शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सत्तेसाठी दोन मंत्र्याना दारोदारी फिरावे लागले

By admin | Updated: November 4, 2015 00:10 IST

संजू परब यांची टीका : युतीचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात

सावंतवाडी : दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत दोन मंत्र्यांना दारोदारी फिरावे लागले, आमची सत्ता आली नाही, पण मतांची टक्केवारी वाढली असून युतीचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. पण आम्ही विरोधी पक्षातच बसण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे, असे मत दोडामार्ग नगरपंचायतचे काँग्रेसचे प्रचारप्रमुख संजू परब यांनी मांडले. ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी गुरू सावंत, रवींद्र म्हापसेकर, रवींद्र मडगावकर उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब म्हणाले, दोडामार्ग नरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले असून, विधानसभा निवडणुकीत दोडामार्गमध्ये आमची टक्केवारी अवघी १५ टक्के होती. ती नगरपंचायत निवडणुकीत ४९ टक्क्यावर गेली आहे. काँग्रेसचे दोन उमेदवार अवघ्या १ व १५ मतांनी पडले अन्यथा दोडामार्गमध्ये वेगळे चित्र पाहता आले असते, असेही परब म्हणाले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार केला. मात्र, शिवसेना-भाजप युतीचे शिक्षणमंत्री तसेच पालकमंत्री आमदार माजी आमदार हे दोडामार्गमध्ये ठाण मांडून होते. प्रचार सभा घेतल्या. पालकमंत्र्यांनी तर दारोदारी जाऊन प्रचार केला. तसेच पैशाचा मोठ्या प्रमाणात वापरही केला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्येक घराघरातून एका माणसाला नोकरीचे आमिष दोडामार्गच्या निवडणुकीत दाखवले. त्यांनी दिलेले आमिष आम्ही पूर्ण करून घेऊच, असे सांगत तावडेंचे विधान निवडणुकीच्या काळात चुकीचे आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेना-भाजपने पूर्णपणे सत्तेचा वापर केला. अनेक ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दादागिरी केली. काँग्रेस उमेदवारांच्या घरात जाऊन घुसत होते. हे योग्य नाही. प्रशासनाच्या दादागिरीचा हा विजय असल्याचेही परब म्हणाले. मात्र, असे असले तरी युतीतील काही नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क केला असून, जर नगराध्यक्ष आमचा बसला नाही, तर आम्ही तुमच्याकडे येऊ, असे भ्रमणध्वनीवरून आम्हाला सांगितल्याचा दावा, संजू परब यांनी केला आहे. (प्रतिनिधी)केसरकर म्हापसेकरांमुळे तरलेपालकमंत्री दीपक केसरकर यांना घरोघरी जाऊन प्रचार करावा लागला. त्यानंतरच कुठे तरी शिवसेनेच्या पाच जागा आल्या. पण यात केसरकरांपेक्षा राजन म्हापसेकर यांचा वाटा महत्त्वाचा असून ते जर दोडामार्गमध्ये नसते, तर चित्र उलटे झाले असते. पालकमंत्र्यांना तोंड दाखवणे मुश्किल झाले असते, असा अंदाज परब यांनी व्यक्त केला.