शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
5
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
6
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
7
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
8
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
9
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
10
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
11
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
12
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
13
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
14
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
15
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
16
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
17
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
18
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
19
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
20
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...

बिनपगारी सक्तीच्या रजेमुळे वाहक-चालकांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:50 IST

सांगली : लॉकडाऊननंतर खासगी प्रवासी वाहतूक जोमात चालू असताना, एसटीलाच घरघर का लागली आहे, असा सवाल चक्क एसटी ...

सांगली : लॉकडाऊननंतर खासगी प्रवासी वाहतूक जोमात चालू असताना, एसटीलाच घरघर का लागली आहे, असा सवाल चक्क एसटी कर्मचारीच उपस्थित करू लागले आहेत. आजही जिल्ह्यातील बसेसच्या ५० टक्के फेऱ्या बंद असल्यामुळे अनेक चालक व वाहकांना बिनपगारी सक्तीची रजा घ्यावी लागत असल्यामुळे त्यांच्या संसाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

जिल्ह्यात एक हजार ३७२ चालक आणि एक हजार २६८ वाहकांची संख्या आहे. ७६० बसेसच्या दररोज चार हजार ५२९ फेऱ्या होत होत्या. कोरोनामुळे लॉकडाऊन करावे लागल्यामुळे सर्वच वाहतूक चार महिने बंद होती. सध्या एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. पण, प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे ५० टक्केच बसफेऱ्या जिल्ह्यात चालू आहेत. यामुळे शंभर ते दीडशे चालक व वाहकांना रोज सक्तीने रजेवर जावे लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या रजा संपल्यामुळे त्यांची बिनपगारी रजा होत असल्यामुळे ५० टक्के पगारही कर्मचाऱ्यांच्या हातात मिळत नाही. नवीन चालक, वाहकांची मोठी आर्थिक कोंडी झाली असून, याकडे एसटी प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार, असा सवाल कर्मचारी संघटनांमधून होत आहे.

चौकट

चाळीस टक्के चालक, वाहकांना सक्तीची सुटी

कोरोनामध्ये एसटीच्या थांबलेल्या फेऱ्या आजही ५० टक्के बंदच आहेत. या फेऱ्या चालू करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून फारसे गांभीर्याने प्रयत्न होत नसल्यामुळे ४० टक्के चालक, वाहकांची काम करण्याची इच्छा असतानाही सक्तीने रजेवर जावे लागत आहे, असा आरोप कर्मचारी संघटनांमधून होत आहे. तरीही प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याबद्दलही कर्मचारी नाराज आहेत.

चौकट

जिल्ह्याचे बसचे उत्पन्न २६ टक्के घटलेलेच

लॉकडाऊननंतर एसटी बहुतांशी मार्गावर धावत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी मात्र फारसा एसटीकडे आकर्षित झालेला दिसत नाही. यामुळे एसटीच्या फेऱ्या रिकाम्याच धावत असल्यामुळे उत्पन्नात मात्र फारशी वाढ दिसत नाही. प्रशासनाच्या माहितीनुसार, २६ टक्के उत्पन्न घटलेले आहे. उत्पन्न वाढीचे प्रयत्न सुरु आहेत.

कोट

चालक आणि वाहकांना पगार अत्यंत कमी आहे. नवीन कर्मचाऱ्यांची तर आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. तरीही प्रशासनाकडून चालक आणि वाहकांना सक्तीने रजा घ्यावी लागत आहे. या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक खर्च भागविणेही खूप कठीण झाले आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- विलास यादव,

राज्य चिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना.

कोट

कोरोनाच्या संकटामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले आहे. प्रवासीही एसटीकडे फारसे येत नव्हते. सध्या यामध्ये खूप बदल झाला असून, लांब पल्ल्याच्या बसेसची वाहतूक मोठ्याप्रमाणात वाढविली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार बसेसची सेवा दिली आहे. बसेसच्या फेऱ्या वाढतील, तसे सर्वच चालक-वाहकांना नियमित काम दिले जाणार आहे.

- आलम देसाई,

विभागीय वाहतूक अधिकारी, सांगली.