शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

आंबेडकरांचा भारत घडविण्यासाठी संघटित व्हा

By admin | Updated: April 24, 2017 23:44 IST

सदाभाऊ खोत : इस्लामपुरात फुले-आंबेडकर जयंती; नागनाथअण्णा यांना मरणोत्तर पुरस्कार

इस्लामपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे. समाजातील कष्टकरी, शेतकरी आणि वंचित व दुबळ्या घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे. आजच्या तरुण पिढीने त्यांचे विचार आचरणात आणून भारतीय लोकशाही सुदृढ करायला हवी, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात वाळवा तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने फुले, आंबेडकर जयंती महोत्सव झाला. यावेळी क्रांतिवीर पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांना मरणोत्तर ‘रिपब्लिकन मित्र’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. खोत यांच्याहस्ते हुतात्मा कारखान्याचे माजी अध्यक्ष महादेव कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच खोत यांच्या मातोश्री रत्नाबाई खोत यांना माजी आमदार भगवानराव साळुंखे, अरुण कांबळे, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याहस्ते ‘माता रमाई’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी रमाई पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी आम्ही इस्लामपूरकर कल्चरल गु्रपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनपर भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला.सिनेस्टार निवास कळसे यांच्या नृत्य समूहाचा कलाविष्कार कार्यक्रम झाला. सतीश चिके या अपंग कलाकाराने रसिकांची मने जिंकली. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांच्याविषयी व त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि त्यांचे समाजाला असणारे मोठे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. आरपीआयचे राज्य सचिव अरुण कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महेश परांजपे यांनी आभार मानले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, सागर खोत, नगरसेविका कोमल बनसोडे, प्रतिभा शिंदे, अन्नपूर्णा फल्ले, सीमा पवार, मयुरी मेश्राम, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, अमर बनसोडे, रोहन धुमाळे, राजू वाघमारे, दयानंद सुर्वे, बाळासाहेब कांबळे, किशोर जाधव आदींसह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)