शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएसच्या विषारी विचारसरणीमुळे देशात अस्वस्थता

By admin | Updated: April 23, 2016 01:00 IST

बी. जी. कोळसे-पाटील : आंबेडकर जयंतीनिमित्त कास्ट्राईब संघटनेकडून जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

सांगली : जगातील कष्टकरी जनतेच्या उध्दारासाठी कार्य करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार मांडला होता. देशाचा अन्नदाता असलेल्या जनतेचे शोषण करुन आपला उध्दार साधणाऱ्या प्रवृत्तीचे आता राज्य आल्याने, कष्टकरी जनतेच्या पिळवणुकीत वाढच होत असून आरएसएसच्या विषारी विचारसरणीमुळे देशात अस्वस्थता निर्माण झाल्याचे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी शुक्रवारी केले. जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात जिल्हा परिषद प्रशासन, बार्टी, पुणे आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘कामगार संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शोषणातून मुक्तता हा राज्यघटनेचा उद्देश फक्त आणि फक्त आंबेडकरांच्यामुळे सफल झाला आहे. जगातील कोणत्याच राज्यघटनेत याचा उल्लेख नसल्याने जगभरातील शोषितांच्या उध्दारासाठी त्यांनी कार्य केले. मात्र, सध्या आरएसएसमुक्त भारताची घोषणा करत असताना देशातील अस्वस्थ परिस्थिती प्रकर्षाने जाणवते. आरएसएसने आपल्या विषारी विचारसरणीचा खुबीने वापर केल्याने देशात विचारांची लढाई करण्याची वेळ आहे. आरएसएसच्या या विचारसरणीला प्रत्युत्तर देण्यासाठी आंबेडकरांचे विचार उपयोगी पडणार आहेत.त्यांनी पुढे सांगितले की, देशातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था अधिक प्रबळ करण्यासाठी नेहमीच गोळवलकर, टिळक आणि सावरकरांचे विषारी विचारच कारणीभूत ठरले आहेत. इतिहासाकडे चिकित्सक पध्दतीने पाहिल्यास, वास्तवावर आधारित इतिहासाचे पुनर्लेखन करणे आवश्यक बनले आहे. समाजात निर्माण झालेल्या दु:खाचे मूळ विषारी विचारसरणीत असल्याने या विचारसरणीला झिडकारले पाहिजे. आंबेडकरांचे विचार समाजात रुजविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करायला हवेत, असेही कोळसे-पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी रघुनाथ भोसले, डॉ. बाबूराव गुरव, गणेश मडावी, बाजीराव प्रज्ञावंत, विजय सातपुते, मनोज बनकर, संतोष कदम, नरेंद्र खांडेकर, विकास देवके, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आंबेडकर समजूच दिले नाहीतदेशातीलच नव्हे, तर जगभरातील कष्टकरी मानवजातीच्या कल्याणासाठी आंबेडकरांचे कार्य प्रेरणादायी ठरते. मात्र, भांडवलदारांच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या लोकांना आंबेडकरांचे हे महान कार्य कळतच नाही, त्यांना कळूही दिले जात नाही, असेही कोळसे-पाटील यांनी सांगितले.