शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

येळवीत दोन गटांत मारामारी

By admin | Updated: February 19, 2015 23:41 IST

चौघे जखमी : संशयित ताब्यात, विहिरीच्या पाण्यावरून वाद

जत : समाईक विहिरीतील पाण्याच्या पाळीच्या वादातून व न्यायालयात प्रलंबित असलेला खटला मागे घ्यावा, या कारणावरुन येळवी (ता. जत) येथे दोन गटात मारामारी झाली. यात पांडुरंग रामदास खरात, राजाराम रामदास खरात, रामदास पांडुरंग खरात, कमळाबाई रामदास खरात, मनीषा पांडुरंग खरात (सर्व रा. येळवी, ता. जत) यांनी चंद्राबाई बाळासाहेब खरात (वय ५०), बाबासाहेब रामदास खरात (६०), भाऊसाहेब बाबासाहेब खरात (३०, रा. येळवी) यांना कुऱ्हाड, कोयता, लोखंडी गज व काठीने मारहाण करून जखमी केले. आज, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता खरात वस्तीजवळ ही घटना घडली. याप्रकरणी चंद्राबाई बाबासाहेब खरात यांनी वरील पाचजणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. जखमींवर सांगलीत उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दोन संशयितांना जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पांडुरंग खरात व बाबासाहेब खरात यांच्यात समाईक विहिरीतील पाण्याच्या पाळीवरून व शेतजमिनीचा वाद आहे. यासंदर्भात न्यायालयात खटला प्रलंबित आहे. आज सकाळी चंद्राबाई खरात व त्यांच्या घरातील इतर नागरिक शेतात गेले होते. त्यांनी विद्युत मोटार सुरू करून लसूण पिकाला पाणी सोडले होते. त्यावेळी पाठीमागील जलवाहिनीचा चेंबरमधून पांडुरंग व राजाराम यांनी पाणी घेतले. यातून त्यांच्यात प्रथम बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब कत्ते तपास करीत आहेत. (वार्ताहर)किरकोळ वाद विकोपालासकाळी चंद्राबाई खरात व त्यांच्या घरातील इतर नागरिक शेतात गेले होते. त्यांनी विद्युत मोटार सुरू करून लसूण पिकाला पाणी सोडले होते. त्यावेळी पाठीमागील जलवाहिनीचा चेंबरमधून पांडुरंग व राजाराम यांनी पाणी घेतले. यातून त्यांच्यात प्रथम बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. यात चौघेजण जखमी झाले.