शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

येळवीत दोन गटांत मारामारी

By admin | Updated: February 19, 2015 23:41 IST

चौघे जखमी : संशयित ताब्यात, विहिरीच्या पाण्यावरून वाद

जत : समाईक विहिरीतील पाण्याच्या पाळीच्या वादातून व न्यायालयात प्रलंबित असलेला खटला मागे घ्यावा, या कारणावरुन येळवी (ता. जत) येथे दोन गटात मारामारी झाली. यात पांडुरंग रामदास खरात, राजाराम रामदास खरात, रामदास पांडुरंग खरात, कमळाबाई रामदास खरात, मनीषा पांडुरंग खरात (सर्व रा. येळवी, ता. जत) यांनी चंद्राबाई बाळासाहेब खरात (वय ५०), बाबासाहेब रामदास खरात (६०), भाऊसाहेब बाबासाहेब खरात (३०, रा. येळवी) यांना कुऱ्हाड, कोयता, लोखंडी गज व काठीने मारहाण करून जखमी केले. आज, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता खरात वस्तीजवळ ही घटना घडली. याप्रकरणी चंद्राबाई बाबासाहेब खरात यांनी वरील पाचजणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. जखमींवर सांगलीत उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दोन संशयितांना जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पांडुरंग खरात व बाबासाहेब खरात यांच्यात समाईक विहिरीतील पाण्याच्या पाळीवरून व शेतजमिनीचा वाद आहे. यासंदर्भात न्यायालयात खटला प्रलंबित आहे. आज सकाळी चंद्राबाई खरात व त्यांच्या घरातील इतर नागरिक शेतात गेले होते. त्यांनी विद्युत मोटार सुरू करून लसूण पिकाला पाणी सोडले होते. त्यावेळी पाठीमागील जलवाहिनीचा चेंबरमधून पांडुरंग व राजाराम यांनी पाणी घेतले. यातून त्यांच्यात प्रथम बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब कत्ते तपास करीत आहेत. (वार्ताहर)किरकोळ वाद विकोपालासकाळी चंद्राबाई खरात व त्यांच्या घरातील इतर नागरिक शेतात गेले होते. त्यांनी विद्युत मोटार सुरू करून लसूण पिकाला पाणी सोडले होते. त्यावेळी पाठीमागील जलवाहिनीचा चेंबरमधून पांडुरंग व राजाराम यांनी पाणी घेतले. यातून त्यांच्यात प्रथम बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. यात चौघेजण जखमी झाले.