शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ उपकेंद्राबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. हे उपकेंद्र भौगोलिकदृष्ट्या खानापूर ...

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. हे उपकेंद्र भौगोलिकदृष्ट्या खानापूर येथेच होण्यासाठी ताकदीने आपली भूमिका मांडू, अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य ॲड. धैर्यशील पाटील यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगावऐवजी खानापूर येथे व्हावे, या मागणीसाठी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राष्ट्रवादीचे खानापूर तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी संघटना व सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य धैर्यशील पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे स्थापन करावे, त्यासाठी विद्यापीठ स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांनी खानापूर उपकेंद्रासाठी दिलेले पत्र वैभव पाटील यांनी धैर्यशील पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी शिष्टमंडळाने शिवाजी विद्यापीठाच्या खानापूर येथे होणाऱ्या उपकेंद्रासाठी आजपर्यंत झालेले विविध ठराव व जागा पाहणीची माहिती दिली.

त्यावेळी धैर्यशील पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी खानापूर येथील जागा सोयीस्कर असेल, तर त्याबाबत विद्यापीठ प्रशासन खानापूरकरांच्या मागणीचा नक्कीच विचार करेल. याबाबत येत्या दोन दिवसांत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून आपली भूमिका मांडली जाईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी अक्षय भगत, दिगंबर गुरव, ऋषिकेश भगत, रोहित भगत, शंभूराजे भगत, रोहित जगताप, विशाल भगत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

चौकट :

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरऐवजी तासगाव तालुक्यात होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. मंत्री सामंत यांना या भागातील भौगोलिक स्थितीची माहिती नाही. त्यामुळे त्यांनी विद्यापीठ उपकेंद्र स्थापनेबाबत घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा व विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे मंजूर करावे, अन्यथा राज्यपालांची भेट घेऊन न्यायालयात दाद मागू, असा इशारा यावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिला.

फोटो : २९ विटा १

ओळ : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर करावे, यासाठी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील शिष्टमंडळाने विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य ॲड. धैर्यशील पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली व मागणीचे निवेदन दिले.