शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

आरएसएसच्या विषारी विचारसरणीमुळे देशात अस्वस्थता

By admin | Updated: April 23, 2016 01:00 IST

बी. जी. कोळसे-पाटील : आंबेडकर जयंतीनिमित्त कास्ट्राईब संघटनेकडून जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

सांगली : जगातील कष्टकरी जनतेच्या उध्दारासाठी कार्य करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार मांडला होता. देशाचा अन्नदाता असलेल्या जनतेचे शोषण करुन आपला उध्दार साधणाऱ्या प्रवृत्तीचे आता राज्य आल्याने, कष्टकरी जनतेच्या पिळवणुकीत वाढच होत असून आरएसएसच्या विषारी विचारसरणीमुळे देशात अस्वस्थता निर्माण झाल्याचे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी शुक्रवारी केले. जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात जिल्हा परिषद प्रशासन, बार्टी, पुणे आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘कामगार संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शोषणातून मुक्तता हा राज्यघटनेचा उद्देश फक्त आणि फक्त आंबेडकरांच्यामुळे सफल झाला आहे. जगातील कोणत्याच राज्यघटनेत याचा उल्लेख नसल्याने जगभरातील शोषितांच्या उध्दारासाठी त्यांनी कार्य केले. मात्र, सध्या आरएसएसमुक्त भारताची घोषणा करत असताना देशातील अस्वस्थ परिस्थिती प्रकर्षाने जाणवते. आरएसएसने आपल्या विषारी विचारसरणीचा खुबीने वापर केल्याने देशात विचारांची लढाई करण्याची वेळ आहे. आरएसएसच्या या विचारसरणीला प्रत्युत्तर देण्यासाठी आंबेडकरांचे विचार उपयोगी पडणार आहेत.त्यांनी पुढे सांगितले की, देशातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था अधिक प्रबळ करण्यासाठी नेहमीच गोळवलकर, टिळक आणि सावरकरांचे विषारी विचारच कारणीभूत ठरले आहेत. इतिहासाकडे चिकित्सक पध्दतीने पाहिल्यास, वास्तवावर आधारित इतिहासाचे पुनर्लेखन करणे आवश्यक बनले आहे. समाजात निर्माण झालेल्या दु:खाचे मूळ विषारी विचारसरणीत असल्याने या विचारसरणीला झिडकारले पाहिजे. आंबेडकरांचे विचार समाजात रुजविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करायला हवेत, असेही कोळसे-पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी रघुनाथ भोसले, डॉ. बाबूराव गुरव, गणेश मडावी, बाजीराव प्रज्ञावंत, विजय सातपुते, मनोज बनकर, संतोष कदम, नरेंद्र खांडेकर, विकास देवके, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आंबेडकर समजूच दिले नाहीतदेशातीलच नव्हे, तर जगभरातील कष्टकरी मानवजातीच्या कल्याणासाठी आंबेडकरांचे कार्य प्रेरणादायी ठरते. मात्र, भांडवलदारांच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या लोकांना आंबेडकरांचे हे महान कार्य कळतच नाही, त्यांना कळूही दिले जात नाही, असेही कोळसे-पाटील यांनी सांगितले.