शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

रेठरेधरण येथे दोन कुटुंबात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) येथे दोन कुटुंबात किरकोळ कारणातून कुऱ्हाड आणि काठीने झालेल्या मारामारीत दोघे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) येथे दोन कुटुंबात किरकोळ कारणातून कुऱ्हाड आणि काठीने झालेल्या मारामारीत दोघे जखमी झाले. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी झाला. याबाबत पोलिसांत दोन्ही बाजूकडून परस्परविरोधी फिर्याद देण्यात आल्या आहेत.

संदीप बबन माळी (३८) यांनी दिलेल्या फिर्यादीत संतोष तानाजी बनसोडे आणि भूपाल चंदु बनसोडे या दोघांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. माळी यांनी दोन वर्षांपूर्वी बनसोडे यांना पाण्याची टाकी वापरण्यास दिली होती. ती परत मागण्यासाठी गेल्यावर संतोष बनसोडे याने कुठली टाकी, मी तुझी टाकी देत नाही, तुला काय करायचे ते कर, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर वरील दोघांनी कुऱ्हाड आणि काठीने संदीप माळी यांना मारहाण करत गंभीर जखमी केले. माळी यांच्या हाताच्या मनगटावर वार बसला आहे. हल्लेखोरांनी त्यांना जिवे मारण्याचीही धमकी दिली.

संतोष तानाजी बनसोडे याने संदीप माळी याच्याविरुद्ध काठीने मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. संतोष कामावरून घरी जात असताना माळी याने त्याला दारूच्या नशेत शिवीगाळ केली. संतोष समजून सांगत असताना संदीप याने संतोषच्या आई आणि पत्नीला थोबाडीत मारल्या. त्यानंतर संतोषच्या गुडघ्यावर, पाठीत आणि हातावर मारहाण केली. या दोन्ही गुन्ह्याचा तपास हवालदार सोमनाथ पाटील करत आहेत.