शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

खरेदीदारांच्या भूमिकेने मार्केटमध्ये अस्वस्थता

By admin | Updated: July 16, 2016 23:34 IST

भाजीपाला व्यवहार सुरळीत : हळद, गूळ सौदे बंदच

सांगली : नियमनमुक्तीच्या विरोधात गेल्या आठवड्याभरापासून येथील बाजार समिती व फळे, भाजीपाला मार्केटमध्ये असलेले अस्थिरतेचे वातावरण कायम आहे. शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर कांदा, लसूणसह इतर व्यवहार सुरळीत झाले असले तरी, फळे खरेदी करण्यास खरेदीदारांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान, खरेदीदारांचे याबाबतचे गैरसमज दूर करण्यात आले असून, आता व्यवहार सुरळीत होतील, असा आशावाद फळे व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.राज्य शासनाने बाजार समितीसाठी नियमनमुक्तीचा अध्यादेश काढल्यापासून व्यापारी वर्गात गैरसमज निर्माण झाले होते. त्यात बहुतांश बाजार समित्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर सांगलीतही फळ मार्केटमध्ये बंद पाळण्यात आला होता. मात्र, यावर सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर कांदा, बटाटा व्यापारी असोसिएशनने व्यवहार सुरळीत चालू केले होते. फळे व भाजीपाला मार्केटमधील भाजीपाला व्यवहार सुरळीत चालू असतानाच गेल्या दोन दिवसापासून फळांच्या व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करण्यास खरेदीदारांनी नकार दर्शवला होता. या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यापासून पुन्हा बंद आंदोलन करण्याचा आग्रह करण्यात येत होता. मात्र, नियमनमुक्तीचा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, यापूर्वीच इतर राज्यांनी स्वीकार केल्याने याबाबत मतभेदाचे कारण नसल्याचे स्पष्टीकरण फळे व्यापारी संघटनेकडून देण्यात येत होते. शनिवारी सकाळीही याबाबत खरेदीदारांनी माल खरेदी करण्यास नकार दर्शवला. यावर तातडीने बैठक घेत नियमनमुक्ती निर्णयाचा सर्वत्र अवलंब झाल्याने आपला विरोध चुकीचा असून, तरीही काही अडचणी असल्यास चर्चेतून तोडगा काढूया, पण खरेदी थांबविण्यात येऊ नये, असे आवाहन केले. शनिवारी मार्केटमध्ये डाळिंब, पपई, सीताफळाची आवक झाली होती. (प्रतिनिधी)सोमवारी तोडगा अपेक्षितफळे व भाजीपाला मार्केटमधील व्यवहार काहीअंशी सुरळीत झाले असले तरी, बाजार समितीतील हळद, गुळासह बेदाण्याचे सौदे अकरा दिवसांपासून बंद आहेत. तर सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतीमालाची होणारी आवक अत्यल्प असल्याने त्याचा परिणाम होणार नसून शेतकऱ्यांना नुकसान पोहोचत असेल तर व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा बाजार समितीने दिला आहे. दरम्यान, या बंदमुळे दैनंदिन दोन कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. यावर सोमवारी तोडगा निघणे अपेक्षित आहे. व्यवहार सुरळीत झाले असले तरी खरेदीदारांकडून नकार येत होता. यावर शनिवारी व्यापारी, खरेदीदारांची बैठक घेत त्यांना शासनाच्या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांकडून कोणाचीही अडवणूक होणार नाही. खरेदीदारांच्या शंकांचे निरसन करण्यात आले असून, आता फळांचे व्यवहार सुरळीत होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. - शिवाजी प्रभू सगरे, अध्यक्ष, फू्रट असोसिएशन, सांगली.