शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

बायोमेट्रिक पध्दत बंद न केल्यास असहकार्य

By admin | Updated: February 21, 2015 00:16 IST

मुन्ना कुरणे : रास्त भाव धान्य दुकानदारांचा मोर्चा

सांगली : बायोमेट्रिक पध्दत बंद करण्यात यावी, यासह रास्त भाव धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेत्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, अन्यथा प्रशासकीय कामांना आमचा विरोध असेल, असा इशारा सांगली जिल्हा सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी दिला. विविध मागण्यांसाठी आज (शुक्रवार) स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले, त्यावेळी ते बोलत होते. बायोमेट्रिक पध्दत बंद करण्यात यावी, अन्न सुरक्षा योजना लागू करताना २०१५ ची कुटुंबाची संख्या विचारात घेण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आ. शरद पाटील, बिपीन कदम, सुभाष गोयकर आदी उपस्थित होते. मुन्ना कुरणे म्हणाले की, बायोमेट्रिक पध्दतीमुळे दुकानदारांना किचकट काम वाढले आहे. या कामामध्येच सर्व वेळ जात आहे. आमच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास, आमच्याकडून प्रशासन करून घेत असलेली कामे आम्ही करणार नाही.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये डाळी, खाद्यतेल व साखर आदी जीवनोपयोेगी वस्तू देण्यात याव्यात, अंत्योदय शिधापत्रिका धारकास ३५ किलो धान्य देण्यात यावे, एपीएल कार्ड धारकास २० किलो गहू, १० किलो तांदूळ देण्यात यावा, केरोसिन विक्रेत्यांना किरकोळ व गॅस विक्री परवाने देण्यात यावेत, कोणताही निर्णय घेताना दुकानदारांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे, धान्य दुकानदारांना चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, शासनाकडे भरलेले पाम तेलाचे पैसे परत मिळावेत, अन्न सप्ताह व अन्न दिन याची अंमलबजावणी रद्द करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.मोर्चाची सुरुवात आपटा पोलीस चौकीपासून करण्यात आली. मोर्चा काँग्रेस भवन, स्टेशन चौक, राजवाडा चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी राजकुमार जोतराव, वसंत अग्रवाल, महादेव कदम, सुनील पवार, बाळासाहेब लकडे, वसंत जाधव, मुरार गुळभिले, शंकर कोरे, कुमार कोळी, आप्पासाहेब भोसले, महंमदहनिफ सतारमेकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)