शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’चा संयुक्त आघाडीला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या संयुक्त आघाडीला दणका दिला. ‘स्वाभिमानी’च्या सुरेखा आडमुठे यांनी अनपेक्षित विजय खेचून आणत संयुक्त आघाडीतील रयत विकास आघाडीच्या सुरेखा जाधव यांचा पराभव केला. उर्वरित १२ जागांवर संयुक्त आघाडीचे उमेदवार विजयी झाले. ‘स्वाभिमानी’ने काँग्रेस-राष्टÑवादीच्याच मदतीने रयत ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या संयुक्त आघाडीला दणका दिला. ‘स्वाभिमानी’च्या सुरेखा आडमुठे यांनी अनपेक्षित विजय खेचून आणत संयुक्त आघाडीतील रयत विकास आघाडीच्या सुरेखा जाधव यांचा पराभव केला. उर्वरित १२ जागांवर संयुक्त आघाडीचे उमेदवार विजयी झाले. ‘स्वाभिमानी’ने काँग्रेस-राष्टÑवादीच्याच मदतीने रयत आघाडीचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शह दिला.जिल्हा नियोजन समितीच्या २७ जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद गटातील अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातील १४ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित तेरा जागांसाठी सोमवारी (दि. ४) मतदान झाले होते. बुधवारी सकाळी १० वाजता जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी झाली. पहिल्या फेरीमध्ये खुल्या गटातील भाजपचे सुरेंद्र वाळवेकर (११०० मते), तम्मणगौडा रवी-पाटील (१०००), शिवसेनेचे सुहास बाबर (१०००), राष्ट्रवादीचे सतीश पवार (९००), शरद लाड (९००), काँग्रेसचे विक्रम सावंत (१००० मते) विजयी झाले. या गटात फारशी चुरसही नव्हती.महिला गटातील सात जागांसाठी मात्र प्रचंड चुरस होती. मतदानावेळी दिसलेल्या गटबाजीचा परिणाम निकालामध्ये जाणवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकमेव सदस्य असून, त्यांनी काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या गटाच्या विशाल चौगुले आणि मनीषा पाटील यांना सोबत घेतले. त्यांनी भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या सदस्यांशीही संपर्क साधला होता. स्वाभिमानीच्या उमेदवाराला एक मत अथवा दुसºया क्रमांकाचा पसंतीक्रम देण्याची विनंती खुद्द खा. राजू शेट्टी यांनी काही सदस्यांना केली होती. शेट्टी आणि विशाल पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. ‘स्वाभिमानी’कडे तीन मते असताना भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादी आघाडीची मते फोडण्याची खेळी यशस्वी ठरली. संयुक्त आघाडीतील तीन मते आडमुठे यांना मिळाल्याने त्या विजयी झाल्या. संयुक्त आघाडीच्या सुरेखा जाधव (रयत विकास आघाडी) यांना आठ मतांच्या कोट्यापैकी केवळ पाच मते मिळाली. त्यांच्या कोट्यातील तीन मते आडमुठे यांना मिळाल्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.रयत विकास आघाडीच्या सुरेखा जाधव यांना आठ मतांचा कोटा देण्यात आला होता. जाधव स्वत:, अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सुनीता पवार (भाजप), चंद्रकांत पाटील, संजय पाटील, संजीव पाटील, आशा झिमूर (चौघे राष्टÑवादी) आणि संभाजी कचरे (राष्टÑवादी बंडखोर) यांचा समावेश होता. परंतु, आठपैकी जाधव यांना केवळ पाच मते मिळाली. उर्वरित तीन मते त्यांना मिळाली नाहीत. बाहेर गेलेल्या तीन मतांमुळे जाधव यांना पराभवास सामोरे जावे लागले, तर स्वाभिमानीच्या आडमुठे यांनी राष्टÑवादीच्या मदतीने बाजी मारली.सर्वसाधारण महिला गटातील सात जागांसाठी अकरा उमेदवार होते. त्यापैकी तीन महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे शिल्लक राहिले होते. महिला गटातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवार सुरेखा आडमुठे यांनी धक्कादायक बाजी मारली.जिरवाजिरवीत कार्यकर्त्यांचा बळीखा. राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्षात कामेरी (ता. वाळवा) जिल्हा परिषद गटातील सुरेखा जाधव यांचा बळी गेला. खोत समर्थक सुरेखा जाधव यांना पाडण्याच्या घडामोडी वेगाने झाल्या. खोतविरोधक राष्ट्रवादीच्या मतदारांशी शेट्टी यांनी संपर्क साधून, ती मते सुरेखा आडमुठे (कवठेपिरान) यांच्याकडे वळविली गेली.