शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

खरेदीदारांच्या भूमिकेने मार्केटमध्ये अस्वस्थता

By admin | Updated: July 16, 2016 23:34 IST

भाजीपाला व्यवहार सुरळीत : हळद, गूळ सौदे बंदच

सांगली : नियमनमुक्तीच्या विरोधात गेल्या आठवड्याभरापासून येथील बाजार समिती व फळे, भाजीपाला मार्केटमध्ये असलेले अस्थिरतेचे वातावरण कायम आहे. शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर कांदा, लसूणसह इतर व्यवहार सुरळीत झाले असले तरी, फळे खरेदी करण्यास खरेदीदारांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान, खरेदीदारांचे याबाबतचे गैरसमज दूर करण्यात आले असून, आता व्यवहार सुरळीत होतील, असा आशावाद फळे व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.राज्य शासनाने बाजार समितीसाठी नियमनमुक्तीचा अध्यादेश काढल्यापासून व्यापारी वर्गात गैरसमज निर्माण झाले होते. त्यात बहुतांश बाजार समित्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर सांगलीतही फळ मार्केटमध्ये बंद पाळण्यात आला होता. मात्र, यावर सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर कांदा, बटाटा व्यापारी असोसिएशनने व्यवहार सुरळीत चालू केले होते. फळे व भाजीपाला मार्केटमधील भाजीपाला व्यवहार सुरळीत चालू असतानाच गेल्या दोन दिवसापासून फळांच्या व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करण्यास खरेदीदारांनी नकार दर्शवला होता. या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यापासून पुन्हा बंद आंदोलन करण्याचा आग्रह करण्यात येत होता. मात्र, नियमनमुक्तीचा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, यापूर्वीच इतर राज्यांनी स्वीकार केल्याने याबाबत मतभेदाचे कारण नसल्याचे स्पष्टीकरण फळे व्यापारी संघटनेकडून देण्यात येत होते. शनिवारी सकाळीही याबाबत खरेदीदारांनी माल खरेदी करण्यास नकार दर्शवला. यावर तातडीने बैठक घेत नियमनमुक्ती निर्णयाचा सर्वत्र अवलंब झाल्याने आपला विरोध चुकीचा असून, तरीही काही अडचणी असल्यास चर्चेतून तोडगा काढूया, पण खरेदी थांबविण्यात येऊ नये, असे आवाहन केले. शनिवारी मार्केटमध्ये डाळिंब, पपई, सीताफळाची आवक झाली होती. (प्रतिनिधी)सोमवारी तोडगा अपेक्षितफळे व भाजीपाला मार्केटमधील व्यवहार काहीअंशी सुरळीत झाले असले तरी, बाजार समितीतील हळद, गुळासह बेदाण्याचे सौदे अकरा दिवसांपासून बंद आहेत. तर सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतीमालाची होणारी आवक अत्यल्प असल्याने त्याचा परिणाम होणार नसून शेतकऱ्यांना नुकसान पोहोचत असेल तर व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा बाजार समितीने दिला आहे. दरम्यान, या बंदमुळे दैनंदिन दोन कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. यावर सोमवारी तोडगा निघणे अपेक्षित आहे. व्यवहार सुरळीत झाले असले तरी खरेदीदारांकडून नकार येत होता. यावर शनिवारी व्यापारी, खरेदीदारांची बैठक घेत त्यांना शासनाच्या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांकडून कोणाचीही अडवणूक होणार नाही. खरेदीदारांच्या शंकांचे निरसन करण्यात आले असून, आता फळांचे व्यवहार सुरळीत होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. - शिवाजी प्रभू सगरे, अध्यक्ष, फू्रट असोसिएशन, सांगली.