शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

कोरोनाच्या आणीबाणीत आरोग्यपंढरीचे महत्त्व अधोरेखित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:25 IST

आरोग्यपंढरी ठरलेल्या सांगली-मिरज शहरांनी कोरोना काळातही हार मानलेली नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या हजारावर गेली, तरी येथील पायाभूत ...

आरोग्यपंढरी ठरलेल्या सांगली-मिरज शहरांनी कोरोना काळातही हार मानलेली नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या हजारावर गेली, तरी येथील पायाभूत सुविधा कोलमडल्या नाहीत. मृत्यूदर कमी राहिला. अन्य शहरांप्रमाणे हाहाकार माजला नाही. वैद्यकीय क्षेत्राचा पाया भक्कम असल्यानेच या जागतिक महामारीमध्ये आरोग्यपंढरी ‘डटके’ राहिली.

येथील तज्ज्ञ धन्वंतरींना अनेक दुर्धर आजारांना तोंड देण्याचा अनुभव आहे. रुग्णालये सुसज्ज व निष्णात डॉक्टरांचया फौजेसह जय्यत आहेत. सांगली-मिरजेत सुमारे साडेचारशेहून अधिक खासगी रुग्णालये आहेत. शिवाय मिरज, सांगलीतील शासकीय रुग्णालयांतही गुंतागुंतीच्या आजारांचे रुग्ण हाताळण्याची प्रचंड क्षमता आहे. याला कारणीभूत ठरले ते मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. तेथून बाहेर पडलेल्या अनेक डॉक्टरांनी येथेच रुग्णालये सुरू केली. त्यांच्या विस्ताराला पोषक वातावरण मिळत गेले. मिरजेच्या वॉन्लेसने दक्षिण- पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील रुग्णांसाठी वाट तयार केली होती, त्याच वाटेवरून रुग्णांचा ओघ खासगी रुग्णालयांकडेही कायम राहिला. त्याचा फायदा येथील वैद्यकीय क्षेत्र विस्तारण्यात झाला.

आजमितीला कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांपेक्षाही चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा येथे मिळते. अस्थिरोग, मानसोपचार, मेंदूविकार, हृदयरोग, पोटाचे आजार, कर्करोग, नेत्ररोग, त्वचारोग, स्त्रीरोग याबाबतीत रुग्णालयांची स्पेशालिटी आहे. किमान डझनभर सुपर स्पेशालिटी रुग्णालये रुग्णसेवेत गुंतली आहेत. कोरोनाच्या आणीबाणीत ती देवदुताप्रमाणे धाऊन आली. शेजारच्या सातारा जिल्ह्यात कोरोना आवाक्याबाहेर गेलेेला असताना, सांगलीत मात्र तितका हाहाकार नाही, याचे हेच कारण मानावे लागेल.

चौकट

सुसज्ज, निष्णात, अनुभवसंपन्न आणि धाडसी परंपरा

अचूक निदान व परिणामकारी उपचारांसाठी कोट्यवधी रुपयांची उपकरणे व यंत्रसामग्री सज्ज आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ठसा उमटविलेले तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांना उपचार देतात. व्यसनमुक्ती, लेसर उपचार, प्लास्टिक सर्जरी, त्वचारोपण अशा क्षेत्रांतही आरोग्यपंढरीने नाव कमाविले आहे. मेंदूविकार आणि शस्त्रक्रिया तसेच मानसोपचारासाठी तर अर्ध्या महाराष्ट्रातून रुग्ण सागंली-मिरजेला येतात. ही सर्वांगीण बहरलेली आरोग्य परंपराच कोरोनाच्या आणीबाणीतही तारुन नेणारी ठरली आहे.