शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

बिनपगारी सक्तीच्या रजेमुळे वाहक-चालकांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:50 IST

सांगली : लॉकडाऊननंतर खासगी प्रवासी वाहतूक जोमात चालू असताना, एसटीलाच घरघर का लागली आहे, असा सवाल चक्क एसटी ...

सांगली : लॉकडाऊननंतर खासगी प्रवासी वाहतूक जोमात चालू असताना, एसटीलाच घरघर का लागली आहे, असा सवाल चक्क एसटी कर्मचारीच उपस्थित करू लागले आहेत. आजही जिल्ह्यातील बसेसच्या ५० टक्के फेऱ्या बंद असल्यामुळे अनेक चालक व वाहकांना बिनपगारी सक्तीची रजा घ्यावी लागत असल्यामुळे त्यांच्या संसाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

जिल्ह्यात एक हजार ३७२ चालक आणि एक हजार २६८ वाहकांची संख्या आहे. ७६० बसेसच्या दररोज चार हजार ५२९ फेऱ्या होत होत्या. कोरोनामुळे लॉकडाऊन करावे लागल्यामुळे सर्वच वाहतूक चार महिने बंद होती. सध्या एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. पण, प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे ५० टक्केच बसफेऱ्या जिल्ह्यात चालू आहेत. यामुळे शंभर ते दीडशे चालक व वाहकांना रोज सक्तीने रजेवर जावे लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या रजा संपल्यामुळे त्यांची बिनपगारी रजा होत असल्यामुळे ५० टक्के पगारही कर्मचाऱ्यांच्या हातात मिळत नाही. नवीन चालक, वाहकांची मोठी आर्थिक कोंडी झाली असून, याकडे एसटी प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार, असा सवाल कर्मचारी संघटनांमधून होत आहे.

चौकट

चाळीस टक्के चालक, वाहकांना सक्तीची सुटी

कोरोनामध्ये एसटीच्या थांबलेल्या फेऱ्या आजही ५० टक्के बंदच आहेत. या फेऱ्या चालू करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून फारसे गांभीर्याने प्रयत्न होत नसल्यामुळे ४० टक्के चालक, वाहकांची काम करण्याची इच्छा असतानाही सक्तीने रजेवर जावे लागत आहे, असा आरोप कर्मचारी संघटनांमधून होत आहे. तरीही प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याबद्दलही कर्मचारी नाराज आहेत.

चौकट

जिल्ह्याचे बसचे उत्पन्न २६ टक्के घटलेलेच

लॉकडाऊननंतर एसटी बहुतांशी मार्गावर धावत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी मात्र फारसा एसटीकडे आकर्षित झालेला दिसत नाही. यामुळे एसटीच्या फेऱ्या रिकाम्याच धावत असल्यामुळे उत्पन्नात मात्र फारशी वाढ दिसत नाही. प्रशासनाच्या माहितीनुसार, २६ टक्के उत्पन्न घटलेले आहे. उत्पन्न वाढीचे प्रयत्न सुरु आहेत.

कोट

चालक आणि वाहकांना पगार अत्यंत कमी आहे. नवीन कर्मचाऱ्यांची तर आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. तरीही प्रशासनाकडून चालक आणि वाहकांना सक्तीने रजा घ्यावी लागत आहे. या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक खर्च भागविणेही खूप कठीण झाले आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- विलास यादव,

राज्य चिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना.

कोट

कोरोनाच्या संकटामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले आहे. प्रवासीही एसटीकडे फारसे येत नव्हते. सध्या यामध्ये खूप बदल झाला असून, लांब पल्ल्याच्या बसेसची वाहतूक मोठ्याप्रमाणात वाढविली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार बसेसची सेवा दिली आहे. बसेसच्या फेऱ्या वाढतील, तसे सर्वच चालक-वाहकांना नियमित काम दिले जाणार आहे.

- आलम देसाई,

विभागीय वाहतूक अधिकारी, सांगली.