शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायकारक टोलला हटविणारच

By admin | Updated: April 28, 2016 00:59 IST

शिरोळमधून आंदोलन सुरु : १ मे रोजी सर्वपक्षीय कृती समितीकडून धरणे

जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण होण्यापूर्वीच १ मे पासून टोलवसुलीचे काम करणाऱ्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीविरोधात आता खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय अन्यायकारक टोलविरोधी कृती समितीकडून आंदोलनाला प्रारंभ होणार आहे़ १ मे रोजी धरणे आंदोलनातून टोलविरोधात जयसिंगपुरातून पहिले आंदोलन सुरू होणार आहे़ कोणत्याही परिस्थितीत टोलनाका उधळून लावणार हीच भूमिका सर्वपक्षीय कृती समितीची असल्याने कोल्हापूरनंतर शिरोळ तालुक्यात टोलच्या आंदोलनाला प्रारंभ होणार आहे़ १ मे पासून कोल्हापूर-सांगली महामार्गावर शिरोली व अंकली येथे टोलनाका सुरू करण्याच्या हालचाली सुप्रीम कंपनीने केल्यानंतर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून टोलला विरोध दर्शविण्यात आला आहे़ अंकली येथे टोलनाका उभारला तर शिरोळ, हातकणंगले व सांगली जिल्ह्यातील जनतेच्या मानगुटीवर नियमबाह्य व बेकायदेशीर टोलचे भूत बसणार असल्याने सर्वपक्षीय कृती समितीने या टोलला विरोध दर्शविला आहे़ स्कूल बस, एस़ टी़, चारचाकी वाहने वगळता अवजड वाहनांना टोल द्यावा लागणार, असे शासनाने जाहीर केले आहे़ सध्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे़ यामुळे कोल्हापूर-सांगली महामार्गही या रस्त्यात विलीनीकरण करून घ्यावा, अशीही मागणी झाली आहे़ याबरोबर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील नागरिकांनी कोल्हापूर-सांगली महामार्गावर टोलनाका नकोच अशी भूमिका घेतली आहे़ टोलनाका उभा करण्यासाठी शिरोली व अंकली येथे तयारी केली आहे़ शिवाय हातकणंगले येथे टोलबुथ (केबीन) दाखल झाले आहेत़ खासदार राजू शेट्टी यांनी सुप्रीम कंपनीला दिलेला ठेका काढून घेऊन सरकारने या मार्गाचा समावेश राष्ट्रीय महामार्गात करावा, अशी मागणी केली आहे़ तर आमदार उल्हास पाटील यांनी टोल द्यायचा नाही नाही, असे सांगून सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे़ १ मे रोजी टोल वसुली सुरू होणार नाही, असे संकेत असले, तरी टोलला हद्दपार करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे़दादा, जरा इकडे लक्ष द्यासार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामाचे प्रमाणपत्र कंपनीला मिळाल्याशिवाय टोल वसुली करता येणार नाही़ माझ्या सही शिवाय टोलवसुली सुरू होणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्टोक्ती दिली आहे़ यामुळे रस्त्याचे अपुरे काम, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून होत असलेला विरोध याकडे पालकमंत्र्यानी लक्ष देण्याची गरज आहे़