शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

‘स्वाभिमानी’चा संयुक्त आघाडीला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या संयुक्त आघाडीला दणका दिला. ‘स्वाभिमानी’च्या सुरेखा आडमुठे यांनी अनपेक्षित विजय खेचून आणत संयुक्त आघाडीतील रयत विकास आघाडीच्या सुरेखा जाधव यांचा पराभव केला. उर्वरित १२ जागांवर संयुक्त आघाडीचे उमेदवार विजयी झाले. ‘स्वाभिमानी’ने काँग्रेस-राष्टÑवादीच्याच मदतीने रयत ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या संयुक्त आघाडीला दणका दिला. ‘स्वाभिमानी’च्या सुरेखा आडमुठे यांनी अनपेक्षित विजय खेचून आणत संयुक्त आघाडीतील रयत विकास आघाडीच्या सुरेखा जाधव यांचा पराभव केला. उर्वरित १२ जागांवर संयुक्त आघाडीचे उमेदवार विजयी झाले. ‘स्वाभिमानी’ने काँग्रेस-राष्टÑवादीच्याच मदतीने रयत आघाडीचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शह दिला.जिल्हा नियोजन समितीच्या २७ जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद गटातील अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातील १४ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित तेरा जागांसाठी सोमवारी (दि. ४) मतदान झाले होते. बुधवारी सकाळी १० वाजता जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी झाली. पहिल्या फेरीमध्ये खुल्या गटातील भाजपचे सुरेंद्र वाळवेकर (११०० मते), तम्मणगौडा रवी-पाटील (१०००), शिवसेनेचे सुहास बाबर (१०००), राष्ट्रवादीचे सतीश पवार (९००), शरद लाड (९००), काँग्रेसचे विक्रम सावंत (१००० मते) विजयी झाले. या गटात फारशी चुरसही नव्हती.महिला गटातील सात जागांसाठी मात्र प्रचंड चुरस होती. मतदानावेळी दिसलेल्या गटबाजीचा परिणाम निकालामध्ये जाणवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकमेव सदस्य असून, त्यांनी काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या गटाच्या विशाल चौगुले आणि मनीषा पाटील यांना सोबत घेतले. त्यांनी भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या सदस्यांशीही संपर्क साधला होता. स्वाभिमानीच्या उमेदवाराला एक मत अथवा दुसºया क्रमांकाचा पसंतीक्रम देण्याची विनंती खुद्द खा. राजू शेट्टी यांनी काही सदस्यांना केली होती. शेट्टी आणि विशाल पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. ‘स्वाभिमानी’कडे तीन मते असताना भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादी आघाडीची मते फोडण्याची खेळी यशस्वी ठरली. संयुक्त आघाडीतील तीन मते आडमुठे यांना मिळाल्याने त्या विजयी झाल्या. संयुक्त आघाडीच्या सुरेखा जाधव (रयत विकास आघाडी) यांना आठ मतांच्या कोट्यापैकी केवळ पाच मते मिळाली. त्यांच्या कोट्यातील तीन मते आडमुठे यांना मिळाल्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.रयत विकास आघाडीच्या सुरेखा जाधव यांना आठ मतांचा कोटा देण्यात आला होता. जाधव स्वत:, अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सुनीता पवार (भाजप), चंद्रकांत पाटील, संजय पाटील, संजीव पाटील, आशा झिमूर (चौघे राष्टÑवादी) आणि संभाजी कचरे (राष्टÑवादी बंडखोर) यांचा समावेश होता. परंतु, आठपैकी जाधव यांना केवळ पाच मते मिळाली. उर्वरित तीन मते त्यांना मिळाली नाहीत. बाहेर गेलेल्या तीन मतांमुळे जाधव यांना पराभवास सामोरे जावे लागले, तर स्वाभिमानीच्या आडमुठे यांनी राष्टÑवादीच्या मदतीने बाजी मारली.सर्वसाधारण महिला गटातील सात जागांसाठी अकरा उमेदवार होते. त्यापैकी तीन महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे शिल्लक राहिले होते. महिला गटातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवार सुरेखा आडमुठे यांनी धक्कादायक बाजी मारली.जिरवाजिरवीत कार्यकर्त्यांचा बळीखा. राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्षात कामेरी (ता. वाळवा) जिल्हा परिषद गटातील सुरेखा जाधव यांचा बळी गेला. खोत समर्थक सुरेखा जाधव यांना पाडण्याच्या घडामोडी वेगाने झाल्या. खोतविरोधक राष्ट्रवादीच्या मतदारांशी शेट्टी यांनी संपर्क साधून, ती मते सुरेखा आडमुठे (कवठेपिरान) यांच्याकडे वळविली गेली.