शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बिनपगारी सक्तीच्या रजेमुळे वाहक-चालकांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:50 IST

सांगली : लॉकडाऊननंतर खासगी प्रवासी वाहतूक जोमात चालू असताना, एसटीलाच घरघर का लागली आहे, असा सवाल चक्क एसटी ...

सांगली : लॉकडाऊननंतर खासगी प्रवासी वाहतूक जोमात चालू असताना, एसटीलाच घरघर का लागली आहे, असा सवाल चक्क एसटी कर्मचारीच उपस्थित करू लागले आहेत. आजही जिल्ह्यातील बसेसच्या ५० टक्के फेऱ्या बंद असल्यामुळे अनेक चालक व वाहकांना बिनपगारी सक्तीची रजा घ्यावी लागत असल्यामुळे त्यांच्या संसाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

जिल्ह्यात एक हजार ३७२ चालक आणि एक हजार २६८ वाहकांची संख्या आहे. ७६० बसेसच्या दररोज चार हजार ५२९ फेऱ्या होत होत्या. कोरोनामुळे लॉकडाऊन करावे लागल्यामुळे सर्वच वाहतूक चार महिने बंद होती. सध्या एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. पण, प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे ५० टक्केच बसफेऱ्या जिल्ह्यात चालू आहेत. यामुळे शंभर ते दीडशे चालक व वाहकांना रोज सक्तीने रजेवर जावे लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या रजा संपल्यामुळे त्यांची बिनपगारी रजा होत असल्यामुळे ५० टक्के पगारही कर्मचाऱ्यांच्या हातात मिळत नाही. नवीन चालक, वाहकांची मोठी आर्थिक कोंडी झाली असून, याकडे एसटी प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार, असा सवाल कर्मचारी संघटनांमधून होत आहे.

चौकट

चाळीस टक्के चालक, वाहकांना सक्तीची सुटी

कोरोनामध्ये एसटीच्या थांबलेल्या फेऱ्या आजही ५० टक्के बंदच आहेत. या फेऱ्या चालू करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून फारसे गांभीर्याने प्रयत्न होत नसल्यामुळे ४० टक्के चालक, वाहकांची काम करण्याची इच्छा असतानाही सक्तीने रजेवर जावे लागत आहे, असा आरोप कर्मचारी संघटनांमधून होत आहे. तरीही प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याबद्दलही कर्मचारी नाराज आहेत.

चौकट

जिल्ह्याचे बसचे उत्पन्न २६ टक्के घटलेलेच

लॉकडाऊननंतर एसटी बहुतांशी मार्गावर धावत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी मात्र फारसा एसटीकडे आकर्षित झालेला दिसत नाही. यामुळे एसटीच्या फेऱ्या रिकाम्याच धावत असल्यामुळे उत्पन्नात मात्र फारशी वाढ दिसत नाही. प्रशासनाच्या माहितीनुसार, २६ टक्के उत्पन्न घटलेले आहे. उत्पन्न वाढीचे प्रयत्न सुरु आहेत.

कोट

चालक आणि वाहकांना पगार अत्यंत कमी आहे. नवीन कर्मचाऱ्यांची तर आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. तरीही प्रशासनाकडून चालक आणि वाहकांना सक्तीने रजा घ्यावी लागत आहे. या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक खर्च भागविणेही खूप कठीण झाले आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- विलास यादव,

राज्य चिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना.

कोट

कोरोनाच्या संकटामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले आहे. प्रवासीही एसटीकडे फारसे येत नव्हते. सध्या यामध्ये खूप बदल झाला असून, लांब पल्ल्याच्या बसेसची वाहतूक मोठ्याप्रमाणात वाढविली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार बसेसची सेवा दिली आहे. बसेसच्या फेऱ्या वाढतील, तसे सर्वच चालक-वाहकांना नियमित काम दिले जाणार आहे.

- आलम देसाई,

विभागीय वाहतूक अधिकारी, सांगली.