शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

कोरोनाच्या आणीबाणीत आरोग्यपंढरीचे महत्त्व अधोरेखित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:25 IST

आरोग्यपंढरी ठरलेल्या सांगली-मिरज शहरांनी कोरोना काळातही हार मानलेली नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या हजारावर गेली, तरी येथील पायाभूत ...

आरोग्यपंढरी ठरलेल्या सांगली-मिरज शहरांनी कोरोना काळातही हार मानलेली नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या हजारावर गेली, तरी येथील पायाभूत सुविधा कोलमडल्या नाहीत. मृत्यूदर कमी राहिला. अन्य शहरांप्रमाणे हाहाकार माजला नाही. वैद्यकीय क्षेत्राचा पाया भक्कम असल्यानेच या जागतिक महामारीमध्ये आरोग्यपंढरी ‘डटके’ राहिली.

येथील तज्ज्ञ धन्वंतरींना अनेक दुर्धर आजारांना तोंड देण्याचा अनुभव आहे. रुग्णालये सुसज्ज व निष्णात डॉक्टरांचया फौजेसह जय्यत आहेत. सांगली-मिरजेत सुमारे साडेचारशेहून अधिक खासगी रुग्णालये आहेत. शिवाय मिरज, सांगलीतील शासकीय रुग्णालयांतही गुंतागुंतीच्या आजारांचे रुग्ण हाताळण्याची प्रचंड क्षमता आहे. याला कारणीभूत ठरले ते मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. तेथून बाहेर पडलेल्या अनेक डॉक्टरांनी येथेच रुग्णालये सुरू केली. त्यांच्या विस्ताराला पोषक वातावरण मिळत गेले. मिरजेच्या वॉन्लेसने दक्षिण- पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील रुग्णांसाठी वाट तयार केली होती, त्याच वाटेवरून रुग्णांचा ओघ खासगी रुग्णालयांकडेही कायम राहिला. त्याचा फायदा येथील वैद्यकीय क्षेत्र विस्तारण्यात झाला.

आजमितीला कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांपेक्षाही चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा येथे मिळते. अस्थिरोग, मानसोपचार, मेंदूविकार, हृदयरोग, पोटाचे आजार, कर्करोग, नेत्ररोग, त्वचारोग, स्त्रीरोग याबाबतीत रुग्णालयांची स्पेशालिटी आहे. किमान डझनभर सुपर स्पेशालिटी रुग्णालये रुग्णसेवेत गुंतली आहेत. कोरोनाच्या आणीबाणीत ती देवदुताप्रमाणे धाऊन आली. शेजारच्या सातारा जिल्ह्यात कोरोना आवाक्याबाहेर गेलेेला असताना, सांगलीत मात्र तितका हाहाकार नाही, याचे हेच कारण मानावे लागेल.

चौकट

सुसज्ज, निष्णात, अनुभवसंपन्न आणि धाडसी परंपरा

अचूक निदान व परिणामकारी उपचारांसाठी कोट्यवधी रुपयांची उपकरणे व यंत्रसामग्री सज्ज आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ठसा उमटविलेले तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांना उपचार देतात. व्यसनमुक्ती, लेसर उपचार, प्लास्टिक सर्जरी, त्वचारोपण अशा क्षेत्रांतही आरोग्यपंढरीने नाव कमाविले आहे. मेंदूविकार आणि शस्त्रक्रिया तसेच मानसोपचारासाठी तर अर्ध्या महाराष्ट्रातून रुग्ण सागंली-मिरजेला येतात. ही सर्वांगीण बहरलेली आरोग्य परंपराच कोरोनाच्या आणीबाणीतही तारुन नेणारी ठरली आहे.