शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
6
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
8
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
9
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
10
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
11
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
12
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
13
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
14
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
15
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
16
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
17
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
18
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
19
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
20
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता

कोरोनाच्या आणीबाणीत आरोग्यपंढरीचे महत्त्व अधोरेखित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:25 IST

आरोग्यपंढरी ठरलेल्या सांगली-मिरज शहरांनी कोरोना काळातही हार मानलेली नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या हजारावर गेली, तरी येथील पायाभूत ...

आरोग्यपंढरी ठरलेल्या सांगली-मिरज शहरांनी कोरोना काळातही हार मानलेली नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या हजारावर गेली, तरी येथील पायाभूत सुविधा कोलमडल्या नाहीत. मृत्यूदर कमी राहिला. अन्य शहरांप्रमाणे हाहाकार माजला नाही. वैद्यकीय क्षेत्राचा पाया भक्कम असल्यानेच या जागतिक महामारीमध्ये आरोग्यपंढरी ‘डटके’ राहिली.

येथील तज्ज्ञ धन्वंतरींना अनेक दुर्धर आजारांना तोंड देण्याचा अनुभव आहे. रुग्णालये सुसज्ज व निष्णात डॉक्टरांचया फौजेसह जय्यत आहेत. सांगली-मिरजेत सुमारे साडेचारशेहून अधिक खासगी रुग्णालये आहेत. शिवाय मिरज, सांगलीतील शासकीय रुग्णालयांतही गुंतागुंतीच्या आजारांचे रुग्ण हाताळण्याची प्रचंड क्षमता आहे. याला कारणीभूत ठरले ते मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. तेथून बाहेर पडलेल्या अनेक डॉक्टरांनी येथेच रुग्णालये सुरू केली. त्यांच्या विस्ताराला पोषक वातावरण मिळत गेले. मिरजेच्या वॉन्लेसने दक्षिण- पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील रुग्णांसाठी वाट तयार केली होती, त्याच वाटेवरून रुग्णांचा ओघ खासगी रुग्णालयांकडेही कायम राहिला. त्याचा फायदा येथील वैद्यकीय क्षेत्र विस्तारण्यात झाला.

आजमितीला कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांपेक्षाही चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा येथे मिळते. अस्थिरोग, मानसोपचार, मेंदूविकार, हृदयरोग, पोटाचे आजार, कर्करोग, नेत्ररोग, त्वचारोग, स्त्रीरोग याबाबतीत रुग्णालयांची स्पेशालिटी आहे. किमान डझनभर सुपर स्पेशालिटी रुग्णालये रुग्णसेवेत गुंतली आहेत. कोरोनाच्या आणीबाणीत ती देवदुताप्रमाणे धाऊन आली. शेजारच्या सातारा जिल्ह्यात कोरोना आवाक्याबाहेर गेलेेला असताना, सांगलीत मात्र तितका हाहाकार नाही, याचे हेच कारण मानावे लागेल.

चौकट

सुसज्ज, निष्णात, अनुभवसंपन्न आणि धाडसी परंपरा

अचूक निदान व परिणामकारी उपचारांसाठी कोट्यवधी रुपयांची उपकरणे व यंत्रसामग्री सज्ज आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ठसा उमटविलेले तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांना उपचार देतात. व्यसनमुक्ती, लेसर उपचार, प्लास्टिक सर्जरी, त्वचारोपण अशा क्षेत्रांतही आरोग्यपंढरीने नाव कमाविले आहे. मेंदूविकार आणि शस्त्रक्रिया तसेच मानसोपचारासाठी तर अर्ध्या महाराष्ट्रातून रुग्ण सागंली-मिरजेला येतात. ही सर्वांगीण बहरलेली आरोग्य परंपराच कोरोनाच्या आणीबाणीतही तारुन नेणारी ठरली आहे.