शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

बिनपगारी सक्तीच्या रजेमुळे वाहक-चालकांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:50 IST

सांगली : लॉकडाऊननंतर खासगी प्रवासी वाहतूक जोमात चालू असताना, एसटीलाच घरघर का लागली आहे, असा सवाल चक्क एसटी ...

सांगली : लॉकडाऊननंतर खासगी प्रवासी वाहतूक जोमात चालू असताना, एसटीलाच घरघर का लागली आहे, असा सवाल चक्क एसटी कर्मचारीच उपस्थित करू लागले आहेत. आजही जिल्ह्यातील बसेसच्या ५० टक्के फेऱ्या बंद असल्यामुळे अनेक चालक व वाहकांना बिनपगारी सक्तीची रजा घ्यावी लागत असल्यामुळे त्यांच्या संसाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

जिल्ह्यात एक हजार ३७२ चालक आणि एक हजार २६८ वाहकांची संख्या आहे. ७६० बसेसच्या दररोज चार हजार ५२९ फेऱ्या होत होत्या. कोरोनामुळे लॉकडाऊन करावे लागल्यामुळे सर्वच वाहतूक चार महिने बंद होती. सध्या एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. पण, प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे ५० टक्केच बसफेऱ्या जिल्ह्यात चालू आहेत. यामुळे शंभर ते दीडशे चालक व वाहकांना रोज सक्तीने रजेवर जावे लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या रजा संपल्यामुळे त्यांची बिनपगारी रजा होत असल्यामुळे ५० टक्के पगारही कर्मचाऱ्यांच्या हातात मिळत नाही. नवीन चालक, वाहकांची मोठी आर्थिक कोंडी झाली असून, याकडे एसटी प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार, असा सवाल कर्मचारी संघटनांमधून होत आहे.

चौकट

चाळीस टक्के चालक, वाहकांना सक्तीची सुटी

कोरोनामध्ये एसटीच्या थांबलेल्या फेऱ्या आजही ५० टक्के बंदच आहेत. या फेऱ्या चालू करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून फारसे गांभीर्याने प्रयत्न होत नसल्यामुळे ४० टक्के चालक, वाहकांची काम करण्याची इच्छा असतानाही सक्तीने रजेवर जावे लागत आहे, असा आरोप कर्मचारी संघटनांमधून होत आहे. तरीही प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याबद्दलही कर्मचारी नाराज आहेत.

चौकट

जिल्ह्याचे बसचे उत्पन्न २६ टक्के घटलेलेच

लॉकडाऊननंतर एसटी बहुतांशी मार्गावर धावत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी मात्र फारसा एसटीकडे आकर्षित झालेला दिसत नाही. यामुळे एसटीच्या फेऱ्या रिकाम्याच धावत असल्यामुळे उत्पन्नात मात्र फारशी वाढ दिसत नाही. प्रशासनाच्या माहितीनुसार, २६ टक्के उत्पन्न घटलेले आहे. उत्पन्न वाढीचे प्रयत्न सुरु आहेत.

कोट

चालक आणि वाहकांना पगार अत्यंत कमी आहे. नवीन कर्मचाऱ्यांची तर आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. तरीही प्रशासनाकडून चालक आणि वाहकांना सक्तीने रजा घ्यावी लागत आहे. या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक खर्च भागविणेही खूप कठीण झाले आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- विलास यादव,

राज्य चिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना.

कोट

कोरोनाच्या संकटामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले आहे. प्रवासीही एसटीकडे फारसे येत नव्हते. सध्या यामध्ये खूप बदल झाला असून, लांब पल्ल्याच्या बसेसची वाहतूक मोठ्याप्रमाणात वाढविली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार बसेसची सेवा दिली आहे. बसेसच्या फेऱ्या वाढतील, तसे सर्वच चालक-वाहकांना नियमित काम दिले जाणार आहे.

- आलम देसाई,

विभागीय वाहतूक अधिकारी, सांगली.