरळवाडी धरणाच्या डाव्या पोटकालव्याच्या दुरुस्तीचा प्रारंभ खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभापती संदीप मांडवे, प्रांत दादासाहेब कांबळे, तहसीलदार प्रियांका पवार-कर्डिले, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तानाजी देशमुख, शंकर फडतरे, लाभक्षेत्रातील गावोगावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.सदाभाऊ खोत यांनी येरळवाडी धरण येथे भेट देऊन पाणीसाठ्याची माहिती घेतली. येणाऱ्या कालावधीत धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. चार दिवसांपूर्वी वडूज येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीत येरळवाडी कालव्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन खोत यांनी दिले होते. आज प्रत्यक्ष पाहाणी करून त्यांनी या कामाचा प्रारंभही केला. पाटबंधारे विभागाकडून कालव्यातील गाळ काढणे आणि रुंदीकरणासाठी यांत्रिक सामुग्री उपलब्ध करण्यात आली.खटाव आणि माण तालुक्यांतील वडूज, मायणी, औंध, पुसेसावळी, आंधळी, शिंगणापूर या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीजबिलाच्या प्रश्नांबाबत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे खोत यांनी सांगितले. उरमोडी योजनेचे पाणी येणाऱ्या टंचाई काळात खटाव आणि माण तालुक्यात सोडण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, येरळवाडीच्या पोटकालव्याचे काम सुरू झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी झेडपी सदस्य सुरेंद्र गुदगे, सरपंच शिवाजी, ज्ञानेश्वर इंगवले, अतुल पवार, सचिन दहातोंडे, सरपंच अनिल उपस्थित होते. (प्रतिनिधी)वाळू उपशाबाबत त्वरित कारवाई ...येरळवाडी धरणाच्या पायथ्यालगत खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. वाळूमाफियांच्या बेसुमार वाळू उपशामुळे धरणाला धोका निर्माण होत असल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी वारंवार निदर्शनास आणूनही महसूल विभागाकडून कारवाई करण्यात दिरंगाई होत आहे. शुक्रवारी सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घातले. अधिकाऱ्यांना वाळू उपशाविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. धरण कुरतडणाऱ्या वाळूमाफियांशी लागेबांधे असणारे अधिकारी याप्रकरणी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.घरात वर्षश्राद्ध असून दौरा..सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरात वर्षश्राद्धाचा दु:खद विधी असताना देखील दुष्काळी भागातील टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन त्यांनी भर उन्हात चार किलोमीटर चालत येरळा तलाव परिसराची पाहणी केली. सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना दिल्या. या हजरजबाबीपणामुळे उपस्थित शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले.