शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

सत्तेसाठी दोन मंत्र्याना दारोदारी फिरावे लागले

By admin | Updated: November 4, 2015 00:10 IST

संजू परब यांची टीका : युतीचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात

सावंतवाडी : दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत दोन मंत्र्यांना दारोदारी फिरावे लागले, आमची सत्ता आली नाही, पण मतांची टक्केवारी वाढली असून युतीचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. पण आम्ही विरोधी पक्षातच बसण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे, असे मत दोडामार्ग नगरपंचायतचे काँग्रेसचे प्रचारप्रमुख संजू परब यांनी मांडले. ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी गुरू सावंत, रवींद्र म्हापसेकर, रवींद्र मडगावकर उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब म्हणाले, दोडामार्ग नरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले असून, विधानसभा निवडणुकीत दोडामार्गमध्ये आमची टक्केवारी अवघी १५ टक्के होती. ती नगरपंचायत निवडणुकीत ४९ टक्क्यावर गेली आहे. काँग्रेसचे दोन उमेदवार अवघ्या १ व १५ मतांनी पडले अन्यथा दोडामार्गमध्ये वेगळे चित्र पाहता आले असते, असेही परब म्हणाले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार केला. मात्र, शिवसेना-भाजप युतीचे शिक्षणमंत्री तसेच पालकमंत्री आमदार माजी आमदार हे दोडामार्गमध्ये ठाण मांडून होते. प्रचार सभा घेतल्या. पालकमंत्र्यांनी तर दारोदारी जाऊन प्रचार केला. तसेच पैशाचा मोठ्या प्रमाणात वापरही केला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्येक घराघरातून एका माणसाला नोकरीचे आमिष दोडामार्गच्या निवडणुकीत दाखवले. त्यांनी दिलेले आमिष आम्ही पूर्ण करून घेऊच, असे सांगत तावडेंचे विधान निवडणुकीच्या काळात चुकीचे आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेना-भाजपने पूर्णपणे सत्तेचा वापर केला. अनेक ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दादागिरी केली. काँग्रेस उमेदवारांच्या घरात जाऊन घुसत होते. हे योग्य नाही. प्रशासनाच्या दादागिरीचा हा विजय असल्याचेही परब म्हणाले. मात्र, असे असले तरी युतीतील काही नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क केला असून, जर नगराध्यक्ष आमचा बसला नाही, तर आम्ही तुमच्याकडे येऊ, असे भ्रमणध्वनीवरून आम्हाला सांगितल्याचा दावा, संजू परब यांनी केला आहे. (प्रतिनिधी)केसरकर म्हापसेकरांमुळे तरलेपालकमंत्री दीपक केसरकर यांना घरोघरी जाऊन प्रचार करावा लागला. त्यानंतरच कुठे तरी शिवसेनेच्या पाच जागा आल्या. पण यात केसरकरांपेक्षा राजन म्हापसेकर यांचा वाटा महत्त्वाचा असून ते जर दोडामार्गमध्ये नसते, तर चित्र उलटे झाले असते. पालकमंत्र्यांना तोंड दाखवणे मुश्किल झाले असते, असा अंदाज परब यांनी व्यक्त केला.