शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

जत तालुक्यात आणखी दोन तलाव बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST

जत : वारणेचे पाणी जत तालुक्याला देण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाला पत्र दिले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना मंजूर करण्यासाठी ...

जत : वारणेचे पाणी जत तालुक्याला देण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाला पत्र दिले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना मंजूर करण्यासाठी एक-दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हे पाणी तालुक्याला मिळणार, हे निश्चित झाले आहे. उलट तालुक्यातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी आणखी तलावांची गरज आहे. दोन मोठे साठवण तलाव मंजूर करण्याचेही माझे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

संख (ता. जत) येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. बसवराज पाटील, प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, मोहन कुलकर्णी, रमेश बिराजदार, साहेबराव टोने, देयगोंडा बिराजदार, सुजाता पाटील, रणधीर कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. मंत्री जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

जयंत पाटील म्हणाले की, जत तालुक्याच्या पाण्याच्या सोडवण्यासाठीच मी जलसंपदा खाते घेतले. या भागाचा दुष्काळ हटविण्यासाठी राजारामबापू पाटील यांनी उमदी ते सांगली पदयात्रा काढली होती. जत तालुक्यात आलो की पाणी द्या, अशी सर्वांचीच मागणी असायची. पाणी देण्याच्या अटीवरच बसवराज पाटील, प्रकाश जमदाडे व मन्सूर खतीब यांचा पक्षप्रवेश लांबला होता. उमदीत वारणेच्या पाण्याची घोषणा होताच या तिघांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला.

बसवराज पाटील म्हणाले की, राजारामबापू पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न होते ते राहून गेले. आता त्यांच्याच घरातील मुलाला तरी मुख्यमंत्री बनविण्यासाठी जत तालुक्यातील जनतेने जयंत पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

मोहन कुलकर्णी, सुरेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अविनाश पाटील, बाळासो पाटील, रमेश पाटील, उत्तम चव्हाण, डॉ. गीता कोडग, सुश्मिता जाधव, मीनाक्षी अक्की, बाबासाहेब मुळीक आदी उपस्थित होते.

चाैकट

समस्या सोडविणार

जयंत पाटील म्हणाले की, वारणेच्या पाण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे, त्याचबरोबर पुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या भागातील समस्या सोडविण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद मतदारसंघानुसार बैठका लावणार आहे.