शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा निवडणुकीसाठी गैरसोयीचा अजेंडा-- हारुण शिकलगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:26 IST

सांगली : महापालिकेची निवडणूक डोळ््यासमोर ठेवून भाजपने तिन्ही शहरात गैरसोयींचा अजेंडा आखला आहे. महापालिका क्षेत्रात विकासकामे ठप्प कशी होतील,

ठळक मुद्दे: महापालिकेचा कारभार मुंबईतून; जाणीवपूर्वक अडविली जातात विकासकामेपावसाळ्यापूर्वी ही कामे व्हावीत, अशी भावना होती.आज २५ दिवस उलटूनही वर्कआॅर्डर नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेची निवडणूक डोळ््यासमोर ठेवून भाजपने तिन्ही शहरात गैरसोयींचा अजेंडा आखला आहे. महापालिका क्षेत्रात विकासकामे ठप्प कशी होतील, याची दक्षता भाजपचे लोक घेत आहेत, अशी टीका महापौर हारुण शिकलगार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, पालकमंत्र्यांनी सांगलीत आल्यानंतर महापालिका पदाधिकारी भेटण्यास येत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. ही त्यांची निव्वळ स्टंटबाजी आहे. वास्तविक शासनाच्या इशाºयानेच महापालिकेत विकासाचा खेळखंडोबा सुरू आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षात महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच अडवणुकीचा उद्योग सुरू आहे. आयुक्तांमार्फत विकासकामांच्या फायली अडविल्या जातात. महापालिकेने स्वनिधीतून मंजूर केलेली २४ कोटी रुपयांची विकासकामे गेल्या वर्षभरात अडली आहेत. शहराला खड्ड्यांमध्ये लोटून महापालिकेत काँग्रेसला बदनाम करण्याचे षङ्यंत्रच सुरू आहे.

स्वच्छता अभियान हा काही भाजपने लावलेला शोध नाही. संत गाडगेबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी आदींनी हा स्वच्छतेचा दिलेला कानमंत्र अनेक वर्षे अभियान म्हणून राबविला जात आहे. सरकार कोणाचेही असो, २ आॅक्टोबरला अभियान राबविले जातेच. असे असताना केवळ चमकोगिरीसाठी या अभियानाचा बोलबाला सुरू केला आहे. त्यांनी आम्हाला डालवून हा कार्यक्रम केला. हे राजकारण कोणाच्या इशाºयाने सुरू आहे. महापालिकेचा कारभार आता मुंबईतूनच सुरू झाला आहे. स्वच्छ असलेल्याच कर्मवीर भाऊराव पाटील चौक, विश्रामबाग रस्त्यावर पालकमंत्री व आयुक्तांनी सफाईचा स्टंट केला. चार दिवस शामरावनगरातील लोक दलदल, पाण्यात अडकले आहेत, ते दिसले नाही का? ते शामरावनगरात गेले असते, तेथे सफाई केली असती तर, खºयाअर्थाने जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतले असते, असा टोला त्यांनी लगावला.

अमृत योजनेची निविदा स्थायी समिती अस्तित्वात नसताना मान्य करण्यात आली. त्यामुळे टेंडरचे अधिकार महासभेचे होते. असे असूनही आयुक्तांच्या पुढाकाराने शासनाने परस्पर मुंबईत टेंडर कशासाठी काढले? शहरात ड्रेनेज, पाणी योजनेसह विविध कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डयांत शहर अडकले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही कामे व्हावीत, अशी भावना होती.ती कामेही प्रशासनाने केली नाहीत. गेल्या महासभेत २८ आॅगस्टरोजी सर्व नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत आयुक्तांवर आगपाखड केली होती. त्यानंतर आठ दिवसांत वर्कआॅर्डर काढून कामे सुरू होतील, असे आयुक्तांनी सांगितले. पण आज २५ दिवस उलटूनही वर्कआॅर्डर नाहीत.अनेक प्रश्न प्रलंबितकुपवाडच्या ड्रेनेज योजनेसंदर्भात मलनिस्सारण केंद्रासाठी जागा निश्चितीसह सर्वच कामांसाठी महासभेने आयुक्तांना वर्षभरापूर्वी प्राधिकृत केले आहे. परंतु हे प्रश्नही प्रशासनाने अद्याप मार्गी लावलेले नाहीत. नगरसेवक, पक्षात भांडणे लावून अधिकाºयांकडून भाजपची पेरणी सुरू आहे. एकूणच आयुक्तांचा कारभार शासनाच्या इशाºयाने मुंबईतूनच चालत आहे, अशी टीका शिकलगार यांनी यावेळी केली.