शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

दोन वर्षांत बारा शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: April 16, 2017 23:14 IST

जत तालुक्यातील स्थिती : दुष्काळाचा फेरा सुटता सुटेना; धक्कादायक घटनांची मालिका कायम

जयवंत आदाटे ल्ल जतकर्जाला कंटाळून व कूपनलिकेला पाणी न लागल्याने खिलारवाडी (ता. जत) येथील शेतकरी दाम्पत्याने एकाचवेळी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे दुष्काळी जत तालुक्यातील वास्तव समोर येऊ लागले आहे. मागील दोन वर्षात येथील बारा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.भौगोलिक असमतोल, कमी प्रमाणात पडणारा पाऊस व जवळपास बारमाही वाहणारी नदी नसल्यामुळे दुष्काळी परिस्थितीशी सामना करून जत तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करावा लागत आहे. बॅँका आणि पतसंस्था व खासगी सावकारांचे थकीत कर्ज, फळबागेतील उत्पन्नातून आलेले नुकसान, कूपनलिकेचे अचानक बंद झालेले पाणी, नवीन कूपनलिकेस पाणी न लागणे आदी कारणांमुळे येथील शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करण्याच्या धक्कादायक घटना एकापाठोपाठ एक घडत आहेत. परंतु शासनस्तरावर त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. शासनाने कायम दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करून, त्यांना आत्महत्येपासून परावृृत्त करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र हा सधन भाग समजला जात आहे. त्यातील जत तालुक्यातच शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाल्याने येथील वास्तव हळूहळू समोर येऊ लागले आहे. २०१५ मध्ये येथील सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. २०१६ मध्ये चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर २०१७ मध्ये एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. जत तालुक्यास वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करून पूर्ण क्षमतेने पाणी सोडले, तर तालुक्याच्या काही भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. येथील राजकारण आजपर्यंत म्हैसाळ योजनेभोवती फिरत राहिले. प्रत्येक निवडणुकीत त्याचा राज्यकर्त्यांनी सोयीस्करपणे वापर केला. टोकाचा राजकीय संघर्ष, राजकीय अनास्था यामुळे म्हैसाळ योजनेचे काम आजपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.तालुक्यातील आत्महत्या केलेले शेतकरी...नाव वय गाव तारीखमधुकर गोविंद घेरडे ४८ काशिलिंगवाडी १0-२-२0१५भगवान तुकाराम शिंदे २८शेगाव ८-४-२0१५शिवकांत रेवाप्पा चनगोंड ४० जाडरबोबलाद १६-९-२0१५श्रीकांत कोंडीबा चौगुले ३५ दरीबडची ३-११-२0१५रमेश लिंगाप्पा पुजारी ४० गुड्डापूर १-११-२0१५संजय ज्ञानू पांढरे ३५ कुडनूर ९-१२-२0१५आप्पासाहेब तम्माण्णा हुबळी ४० बिळूर ३१-५-२0१६मारुती मल्लाप्पा हळगे ४५ डफळापूर३0-८-२0१६आप्पासाहेब परकाप्पा मगदूम ३८ सिंदूर२६-५-२0१६बसगोंडा रामाण्णा तंगडी ४२ मुचंडी २६-५-२0१६भैराप्पा आण्णाप्पा कोडलकर ३७खिलारवाडी १४-४-२0१७पदुबाई भैराप्पा कोडलकर ३१ खिलारवाडी १४-४-२0१७