शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निष्कलंक, निष्ठावंत, अजातशत्रू नेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:38 IST

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून सबंध महाराष्ट्र आमदार शिवाजीराव देशमुख यांच्याकडे पाहतो. घरामध्ये कसलाही राजकीय वारसा नव्हता.

ठळक मुद्देसलग ५ वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून, तर काँग्रेसकडून त्यांची बिनविरोध ४ वेळा विधानपरिषद सभापती म्हणून निवड झाली.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून सबंध महाराष्ट्र आमदार शिवाजीराव देशमुख यांच्याकडे पाहतो. घरामध्ये कसलाही राजकीय वारसा नव्हता. तरीही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अधिराज्य गाजविले. वसंतदादा पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. घरची परिस्थिती हलाकीची असतानाही पदवीपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्यांनी नोकरी करण्याचा मनोदय केला. पंचायत समिती तासगाव येथील कृषी विभागात नोकरीस सुरुवात केली.

दरम्यानच्या काळामध्ये कामाच्या निमित्ताने त्यांचा वारंवार वसंतदादा पाटील यांच्याशी संवाद होत होता. त्यांची जवळीक वाढत गेली. दादांनीच देशमुख यांना राजकारणात येण्याचा आग्रह धरला. १९६८ ला कोयना भूकंपाच्यावेळी देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना मदत केली. देशमुख यांची मोठ्या प्रमाणात लोकप्रियता होती. त्यातूनच त्यांची जिल्हा परिषदेला बिनविरोध निवड झाली.

१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. प्रचंड रस्सीखेच झाली. देशमुख यांच्याबदल संपूर्ण पोषक वातावरण होते. लोकांचे प्रचंड पाठबळ त्यांना मिळाले. १९७८ ला उमेदवारी काँग्रेसने नाकारली होती. त्यानंतर लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयश्री खेचून आणली. अपक्ष म्हणून निवडणूक जिंकल्यानंतर देशमुख यांना पाहण्यासाठी मुंबई विधानभवनमध्ये प्रचंड गर्दी केली होती. देशमुख यांनी वसंतदादांची भेट घेऊन काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला होता.

शिराळा तालुका डोंगरी व दुर्मिळ भाग असल्याने विकासाबाबत हा मतदारसंघ खूप मागे होता. विकासात्मक प्रगती साधण्यासाठी देशमुख यांनी पहिल्यापासून प्रयत्न केले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा डोंगरी परिषद शिराळा येथे भरवली. या परिषदेमध्ये शिराळा तालुका संपूर्ण डोंगरी तालुका म्हणून घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांचा मोठा फायदा आजही लोकांना होत आहे. १९८३ ला वैद्यकीय शिक्षणासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सोय व्हावी, यासाठी खासगी महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी शासनाकडून मान्यता मिळवून घेतली.

राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पाटबंधारे, राज्यमंत्री, परिवहनमंत्री, गृहमंत्री म्हणून मोठे काम त्यांनी केले. गृहमंत्री असताना ‘भिवंडी’ येथे दोन समाजात जातीय दंगल घडली होती. त्यावेळी देशमुख यांनी स्वत: त्याठिकाणी जाऊन ही दंगल शांत केली होती. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे विशेष कौतुक करून सन्मान केला होता.

गृहमंत्री असताना क्रीडा क्षेत्रात खेळणाऱ्या खेळाडूंना पोलीस दलात भरतीसाठी विशेष सवलत सुरु केली होती. देशमुख यांनी शिराळा मतदारसंघातील व त्यांच्या संबंधित युवकांना पोलीस दलात मोठ्या प्रमाणात नोकरीस लावले होते. एका एका गावात २० ते ३० युवक पोलीस दलात भरती केले. राज्याचे पुनर्वसनमंत्री असताना पुनर्वसित बाधित कुटुंबातील मुलांना शासकीय नोकरीत २ टक्के राखीव जागा ठेवल्या गेल्या. कृषिमंत्री म्हणून त्यांनी खूप प्रभावी काम केले होते.

शेतकºयांना १०० टक्के अनुदानाची योजना सुरु केली. सहकारमंत्री म्हणून सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी लोकांची सामाजिक व आर्थिक पत वाढविण्यासाठी पतसंस्थांची निर्मिती केली.१९९२ मध्ये त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळविले होते. त्यानंतर सलग ५ वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून, तर काँग्रेसकडून त्यांची बिनविरोध ४ वेळा विधानपरिषद सभापती म्हणून निवड झाली.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेस