शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

आंबेडकरांचा भारत घडविण्यासाठी संघटित व्हा

By admin | Updated: April 24, 2017 23:44 IST

सदाभाऊ खोत : इस्लामपुरात फुले-आंबेडकर जयंती; नागनाथअण्णा यांना मरणोत्तर पुरस्कार

इस्लामपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे. समाजातील कष्टकरी, शेतकरी आणि वंचित व दुबळ्या घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे. आजच्या तरुण पिढीने त्यांचे विचार आचरणात आणून भारतीय लोकशाही सुदृढ करायला हवी, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात वाळवा तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने फुले, आंबेडकर जयंती महोत्सव झाला. यावेळी क्रांतिवीर पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांना मरणोत्तर ‘रिपब्लिकन मित्र’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. खोत यांच्याहस्ते हुतात्मा कारखान्याचे माजी अध्यक्ष महादेव कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच खोत यांच्या मातोश्री रत्नाबाई खोत यांना माजी आमदार भगवानराव साळुंखे, अरुण कांबळे, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याहस्ते ‘माता रमाई’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी रमाई पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी आम्ही इस्लामपूरकर कल्चरल गु्रपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनपर भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला.सिनेस्टार निवास कळसे यांच्या नृत्य समूहाचा कलाविष्कार कार्यक्रम झाला. सतीश चिके या अपंग कलाकाराने रसिकांची मने जिंकली. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांच्याविषयी व त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि त्यांचे समाजाला असणारे मोठे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. आरपीआयचे राज्य सचिव अरुण कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महेश परांजपे यांनी आभार मानले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, सागर खोत, नगरसेविका कोमल बनसोडे, प्रतिभा शिंदे, अन्नपूर्णा फल्ले, सीमा पवार, मयुरी मेश्राम, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, अमर बनसोडे, रोहन धुमाळे, राजू वाघमारे, दयानंद सुर्वे, बाळासाहेब कांबळे, किशोर जाधव आदींसह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)