शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

जत तालुक्यात बेसुमार वृक्षतोड

By admin | Updated: July 23, 2016 23:48 IST

वन विभागाचे दुर्लक्ष : दररोज १० ते १२ ट्रक लाकूड तालुक्याबाहेर

गजानन पाटील--संख --वन विभागाच्या दुर्लक्षामुळे जत तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. वनक्षेत्र वाढविण्यासाठीची शासनाची ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही योजना हवेतच विरली आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. दररोज १० ते १२ ट्रक लाकूड भरून जात आहे. लाकूड वखारीचा धंदाही तेजीत सुरू आहे. अवाजवी वृक्षतोड होऊ लागल्याने हा भाग भकास बनला आहे. सांगली जिल्ह्यात विस्ताराने जत तालुका मोठा आहे. एकूण तालुक्याचे क्षेत्रफळ २ लाख २५ हजार ८२८ हेक्टर आहे. लागवडीखालील क्षेत्र १ लाख ३५ हजार १८९ हेक्टर आहे. बागायत, क्षारपड, डोंगराळ क्षेत्र ११३०५ हेक्टर, तर वनक्षेत्र ११३०५ हेक्टर आहे. जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी बांधावरील, माळरानावरील झाडांची विक्री करण्याचा सपाटा मोठ्या प्रमाणात लावला आहे. बाभूळ, चिंच, लिंब, आंबा, निलगिरी, करंजी, डोंगरी झाडांची तोड सुरू आहे. रोज दहा ट्रक लाकूड या भागातून इचलकरंजी, सांगली, मिरज, कोल्हापूर भागात जाते. लाकूड भरून त्यावर ताडपदरी झाकून वाहतूक केली जाते. बहुतांशी झाडे विनापरवाना तोडली जातात. नाममात्र परवाना घेतला जातो. वनविभागाच्या अशीर्वादाने बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. तालुक्यात लाकडाच्या ११ सॉ मिल आहेत. लाकूड कटाईच्या सॉ मिल संख, जत, माडग्याळ, जाडरबोबलाद, उमदी या ठिकाणी आहेत. त्यामुळे वखारभाग व वृक्ष तोडणाऱ्यांचे जाळे तालुक्यात आहे. ट्रकमालक, वनविभागातील अधिकारी व दलालांचे सलोख्याचे संबंध आहेत. नाका चुकवून रोज दिवसा व रात्री ट्रक भरून लाकूड वाहतूक केली जाते. हप्ते घेऊन गाड्या सोडल्या जातात. नाके कागदावरच सुरू आहेत. प्रत्यक्षात अनेक वर्षांपासून नाके बंद आहेत. तालुक्यात केवळ ६ टक्के वनक्षेत्र आहे. वृक्षतोडीमुळे वातावरणाचा समतोल राहिला नाही. उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे. वातावरण दूषित होऊ लागले आहे. वातावरणात समतोल रहावा म्हणून शासन विविध उपाययोजना करते. दि. १ जुलैरोजी ‘शत कोटी’ वृक्ष लागवड करण्यात आली. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश गावोगावी पोहोचविला आहे. शासनाची झाडे लागवडीची नोंद कागदावरच आहे. शत कोटी वृक्ष लागवड योजनेचे सर्वात जास्त वृक्ष लागवड केली आहे. पण दुसऱ्या बाजूला अवाजवी वृक्षतोडही सुरू आहे. शेतकरी बँक, सोसायटी व उसनवार घेतलेली देणी फेडण्यासाठी झाडांची विक्री करीत आहेत. कवडीमोल किमतीने झाडे घेऊन व्यापारी जास्त दराने विक्री करतात. यावर्षी भीषण दुष्काळी स्थितीने झाडे वाळली आहेत. मात्र आता शेतकऱ्यांनी सरसकट झाडांची विक्री सुरू केली आहे. वनविभागाने पाहणी करून झाडे तोडण्यास परवानगी द्यायची आहे. झाडे तोडल्यानंतर परवाना देण्याचे प्रकार चालू आहेत.पैलवानांचे गाव बनले लाकूड व्यापारीतालुक्यातील कोळगिरी हे पैलवानांचे गाव म्हणून ओळखले जाते. परंतु आज या गावामध्ये लाकूड व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे. लाकडाची खरेदी-विक्री या गावातून होते. याकडे वन विभागाने लक्ष देऊन अवाजवी वृक्षतोड टाळावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.