शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी दोन मंत्र्याना दारोदारी फिरावे लागले

By admin | Updated: November 4, 2015 00:10 IST

संजू परब यांची टीका : युतीचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात

सावंतवाडी : दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत दोन मंत्र्यांना दारोदारी फिरावे लागले, आमची सत्ता आली नाही, पण मतांची टक्केवारी वाढली असून युतीचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. पण आम्ही विरोधी पक्षातच बसण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे, असे मत दोडामार्ग नगरपंचायतचे काँग्रेसचे प्रचारप्रमुख संजू परब यांनी मांडले. ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी गुरू सावंत, रवींद्र म्हापसेकर, रवींद्र मडगावकर उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब म्हणाले, दोडामार्ग नरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले असून, विधानसभा निवडणुकीत दोडामार्गमध्ये आमची टक्केवारी अवघी १५ टक्के होती. ती नगरपंचायत निवडणुकीत ४९ टक्क्यावर गेली आहे. काँग्रेसचे दोन उमेदवार अवघ्या १ व १५ मतांनी पडले अन्यथा दोडामार्गमध्ये वेगळे चित्र पाहता आले असते, असेही परब म्हणाले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार केला. मात्र, शिवसेना-भाजप युतीचे शिक्षणमंत्री तसेच पालकमंत्री आमदार माजी आमदार हे दोडामार्गमध्ये ठाण मांडून होते. प्रचार सभा घेतल्या. पालकमंत्र्यांनी तर दारोदारी जाऊन प्रचार केला. तसेच पैशाचा मोठ्या प्रमाणात वापरही केला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्येक घराघरातून एका माणसाला नोकरीचे आमिष दोडामार्गच्या निवडणुकीत दाखवले. त्यांनी दिलेले आमिष आम्ही पूर्ण करून घेऊच, असे सांगत तावडेंचे विधान निवडणुकीच्या काळात चुकीचे आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेना-भाजपने पूर्णपणे सत्तेचा वापर केला. अनेक ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दादागिरी केली. काँग्रेस उमेदवारांच्या घरात जाऊन घुसत होते. हे योग्य नाही. प्रशासनाच्या दादागिरीचा हा विजय असल्याचेही परब म्हणाले. मात्र, असे असले तरी युतीतील काही नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क केला असून, जर नगराध्यक्ष आमचा बसला नाही, तर आम्ही तुमच्याकडे येऊ, असे भ्रमणध्वनीवरून आम्हाला सांगितल्याचा दावा, संजू परब यांनी केला आहे. (प्रतिनिधी)केसरकर म्हापसेकरांमुळे तरलेपालकमंत्री दीपक केसरकर यांना घरोघरी जाऊन प्रचार करावा लागला. त्यानंतरच कुठे तरी शिवसेनेच्या पाच जागा आल्या. पण यात केसरकरांपेक्षा राजन म्हापसेकर यांचा वाटा महत्त्वाचा असून ते जर दोडामार्गमध्ये नसते, तर चित्र उलटे झाले असते. पालकमंत्र्यांना तोंड दाखवणे मुश्किल झाले असते, असा अंदाज परब यांनी व्यक्त केला.