शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

तांदळगावची बिनविरोध निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:27 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क आळसंद : खानापूर तालुक्यातील तांदळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात अखेर स्थानिक नेत्यांना यश आले आहे. सात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

आळसंद : खानापूर तालुक्यातील तांदळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात अखेर स्थानिक नेत्यांना यश आले आहे. सात सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सातच अर्ज दाखल झाले असून सातही अर्ज वैध झाले आहेत. त्यामुळे १९५८ साली स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीच्या ६२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच निवडणूक बिनविरोध हाेत असून आता केवळ औपचारिक घाेषणा बाकी आहे.

खानापूर तालुक्यातील तांदळगावमध्ये राजकीय संघर्ष नेहमीच टाेकाचा राहिला आहे. या गावाने निवडणूक बिनविरोध करून नववर्षाची गुड न्यूज दिल्याची चर्चा तालुक्यात होत आहे. तांदळगावात आमदार अनिल बाबर व माजी आमदार सदाशिवराव पाटील समर्थकांचे दोन गट आहेत. या दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष संपूर्ण तालुक्याने अनुभवला आहे. त्यामुळे गावातील वातावरण बिघडून त्याचा विकासकामांवर परिणाम होत होता. ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच दोन्ही गटातून इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली होती.

त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत चव्हाण यांनी विरोधी गटापुढे बिनविरोधचा प्रस्ताव मांडला. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यानुसार बाबर गटाला चार व पाटील गटाला तीन असे सात अर्ज दाखल करण्यात करून कुरघोडीचे राजकारण टाळून गावाचा विकास अधिक वेगाने करण्याचा निश्चय दोन्ही गटांनी व ग्रामस्थांनी केला. त्यामुळे गावात समाधानाचे वातावरण आहे.

चौकट :

राजकारणातील २५ वर्षे संघर्षात गेली. या काळात विरोधक म्हणून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी हाेता येईना. बिनविरोधामुळे संघर्ष टाळून गावाचा विकास करणं सोपं होईल.

- चंद्रकांत चव्हाण

सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, विटा

चौकट

गटातटांच्या राजकारणामुळे गावातील वातावरण बिघडून गेलं होतं. तरुणाई भरकटत निघाली होती. त्यामुळे दोन्ही गटांनी एकत्र येऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने निवडणूक बिनविरोध केली.

- आनंदा चव्हाण, माजी सरपंच

फोटो : ग्रामपंचायत इमारतीचा फोटो