शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

परिवर्तन घडविण्यासाठी बाबासाहेब समजून घ्या

By admin | Updated: August 21, 2016 23:59 IST

ज. रा. दाभोळे : पलूसमध्ये परिवर्तन साहित्य संमेलन

पलूस : बाबासाहेबांना समजून घेतल्याशिवाय देशातील अर्थकारण राजकारण, समाजकारण समजणार नसल्याची भावना संमेलनाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. ज. रा. दाभोळे यांनी व्यक्त केली. पलूस येथे रविवारी श्री समर्थ साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळाच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित चौदाव्या परिवर्तन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी डॉ. बाबूराव गुरव, व्ही. वाय. पाटील, ज्ञानेश्वर कोळी, विश्वनाथ गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष किरण शिंदे यांनी स्वागत केले. व्ही. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. दाभोळे म्हणाले की, बाबासाहेबांनी केलेली जातीअंताची भाषा समाजाने करायला हवी. जग बदलण्याचा प्रारंभ माझ्यापासून झाला पाहिजे. देव, देऊळ, ईश्वर मानवनिर्मित असून, त्यापेक्षा पाथरवटाची पूजा केलेली बरी. मध्यस्थ आणि दलाल आम्हाला नाकारायचा आहे. आजच्या काळात माणूस म्हणून जगणं कठीण झालं असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. सध्या विचारवंत, पत्रकारांवर हल्ले, धमकीसत्र सुरु असून, ते गंभीर असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. हे बदल घडविणे म्हणजेच परिवर्तन आहे. देश बदलायचा, तर सद्भावनेची जपणूक करा, कर्मवीरअण्णा म्हणायचे, न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड, तो माझ्या संस्थेचा विद्यार्थी. पण आजची परिस्थिती बघून कुणाला चीडच येत नाही. कोणत्या घरात जन्माला यावे, हे आपल्या हातात नसते. पण आपले कर्तृत्त्व सिद्ध करणे स्वत:च्या हातात असते. प्रथम सत्रात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रा. विठ्ठल सदामते, कवयित्री मनीषा पाटील, शाहीर अनिता खरात, फारुख गवंडी, अ‍ॅड. दीपक लाड, बाळकृष्ण चोपडे, विक्रमसिंह शिरतोडे, प्रा. डॉ. संगीता पाटील, प्रतीक पाटील, गोमटेश चौगुले यांचा गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बांबवडे येथील ज्येष्ठ लेखिका जानकीताई भोसले यांच्या ‘नका म्हणू लेकी झाल्या’, ‘कळी अशी उमलूदे’ या दोन कथासंग्रहांचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात महिला शाहीर अनिता खरात यांचा प्रबोधनपर लोकगीतांचा व पोवाड्याचा कार्यक्रम झाला. मान्यवरांचे व नवोदितांचे कवी संमेलन कवी प्रदीप कांबळे, सातारा यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यामध्ये कवी नामदेव जाधव, संतोष काळे, ज्ञानेश्वर कोळी, संदीप नाझरे, नंदिनी साळुंखे, वैजयंता पेटकर, आलिशा मोहिते, चंद्रकांत देशमुखे, तानाजी जाधव, सतीश लोखंडे, विशाल शिरतोडे, चंद्रकांत कन्हेरे, ऋषिकेश खारखे, जयवंत आवटे, सुमंत सगरे, रूपाली शिंदे यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे अध्यक्ष कवी किरण शिंदे, उपाध्यक्ष कुमार गायकवाड, सचिव संजीव तोडकर, प्रा. रवींद्र येवले, व्ही. वाय. पाटील, जयवंत मोहिते, शशिकांत रेपाळ, जितेंद्र कांबळे, शंकर महाडिक, जगन्नाथ सुवासे, रामनाथ चव्हाण, दिलीप वडकर, सुरेखा कोळेकर यांनी केले. (वार्ताहर) आमची भाषा : आमचं शिवार उद्घाटनप्रसंगी प्रा. तुकाराम पाटील म्हणाले, ग्रामीण माणसं लहरी आहेत. ही लहर बदलून परिवर्तन घडवायचं आहे. परिवर्तनाच्यादृष्टीने साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे. आमची भाषा आमचं शिवार आहे. आमची ग्रामीण भाषा गोफनगोंडा आहे. वैर घेतलं तर टिप्पीरा देते. साहित्यात आत्मा ओतून त्यातून परिवर्तन करणारी माणसं घडवायची आहेत. आज समाजमाध्यमातून लिहिणारी नवी फळी निर्माण होत आहे. शेती, माती, नाती हा संस्कृतीचा पाया आहे. असेही ते म्हणाले.